जागतिक हिवताप दिनानिमित्त
25 एप्रिलरोजी प्रसिध्दीसाठी विशेष लेख
जागतिकस्तरावर गेल्या काही
दशकात हिवतापावर मात करण्यासाठी 25 एप्रिल रोजी जे
काही प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणुन
जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा
करण्यात येतो. हिवतापावर
मात करण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांबरोबर
जनतेचा सहभाग व इतर सहकारी यंत्रणेचे सहकार्यही
तितकेच महत्वाचे आहे. यादृष्टीने जागतिक आरोग्य
संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक
हिवताप दिन म्हणुन घोषीत केला आहे.
जागतिक हिवताप दिन
25 एप्रिल, 2020 रोजी जळगाव जिल्ह्यात जिल्हास्तरावरुन
जिल्हास्तरीय अधिकारी व सर्व तालुका आरोग्य
अधिकारी, वैद्यकीय
अधिकारी यांना जिल्ह्यात हिवताप आजार वाढणार
नाही. यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना
राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
हिवताप आजाराची लक्षणे - थंडी
वाजुन ताप येतो व ताप हुडहुडी भरते.
हा ताप एक दिवसाआड
किंवा दोन दिवसाआड येतो, अंग दुखणे, डोके दुखणे, घाम येवुन ताप कमी होते
आणि रुग्णास ताप, थकवा येतो. हा आजाराचा
प्रसार ॲनाफिलीस नावाच्या मादीमार्फत होतो. प्लाज्मोडिम
हा परजीवी डासामार्फत
व्यक्तीच्या रक्तात पोहचतात व लाल रक्त
पेशींवर आर.बी.सी हल्ला करतात. त्यामुळे ही
लक्षणे निदर्शनास येतात. यासाठी हिवतापाचे लवकर
निदान व त्वरीत औषधोपचार करुन घ्यावे, उपचार
न केल्यास वारंवार ताप येवुन रुग्ण बेशुध्द
होऊ शहतो. त्वरीत औषधोपचार न केल्यास या आजारामुळे प्रसंगी मृत्युही
ओढवु शकतो.
हिवताप नियंत्रणासाठी उपाय योजना- ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी
जावुन गृहभेटी देवुन
ताप रुग्ण शोधुन काढणे व तापसदृश्य रुग्णाचा
रक्त नमुना घेवुन प्राथमिक औषधोपचार करतात. व रक्त नमुना प्रयोगशाळेत
तपासणीसाठी पाठवीले जातात. रक्त नमुना दुषीत आल्यास वयोमानानुसार तात्काळ
समुळ उपचार केला जातो. जीवशास्त्रीय उपाय योजनेतंर्गत गप्पीमासे सोडल्याबाबत काटेकोर
अंमलबजावणी करण्यात येते व जनतेस
हिवताप विषयक आरोग्य शिक्षण देण्यात येते. स्थलांतरीत
मजुर प्रकल्प बांधकाम, विटभटी मजुरांचे सर्वेक्षण करुन गृहीत
उपचार करण्यात येतो.
बाहयरुग्णापैकी 15 टक्क् रक्तनमुने हे ओ.पी.डी
मध्ये हिवताप तपासणीसाठी संकलन केले जाते. कंटेनर सर्वेक्षण करण्यात
येते, व कोरडा दिवस पाळण्याबाबत जनजागृती
करण्यात येते.
जळगाव जिल्ह्यात
सन 2019 मध्ये 5 लाख 43 हजार 51 रक्त नमुने
घेऊन तपासण्यात
आले आहे. यामध्ये 4 नमुने दुषीत आढळून आले आहे. तर जानेवारी ते एप्रिल 2020
या
कालावधीत 1 लाख 30 हजार 202 रक्त नमुने घेऊन तपासण्यात आले आहे. यामध्ये 1 नमुना
दुषीत आढळून आला आहे.
भविष्यात हिवताप आजाराचे उद्रेक होवु नये म्हणुन आरोग्य खात्यामार्फत सर्व
प्रकारचे
नियोजन करण्यात
आले आहे. हिवताप आजारावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील
सर्व नागरिकांचे
सहकार्य आवश्यक
आहे. त्यासाठी खालील साधे व सोपे प्रतीबंधात्मक उपाय जनतेने राबविणे
गरजेचे आहे.
प्रतीबंधात्मक
उपाययोजना - आपल्या घराभोवती पाणी साचु देवु नका. घरातील पाण्याचे
सर्व
साठे शनिवारी
किंवा आपल्या सोयीनुसार आठवड्यातुन एकदा निश्चीत करुन रिकामे करावे. या
साठ्यातील आतील
बाजुस तळ घासुन पुसुन कोरडे करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट
झाकणाने झाकुन ठेवावीत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत व त्यात पाणी साचणार नाही
याची काळजी
घ्यावी. झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावीत. इमारतीच्या गच्चीवर पाणी
साचु देवु
नका, फ्रीज कुलरच्या ट्रे मध्ये पाणी साचु देवु नये. खिडक्यांना जाळया
बसवाव्यात. झोपतांना भारीत
मच्छरदाणी वापर करावा. घराच्या छतावरील फुटके डब्बे., टाकाऊ टायर्स, कप, मडकी इ. ची
वेळीच विल्हेवाट
लावा, संडासाचा पाईपला
वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी
बांधावा. दर
आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा क्रुड ऑईल टाकावे. हिवतापाची
तपासणी व
उपचार सर्व
प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, मनपा, नपा,
दवाखान्यात मोफत
उपलब्ध आहे.
याप्रमाणे
प्रत्येकाने दक्षता घेतल्यास
डासांची उत्पत्ती होणार नाही, व डास चावणार नाही,
म्हणजे योग्य
काळजी व वेळीच केलेला उपचार आपल्याला
होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवीन.
त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण होण्यासाठी
सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन
जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव यांनी केले आहे
0000
No comments:
Post a Comment