विशेष
लेख
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे
दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसायला लागले आहेत. सरकारला तीन वर्ष पूर्ण
होण्याच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. जलयुक्त
शिवार योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा
ताळेबंद तयार झाला आहे. जळगाव जिल्हयात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये 660
गावाची निवड करण्यात आली. निवड केलेल्या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या
कामामधून 74 हजार 991 हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. याचा लाभ असंख्य
शेतकऱ्यांना मिळाला आहे. जलयुक्त शिवार हे अभियान शेतीसाठी संजीवनी ठरले आहे.
टंचाईसदृश्य
परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वांसाठी
पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्यात डिसेंबर
2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला
आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील
25 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा मानस आहे.
कृषि
विभाग, लघुसिंचन, जिल्हा परिषद, लघुसिंचन,
जलसंधारण, वन विभाग, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग, उप मुख्य कार्यकारी
(ग्रामपंचायत) जिल्हा परिषद, जळगाव आदी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त
शिवारची कामे करण्यात येतात. या सर्व विभागांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीमुळे
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल पहायला मिळत आहे.
2015-16
मध्ये जिल्ह्यातील 232 गावांची निवड या अभियानात करण्यात आली होती. या गावांमध्ये
विविध यंत्रणांमार्फत 7316 कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या
जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम पहाता जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत यावर्षी
समाविष्ट करण्यात आलेली सर्व गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली आहे. या
कामांमुळे जिल्ह्यात या वर्षात 36118 टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली असून 58667
हेक्टर क्षेत्राला एक पाण्याची पाळी तर 29333 हेक्टर क्षेत्राला दोन पाण्याची पाळी
देता येईल इतके संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एका पाण्यामुळे
वाया जाणारे पिकांना जलयुक्त शिवार अभियान संजीवनी देणारे ठरले आहे.
शिवारात
पावसाचे पडलेले पाणी, अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पध्दत
जलयुक्त शिवार अभियानामध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व
पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात
आलेल्या कामांमुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर
न्युट्र्ल टक्केवारी होय.
या
अभियानात सन 2016-17 मध्ये 222 गावाची निवड करण्यात आली असून या गावात 4934 कामे
प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी 4316 कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तर 488 कामे
प्रगतीपथावर आहे. पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून 16 हजार 324
हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. याद्वारे 32448 हेक्टर क्षेत्राला दोन
पाण्याची पाळी देता येणार आहे. या वर्षात निवडण्यात आलेल्या 222 गावांपैकी शेकडो
गावे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली आहेत तर उर्वरित गावेही वाटर न्युट्रल
होण्याच्या मार्गावर आहे.
सन
2017-18 मध्ये जिल्हयातील 206 गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत
6358 कामे प्रस्तावित केली आहेत. यातील बहुतांश कामे सुरु झाली असून ही कामे पूर्ण
झाल्यानंतर अंदाजे 47 हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण होणार आहे. जलयुक्त
शिवारमध्ये शेततळे, सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण यासह अन्य महत्वाची कामे
करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून येत्या 5 वर्षात महाराष्ट्र
दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. मागील तीन वर्षात या अभियानाच्या
माध्यमातून जिल्हयात निर्माण झालेल्या 74 हजार 991 हेक्टर संरक्षित सिंचनामुळे
येणाऱ्या काळात जिल्हयात या अभियानामुळे शेतीला हक्काचे सिंचन मिळणार आहे. राज्य
शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठी शेतीक्षेत्रात
मोठया प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून शेतकऱ्याला
निश्चित उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत यावर शासनाचा भर आहे. भविष्यात
शेतकऱ्याला कर्जमाफी आवश्यकता भासू नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
विलास बोडके,
जिल्हा
माहिती अधिकारी,
जळगाव
00000
No comments:
Post a Comment