Saturday, 29 December 2018

जिल्ह्यातील चारा शेजारच्या जिल्हा अथवा राज्यात वाहतुकीवर निर्बंध आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर


        जळगाव,दि.29 :- जळगाव जिल्ह्यात भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असणे आवश्यक आहे. भविष्यात उत्पन्न होणाऱ्या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चारा शेजारच्या जिल्हा अथवा राज्यात वाहतूक करण्यास यापूर्वीच  निर्बंध घालण्यात आले आहे.
           तथापी सदर आदेशाचा कालावधी हा 60 दिवसापावेतो असलेने पुढील कालावधीसाठी आदेश पारीत करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर जळगाव हे जिल्ह्यातील चारा, लगतच्या जिल्ह्यांत किंवा लगतच्या राज्यात वाहतुक करण्यास निर्बध घालत आहे.
       आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती विरुद्ध, संस्थे विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यांत येईल.
         सदरचा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार सबंधितावर नोटीस बजविणेसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्याने टंचाईच्या परिस्थितीत एकतर्फी काढण्यात येत आहे. हा आदेश, आदेशाच्या दिनांकपासून 60 दिवसाच्या कालावधीसाठी लागू राहील. असे जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                         000

No comments:

Post a Comment