जळगांव दि. 26:- जिल्हयासाठी कृषी हा अत्यंत महत्वाचा घटक
असून कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने
कमी पाण्यात शेतक-यांना दुप्पट उत्पादन मिळेल अशा पिकांचे बियाणे नवीन
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करुन शेतक-यांना शाश्वत शेतीसाठी प्रवृत्त करावे
अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज केल्या .
जिल्हाधिकारी कार्याल्याच्या नियोजन सभागृहात आज खरीप हंगाम 2018 - 2019 चा आढावा व खरीप हंगाम
2019- 2020 नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन
बोलत होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन पाटील,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर , उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा अग्रणी
बॅकेचे अधिकारी अरुण प्रकाश , नाबार्डचे श्रीकांत जांभरे जिल्हा
परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख
शास्त्रज्ञ डॉ. एस.आर. बेडिस, पस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले , कृषी विज्ञान केंद्र ,
कृषी विभागाने आराखडा तयार करतांना बाजार पेठेचे विश्लेषण करुन कोणत्या काळात
कोणते पीक घेतल्यास शेतक-यांना चांगला लाभ
होईल याचा विचार करावा, यामुळे जिल्हयातील पीक पध्दती बदलण्यास मदत होवून
शेतक-यांना चांगला मोबदला मिळेल. शेतक-याने
शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुधनाचा वापर करुन
दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपला विकास
साधावा असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
डॉ. ढाकणे म्हणाले की, गेल्या दोन तीन वर्षापासून पावसाचे
प्रमाण कमी असल्यामुळे तसेच कपाशी सारख्या
पिकावर बोंडअळीचा प्रार्दभाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अडचणीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी नव नवीन संशोधनाचा वापर करुन कमी पावसात चांगले
उत्पादन कसे येईल अशा पिकांचे संशोधन करुन
शेतक-यांना कापसाबरोबर मका, ज्वारी, बाजरी,
मुग, उडीद असे कमी पावसात येणारे पिके घेण्यासाठी शेतक-यांना प्रवृत्त
करावे लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.ढाकणे म्हणाले की,
काही शेतकरी शेतमजूर मिळत नसल्यामुळे
शेती करत नाहीत, यासाठी कृषी विभागाने तालुका पातळीवर वेगवेगळे कृषी अवजारे बनविणा-या नामांकित कंपन्यांना आमंत्रित करुन कृषी
प्रदर्शनाचे आयोजन करुन अशा प्रदर्शनात शेतक-यांना कृषी अवजारांचा वापर कसा करावा
याबाबत आधुनिक प्रशिक्षण मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, विद्युत
विभागाबाबत शेतकरी वारंवार माझ्याकडे तक्रारी घेवून येतात. विज येते जाते यामुळे
अनेक शेतक-यांची विहिरीवरील मोटरी जळाल्या आहेत. यासाठी विद्युत विभागातर्फे
शेतक-यांच्या विद्युतपंपाचे इंन्शुरंश करुन घेता येईल का याबाबतही चर्चा केली.
तसेच विद्युत विभागाने शेतक-यांना
सिंचनासाठी लागणारी विज वेळेवर उपलब्ध करुन दयावी असे आवाहनही त्यांनी
यावेळी केले.
डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्हयातील 15 तालुक्यात ज्या
ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे अशा प्रत्येक तालुक्यातूल एक सामुहिक गट निवडून त्यांना राज्य व केंद्र
शासनाच्या वेगवेगळया स्किममधून निधी उपलब्ध
करुन जिल्हयात 1 हजार 500 हेक्टर सामुहिक गटशेती विकसित झाली पाहिजे त्याच प्रमाणे जिल्हयात शेडनेट शेतीस चालणा
देण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हयात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाणे कमी राहिले आहे.
पाण्याची कमरता पाहता नागरिकांनी पाण्याचा अतिशय काटकसरीने आणि जपून वापर करावा . शेतक-यांनी आगामी काळात कमी पाण्यात येणा-या
पिके घ्यावीत . आगामी खरीप हंगामासाठी शेतक-यांना
बँकांनी तत्काळ पतपुरवठा करावा.
कपाशीवरील बोंड अळी, मकावरील अमेरिकन
लष्कर अळी निर्मुलनासाठी शेतक-यांमध्ये
जनजागृती करावी. अशा सुचनाही डॉ.
ढाकणे यांनी दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी सांगितले सन 2019- 20 साठी जळगाव जिल्हयात 8 लाख 96 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयुक्त असून
8 लाख 10 हजार 209 हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात येणार आहे. खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, कापूस , तूर,
मुग, उडीद,भूईमुग , सोयाबीन, सुर्यफुल ,ऊस केळी आदी पिके घेतली जातात. खरीप
हंगामासाठी विविध प्रकारच्या 42 हजार 675
क्विंटल बियाणंचे नियोजन करण्यात आले असून कापसाच्या बियाण्याच्या 25 लाख पाकिटांची मागणी
करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगाम 2019 -20 करीता 340090 टन खतांचे आवंटन मंजूर केला असून
मार्च 2019 अखेर 332000 मे.टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र
संचलन श्रीमती काविरी राजपूत यांनी केले
तर आभार कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी
मानले. या बैठकीस जिल्हयातील सर्व विभाग
प्रमुख उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment