जळगाव,
दि. 25 - स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत कचरा व कचराकुंडीमुक्त वार्ड अभियानाचा
शुभारंभ जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत
महाबळ परिसरातील प्रभाग क्रमांक 36 येथे करण्यात आला. यावेळी प्रभागाच्या
नगरसेविका श्रीमती अश्विनी देशमुख, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी उदय पाटील, विनोद
देशमुख यांचेसह प्रभागातील नागरीक उपस्थित होते.
स्वच्छ
महाराष्ट्र अभियानातंर्गत शहरातील नागरीकांचा स्वच्छतेत सहभाग वाढावा, तसेच
प्रभागातील नागरीकांचे आरोग्य सुदृढ रहावे, प्रभागात स्वच्छता राहवी, वार्ड कचरा व
कचराकुंडी मुक्त रहावा, यासाठी नगरसेविका श्रीमती देशमुख यांनी प्रभागातील सर्व
मोकळ्या जागांवर ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या हटविल्या असून याठिकाणी नागरीकांना
कचरा हा फक्त घंटागाडीतच टाकावा. असे ठिकठिकाणी फलक लावून नागरीकांना आवाहन केले
आहे. नागरीकांकडूनही या आवाहनास प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रभागातील प्रत्येक
गल्लीत दररोज घंटागाडी पाठविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी
तथा प्रभारी आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी
शहरातील अतिक्रमण मोहिम व साफसफाईची पाहणी
जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर यांनी शहरातील अतिक्रमण मोहिम तसेच शहरातील साफसफाईची पाहणी
केली. आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसराची तसेच
अतिक्रमण काढलेल्या सुभाष चौक परिसर, स्टेशन रोड परिसर, राजेश्री शाहू महाराज
रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या
नाट्यगृहास भेट देऊन तेथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.
000
No comments:
Post a Comment