जळगाव, दि.5:- जिल्ह्यात सन 2017-18 करीता प्रधानमंत्री फसल विमा
योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पिक विमा योजना अंबिया बहारकरिता अधिसुचित
फळपिकांसाठी राबविण्यात येत असुन या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर
पर्यंत आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना
बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक
योजनेतंर्गत (द्राक्षे, डाळीब, केळी, आंबा, लिंबु, मोसंबी, पेरु या फळपिकांचा
समावेश असुन कमी / जास्त पाऊस, वेगाचा वारा व सापेक्ष आद्रता या हवामान
धोक्यापासुन निर्धारित केलेला कालावधीत शेतक-यांना विमा संरक्षण आणि आर्थिक
स्थैर्य देणे तसेच फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक
स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे.
तरी या योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ
घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. तसेच या
योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व
राष्ट्रीय कृत बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय
या ठिकाणी संपर्क साधावा
०००००
No comments:
Post a Comment