जिमाका- जळगाव, दि. 10 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत
2 कोटी 62 लाख रुपयांच्या सुधारित वार्षिक कृति आराखड्यास जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय अभियान समितीने मंजूरी
दिली असून या अभिानातंर्गत जिल्ह्यात आळींबी उत्पादन केंद्र व आवळा प्रक्रिया
उद्योगास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
श्री. निंबाळकर यांचा अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, कृषि
उपसंचालक अनिल भोकरे, लिड बँकेचे प्रतिनिधी राजन भावसार यांचेसह विविध संस्थाचे
प्रतिनिधी उपस्थित होते.
या
अभियानातंर्गत सन 2017-18 चा सुधारित वार्षिक कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नविन फळबागांची स्थापनेतंर्गत जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव व
जळगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन आळिंबी उत्पादन केंद्र, तसेच चाळीसगाव
तालुक्यातील शेतकऱ्यास फळ भाजीपाला प्रक्रिया केंद्र, केळीच्या खोडापासून धागा
निर्मिती केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच काढणी पाश्चात
व्यवस्थापक घटकातंर्गत रोपवाटिका तयार करणे, हळद प्रक्रिया उद्योग, वातानुकुलीत
वाहन, शीतगृह फळभाजीपाला साठवण केंद्र, प्राथमिक प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यास
जिल्हयातील तेरा शेतकरी व संस्थांना मंजूरी देण्यात आली आहे. तसेच संरक्षित शेती
अतंर्गत ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, सामुहिक शेततळे बांधणे, परागीकरणासाठी
मधुमक्षिका पालन करणे, मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील शेतकऱ्यांना
राज्यातंर्गत व राज्याबाहेर विविध प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासाठी नेण्यात
येणार आहे.
या
बैठकीत राष्ट्रीय कृषि विकास योजनेचा सन 2016-17 चा आढावा घेण्यात आला. यावेळी या
अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या उद्योगांचे सादरीकरण
केले.
000
No comments:
Post a Comment