जळगाव.दि.26, महाराष्ट्रातील महिला गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे,
महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची हा उपक्रम
सुरू करण्यात आला आहे. महिलांमध्ये असलेल्या कल्पना,महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व
राज्याच्या विकासात सहभाग देण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेमुळे महिलांना
हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जळगाव शुभांगी भारदे यांनी जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित महिला
बचत गटांच्या हिरकणी महाराष्ट्राची या योजनेच्या मेळाव्यात आपल्या अध्यक्षीय
भाषणात महिलांना केले.
याप्रसंगी
जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उद्योजक मनोज बियाणी,गटविकास अधिकारी
श्री.सोनवणे,पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, सहाय्यक संचालिका कौशल्य विकास व
उद्योजिकता अनिसा तडवी हे उपस्थित होते.
प्रारंभी एनयुएलएमच्या गायत्री पाटील यांनी योजनेबद्दची
उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.तर गट विकास अधिकारी श्री.सोनवणे यांनी
एका सफल हिरकणीचे उदाहरण देवून उद्योगामध्ये सातत्य आणि चिकाटीचे महत्व विशद केले.
पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी , उद्योजक मनोज बियाणी ,जिल्हा नियोजन अधिकारी
प्रतापराव पाटील, कौशल्य विकासच्या सहाय्यक संचालिका अनिसा तडवी यांची नवउद्योजक
महिलांना उद्देशून प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
0000
No comments:
Post a Comment