जळगाव, दि. 18:- देशाचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटूंबियांनी खचून न जाता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन नेहमी या कुटूंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना भरीव मदत करेल. असे आश्वासन जिल्हाधिकरी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.
येथील अल्पबचत भवनमध्ये ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसि्थतांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी, जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी उपस्थित होते.
याप्रंसगी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित राहू शकतो. या सैनिकांप्रती समाजामध्ये नेहमीच आदराची भावना आहे. ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिकांच्या कुटूंबियांना विविध कारणांसाठी मदत करण्यात येते. यावर्षी जिल्हयाला 1 कोटी 68 लाख रुपयांचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरीकाने सामाजिक भावनेने ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी ध्वजदिन निधी संकलन व त्याचा विनियोग याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सन 2016 मध्ये जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलनाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 17 शहिद सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना ध्वज लावून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील वीरपिता श्री. रमेश देवराम पवार, वीरमाता श्रीमती साखराबाई धनाजी ठाकरे, श्रीमती इंदुबाई पुंडलिक पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई भिवसन पाटील, श्रीमती अनुसया काशीराम शिंदे, श्रीमती तुळसाबाई रोहिदास बागुल, श्रीमती चंद्रकला आनंदा जाधव, श्रीमती शैला अनंतराव साळुंखे, श्रीमती सुनंदा मनोहर पाटील, वीरपत्नी श्रीमती निर्मला सुवालाल हनुवते, श्रीमती कल्पना विलास पवार, श्रीमती सरला भानुदास बेडीस्कर, श्रीमती सुनंदा वसंत उबाळे, श्रीमती सुरेखा पोपट पाटील, श्रीमती कविता राजू साळवे, श्रीमती कल्पना देविदास पाटील, श्रीमती रंजना अविनाश पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर माजी सैनिकांच्या पाल्य सागर संजय ठाकणे, भूषण जगदिश सावकारे, तुषार नाना पाटील, श्रीमती निवेदिता सुनिल ताठे, रोहित अनिल बडगुजर यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष गौरव करण्यात आला. तर प्रियंका उत्तम डाकोरकर, हर्षाली विनायक पाटील, निकिता प्रमोद कापुरे यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सैन्य सेवेत असतांना साधारण मृत्यु पावलेल्या सैनिकांचे वारस श्रीमती कविता अनिल जाधव, श्रीमती मनिषा मनोहर माळी, श्रीमती सुवर्णा सतिश रोकडे यांना प्रत्येकी 75 हजार रुपयांची मरणोपरांत आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याधिकारी प्रभाकर गोविंदा सोनवणे यांनी ध्वजदिन निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सन 2016 मध्ये जिल्ह्यातील विविध विभागांनी ध्वजदिन निधीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्या त्या विभागाच्या विभागप्रमूखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तुषार वाघुळदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास माजी सैनिक, सैनिकांचे कुटूंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
०००
येथील अल्पबचत भवनमध्ये ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसि्थतांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी, जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी उपस्थित होते.
याप्रंसगी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित राहू शकतो. या सैनिकांप्रती समाजामध्ये नेहमीच आदराची भावना आहे. ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिकांच्या कुटूंबियांना विविध कारणांसाठी मदत करण्यात येते. यावर्षी जिल्हयाला 1 कोटी 68 लाख रुपयांचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरीकाने सामाजिक भावनेने ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी ध्वजदिन निधी संकलन व त्याचा विनियोग याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सन 2016 मध्ये जिल्ह्याला ध्वजदिन निधी संकलनाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 17 शहिद सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना ध्वज लावून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील वीरपिता श्री. रमेश देवराम पवार, वीरमाता श्रीमती साखराबाई धनाजी ठाकरे, श्रीमती इंदुबाई पुंडलिक पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई भिवसन पाटील, श्रीमती अनुसया काशीराम शिंदे, श्रीमती तुळसाबाई रोहिदास बागुल, श्रीमती चंद्रकला आनंदा जाधव, श्रीमती शैला अनंतराव साळुंखे, श्रीमती सुनंदा मनोहर पाटील, वीरपत्नी श्रीमती निर्मला सुवालाल हनुवते, श्रीमती कल्पना विलास पवार, श्रीमती सरला भानुदास बेडीस्कर, श्रीमती सुनंदा वसंत उबाळे, श्रीमती सुरेखा पोपट पाटील, श्रीमती कविता राजू साळवे, श्रीमती कल्पना देविदास पाटील, श्रीमती रंजना अविनाश पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर माजी सैनिकांच्या पाल्य सागर संजय ठाकणे, भूषण जगदिश सावकारे, तुषार नाना पाटील, श्रीमती निवेदिता सुनिल ताठे, रोहित अनिल बडगुजर यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष गौरव करण्यात आला. तर प्रियंका उत्तम डाकोरकर, हर्षाली विनायक पाटील, निकिता प्रमोद कापुरे यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सैन्य सेवेत असतांना साधारण मृत्यु पावलेल्या सैनिकांचे वारस श्रीमती कविता अनिल जाधव, श्रीमती मनिषा मनोहर माळी, श्रीमती सुवर्णा सतिश रोकडे यांना प्रत्येकी 75 हजार रुपयांची मरणोपरांत आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याधिकारी प्रभाकर गोविंदा सोनवणे यांनी ध्वजदिन निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सन 2016 मध्ये जिल्ह्यातील विविध विभागांनी ध्वजदिन निधीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्या त्या विभागाच्या विभागप्रमूखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तुषार वाघुळदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास माजी सैनिक, सैनिकांचे कुटूंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment