जळगाव,
दि. 30 - शासनाने राज्यात जलयुक्त शिवार अभियान, जल व मृदसंधारणाची कामे
करण्यासाठी "जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामृग्री व्याज अर्थसहाय्य
योजना" सुरु केली आहे. या योजनेतंर्गत लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या
लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव बँकेकडे सादर करून कर्ज मंजुर करून घेण्यासाठी 7 जून
2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था यांनी दिली आहे.
या
योजनेतंर्गत सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगारांच्या सहकारी
संस्था, नोदणीकृत गटशेती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, यांना वित्तीय
संस्था अथवा बँकेकडुन 17.60 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज अर्थसहाय्य स्वरुपात
उपलब्ध करून देण्यात येते.
या
योजनेतंर्गत जिल्ह्यातील 49 सुशिक्षित बेरोजगार अर्जदार पात्र झालेले आहे. या
सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांनी वित्तीय संस्थेचे/बँकेचे विनाअट कर्ज मंजुरी अर्ज
त्यांचे लॉगीन आयडीवर अपलोड करावयाचे होते. परंतु अद्यापही काही पात्र अर्जदारांनी
विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र त्यांचे लॉगीन आयडीवर अपलोड केलेले नाही. अशा पात्र
लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव तयार करुन 19 मे, 2018 पर्यंत बँकेकडे सादर करावे व
कर्ज मंजुर करून घेण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु अद्यापही कर्ज वितरीत होवू
शकले नसल्याने त्यांना 7 जून पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे. या मुदतीत कार्यवाही
पूर्ण न केल्यास अशा अर्जदारांची नावे योजनेतून रद्द करण्यात येवून त्यांच्याऐवजी
प्रतिक्षाधीन यादीतील उमेदवारांना लाभार्थी म्हणून घोषित करण्यात येईल. व त्यांना
कर्जवाटप करण्यात येईल. असे श्री. जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment