जळगाव, दि. 1 - पुनर्रचित हवामान
आधारीत फळपिका विमा योजना सन 2018-19 साठी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये द्राक्ष,
केळी, संत्रा, मोसंबी,
पेरु, डाळिंब, आंबा, लिंबु व काजू या
फळपिकांकरीता योजना राबविण्यात येत आहे. ज्या महसुल मंडळात अधिसुचित फळपिकांचे
क्षेत्र 20 हे. किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा महसुल मंडळामध्ये योजना राबविण्यात
येते. कर्जदार शेतक-यांना योजना सक्तिची असुन बिगर कर्जदारांना ऐच्छिक आहे.
शेतक-यांकरीता विमा हप्ता संरक्षीत रकमेच्या 5 टक्के दर निर्धारीत करण्यात आलेला
आहे.
आंबिया बहार सन 2018-19 साठी ज्या
महसुल मंडळामध्ये योजना राबविण्यात येणार आहे अशा महसुल मंडळाची फळपिक/जिल्हा/
तालुका निहाय यादी कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली
आहे. सदर यादीमध्ये महसुल मंडळाच्या नावाच्या संदर्भात व 20 हे. किंवा त्यापेक्षा
जास्त असुन ही महसुल मंडळाच्या प्रस्तावीत करण्यात आलेल्या यादीमध्ये समावेश नाही.
असा कोणाचा आक्षेप असल्यास त्यांनी सबंधीत जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
यांच्याशी संपर्क करुन आपला आक्षेप 14 सप्टेंबर, 2018
पर्यंत नोंदवावा. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 000
No comments:
Post a Comment