·
दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती
योजनेतंर्गत जिल्हयात 71 कोटी रुपये मंजूर
·
जिल्हयात वायफायचे 60
हॉटस्पॉट मंजूर, 20 कार्यान्वित
·
259 ग्रामपंचायती फायबर
ऑप्टीकने जोडण्यात आल्या
·
तरसोद-फागणे चौपदरीकरणाचे काम
ऑक्टोबरमध्ये सुरु होणार
·
जळगाव-भुसावळ तिसरी रेल्वे
लाईनच्या भूसंपादनाचे काम लवकरच पूर्ण होणार
·
जिल्हयातील 495 गावांसह बोदवड
व भुसावळ तालुका संपूर्ण हागणदारीमुक्त
·
जिल्हयात 86 हवामानमापक यंत्र
मंजूर 55 यंत्र बसविण्यात आले
·
मुद्रा योजनेत 1 एप्रिलपासून
26 हजार लाभार्थ्यांना 650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप
·
कौशल्य विकास योजनेतून 2596
उमेदवारांना प्रशिक्षण 327 उमेदवारांना रोजगार प्राप्त
·
प्रधानमंत्री उज्वला योजनेत
जिल्हयात 74 हजार 371 लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप
जळगाव,
दि: 22 - जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक खासदार ए. टी. नाना पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली. याप्रसंगी
व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
उज्वलाताई पाटील, खासदार रक्षाताई पाटील, माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथराव
खडसे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आदि उपस्थित होते.
या
बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये दिनदयाल उपाध्याय
ग्रामज्योती योजनेतंर्गत जिल्हयात 71 कोटी
रुपये मंजूर झाले असून यामाध्यमातून जिल्हयात 6 सबस्टेशनचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या
अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे कनेक्शन
थकबाकीमुळे तोडण्यात येवू नये, नवरात्रीमध्ये लोडशेडींग करण्यात येवू नये. अशी
मागणी यावेळी लोकप्रतिनिधी केली.
मुलभूत
सुविधा प्रकल्पांतर्गत जिल्हयात वायफायचे 60 हॉटस्पॉट मंजूर असून 20 हॉटस्पॉट
कार्यान्वित झाले आहे तसेच जिल्हयात 80 मोबाईल टॉवर मंजूर आहेत. जिल्हयातील 259
ग्रामपंचायती फायबर ऑप्टीकने जोडण्यात आल्या. तर डिसेंबर अखेर 400 पेक्षा अधिक
ग्रामपंचायती जोडण्यात येतील अशी माहिती दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच
तरसोद-फागणे या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे
हे काम व तरसोद ते चिखली हे काम
ऑक्टोबरमध्ये सुरु करता येईल. या रस्त्यांचे साईट पट्टयांचे काम या महिनाअखेर
पूर्ण करण्यात येईल यासाठी 10.84 लाख रुपये मंजूर आहे. बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर या
रस्त्याच्या सर्व्हेचे काम पुढील आठवडयात सुरु करण्यात येईल तर पहूर- पाचोरा-
भडगाव-चाळीसगाव- नांदगाव या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरु करण्यात येणार
असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग व
सार्वजनिब बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
जळगाव-भुसावळ
तिसरी रेल्वे लाईनच्या भूसंपादनाचे काम लवकर पूर्ण झाल्यास काम सुरु करण्यात येणार
असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या भूसंपादनासाठी राज्य शासन जो दर
ठरविल तो दर देण्यास रेल्वेची तयारी असल्याचेही या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्याचबरोबर
कजगाव येथील रेल्वे पुलाच्या कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री
ग्रामसडक योजनेतंर्गत रस्त्यांची कामे सुरु करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती
देण्याचे निर्देश खासदार श्री. पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
तसेच अमृत अभियानातंर्गत हरितक्षेत्र तयार करतांना शहराच्या सर्व भागाचा विचार
करण्याची सूचना आमदार सुरेश भोळे यांनी केली.
स्वच्छ
भारत अभियानात जिल्हयाला 2 लाख 13 हजार 803 शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
त्यापैकी 31 हजार 614 शौचालये तयार झाली आहेत. जिल्हयातील 495 गावांसह बोदवड व
भुसावळ तालुका संपूर्ण हागणदारीमुक्त झाला असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी
अधिकारी राजन पाटील यांनी दिली.
प्रधानमंत्री
कृषि सिंचाई योजनेतंर्गत जिल्हयाला 36 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच
जिल्हा वार्षिक योजनेतून 23 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली. तसेच जिल्हयात 86 हवामानमापक यंत्र मंजूर असून
55 यंत्र बसविण्यात आले आहे.
प्रधानमंत्री
आवास योजनेतंर्गत महापालिकेने 26 घोषित व 3 अघोषित अशा 29 झोपडपट्टीमधून 12 हजार 853 अर्ज प्राप्त
झाले असून त्यावर पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती प्रभारी आयुक्त श्री.
निंबाळकर यांनी दिली. तसेच ग्रामीण भागातही या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना
लाभ देण्यात येत आहे.
सर्व
शिक्षा अभियानातंर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सहायभूत सुविधा
पुरविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.
तसेच मुलांना गणवेश, संगणक शिक्षण लवकरात लवकर मिळावे अशी मागणी आमदार चंद्रकांत
सोनवणे यांनी केली.
मुद्रा
योजनेत 1 एप्रिलपासून 26 हजार लाभार्थ्यांना 650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात
आले असून कर्ज वाटप करण्यात जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा
अग्रणी बँकेचे समन्वयक श्री. दामले यांनी दिली. या योजनेचा लाभ जिल्हयातील
सर्वसामान्य उमेदवारांना मिळावा. यासाठी बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटप करताना दक्षता
घेण्याच्या सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी दिल्या.
कौशल्य
विकास योजनेतंर्गत जिल्हयात 109 व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र असून या केंद्राच्या
माध्यमातून जिल्हयातील 2 हजार 596 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्यापैकी 327 उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती विभागाच्या
अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेतून जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांना प्रशिक्षण
देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होईल यासाठी विभागाने प्रयत्न करावेत.
कौशल्य विकासाचे प्रशिक्षिण घेतलेल्या
उमेदवारांना मुद्रा योजनेतून कर्ज देण्यात यावेत. जेणेकरुन या उमेदवारांना
स्वत:चा व्यवसाय सुरु करता येईल अशा सुचना आमदार एकनाथराव खडसे यांनी संबंधितांना
दिल्या.
प्रधानमंत्री
उज्वला योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्हयातील 74 हजार 371 लाभार्थ्यांना गॅस जोडणी
देण्यात आली आहे. गॅस जोडणी देतांना तहसीलदारांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना
माहिती देण्यात यावी. तसेच केंद्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यत
पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. अशा सुचना खासदार ए. टी. नाना
पाटील यांनी दिल्या.
बैठकीत
केंद्र पुरस्कृत सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार श्रीमती स्मिताताई
वाघ, आमदार सर्वश्री. चंदूलाल पटेल,
हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, किशोर आप्पा पाटील, उन्मेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, सुरेश
भोळे यांनी सुचना मांडल्या.
बैठकीस
जिल्हयातील पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, जिल्हा समन्वय समितीचे सदस्य, सर्व
तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचेसह विविध शासकीय
यंत्रणांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रेल्वे, गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment