जळगांव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) - कल्याणकारी निधीमधून माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिष्यवृत्ती मिळणेकरीता इयत्ता दहावी, बारावी व पदवी परिक्षेमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगावमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती मिळणेबाबत अर्ज करण्यासाठी दि. 15 ऑक्टोबर, 2020 पर्यंत किंवा एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशिरा झाला असल्यास प्रवेश दिनांकापासून एक महिन्याच्या आत अर्ज स्वीकारले जातील, शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी दिनांक 15 नोव्हेंबर, 2020 पर्यंत करण्यात येईल, शैक्षणिक वर्ष 2020-21 वर्षासाठी प्रत्येक संवर्गातील गुणवत्तेनुसार यादी तयार करुन शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल, ज्या पाल्यांनी CET/JEE किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणासोबत Gap Certificate (प्रतिज्ञा पत्र) घेऊन शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करावे, डिप्लोमानंतर व्दितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांचेही अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज पाल्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्राच्या मार्कांची सरासरी काढून त्यांची शिष्यवृत्ती पात्र/अपात्र आहे असे ठरविले जाईल. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतांना फक्त एक वर्षाचे आतीलच अर्ज स्विकारले जातील. त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या व्यक्तींनी अर्ज करु नये. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment