जळगाव, दि. 30 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2018 या कालावधीत संविधान सप्ताह राबविण्यात जात आहे. या सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, समतादुत प्रकल्प (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय कार्यालयाच्या सहाय्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान सप्ताह निमित्ताने मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, चाळीसगाव यांच्यावतीने रेल्वे स्टेशन पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुहिक वाचानाने झाली. याप्रसंगी उप कोषागार अधिकारी विजय पाटील, वसतिगृहाच्या गृहपाल शुभांगी भालेराव, तालुका समन्वयक अनिल पगारे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक श्री. बच्छाव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रत्येक भारतीय व्यक्तीची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती केवळ संविधानानेच शक्य झाली आहे. तसेच संविधान हाच सर्वश्रेष्ठ कायदा असून त्याला अनुसरुनच इतर कायद्यांची निर्मिती झाली. सौ. भालेराव यांनी स्त्रियांना सन्मानाचे जगणे देणा-या संविधानाचा गौरव करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. आज महिलांसह वंचित घटकांना न्याय संविधानामुळेच मिळत असल्याचे सांगितले. या संविधान गौरव रॅलीची सुरुवात अप्पर पोलीस अधिक्षक बच्छाव यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून केली या वेळी मोठ्या प्रमाणात संविधानावर आधारित घोषणांनी परिसर वसतीगृहातील मुलींनी दणाणून सोडला होता. रॅलीची सांगता आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. श्री. योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.
संविधान सप्ताहानिमित्त प्रश्नोत्तरे व प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न
संविधान सप्ताहानिमित्त प्रत्येक तालुकास्तरावर संविधान जागर या कार्यक्रमातंर्गत चालता-बोलता प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमांचे महाविद्यालय, बसस्टॅन्ड, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विविध हौसींग सोसायटी येथे आयोजन करण्यात आले. त्यात सहभागी स्पर्धकांना संविधानाची प्रत व विजेता स्पर्धकांना संविधानाची प्रत व महाडचा सत्याग्रह या पुस्तकांची भेट पुरस्कार स्वरूपात देण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगांव श्री योगेश पाटील, कार्यालय अधिक्षक श्री गणेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समतादुत यांनी परिश्रम घेतले.
त्याचबरोबर अंधश्रध्दा निमुर्लन समिती व समाज कल्याण विभाग, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्पवती गुळवे कन्या हायस्कुल येथे संविधान जागर कार्यक्रमात वैज्ञानिक दृष्टीकोन व भारतीय संविधान याविषयी प्रश्नमंजुषा घेवुन जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जितेद्र धनगर, तालुका समन्वयक, जळगांव यांनी केले तर सुत्रसंचालन चद्रंकात इंगळे समतादुत यांनी केले
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री योगेश पाटील, अंधश्रध्दा निमुर्लन समिती, जळगांवचे जिल्हाध्यक्ष श्री डी. एस. कट्यारे, मुख्याध्यापक श्रीमती वैशाली पाटील, समतादुत प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव तसेच अन्य मान्यवर व सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक, समाज कल्याण, सर्व तालुका समतादूत उपस्थित होते.
०००
संविधान सप्ताह निमित्ताने मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, चाळीसगाव यांच्यावतीने रेल्वे स्टेशन पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुहिक वाचानाने झाली. याप्रसंगी उप कोषागार अधिकारी विजय पाटील, वसतिगृहाच्या गृहपाल शुभांगी भालेराव, तालुका समन्वयक अनिल पगारे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक श्री. बच्छाव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रत्येक भारतीय व्यक्तीची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती केवळ संविधानानेच शक्य झाली आहे. तसेच संविधान हाच सर्वश्रेष्ठ कायदा असून त्याला अनुसरुनच इतर कायद्यांची निर्मिती झाली. सौ. भालेराव यांनी स्त्रियांना सन्मानाचे जगणे देणा-या संविधानाचा गौरव करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. आज महिलांसह वंचित घटकांना न्याय संविधानामुळेच मिळत असल्याचे सांगितले. या संविधान गौरव रॅलीची सुरुवात अप्पर पोलीस अधिक्षक बच्छाव यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून केली या वेळी मोठ्या प्रमाणात संविधानावर आधारित घोषणांनी परिसर वसतीगृहातील मुलींनी दणाणून सोडला होता. रॅलीची सांगता आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. श्री. योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.
संविधान सप्ताहानिमित्त प्रश्नोत्तरे व प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न
संविधान सप्ताहानिमित्त प्रत्येक तालुकास्तरावर संविधान जागर या कार्यक्रमातंर्गत चालता-बोलता प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमांचे महाविद्यालय, बसस्टॅन्ड, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विविध हौसींग सोसायटी येथे आयोजन करण्यात आले. त्यात सहभागी स्पर्धकांना संविधानाची प्रत व विजेता स्पर्धकांना संविधानाची प्रत व महाडचा सत्याग्रह या पुस्तकांची भेट पुरस्कार स्वरूपात देण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगांव श्री योगेश पाटील, कार्यालय अधिक्षक श्री गणेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समतादुत यांनी परिश्रम घेतले.
त्याचबरोबर अंधश्रध्दा निमुर्लन समिती व समाज कल्याण विभाग, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्पवती गुळवे कन्या हायस्कुल येथे संविधान जागर कार्यक्रमात वैज्ञानिक दृष्टीकोन व भारतीय संविधान याविषयी प्रश्नमंजुषा घेवुन जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जितेद्र धनगर, तालुका समन्वयक, जळगांव यांनी केले तर सुत्रसंचालन चद्रंकात इंगळे समतादुत यांनी केले
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री योगेश पाटील, अंधश्रध्दा निमुर्लन समिती, जळगांवचे जिल्हाध्यक्ष श्री डी. एस. कट्यारे, मुख्याध्यापक श्रीमती वैशाली पाटील, समतादुत प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव तसेच अन्य मान्यवर व सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक, समाज कल्याण, सर्व तालुका समतादूत उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment