Monday, 31 January 2022

विद्यापीठांर्गत महाविद्यालये तंत्रनिकेतन शैक्षणिक संस्थामधील नियमित वर्ग 1 फेब्रुवारी पासून ऑफलाईन पध्दतीने सुरु

                     जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचेकडील संदर्भ क्र. 1 वरील    दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजीचे परिपत्रकान्वये, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थामधील नियमित वर्ग दिनांक 1 फेब्रुवारी,  2022 पासून ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली असल्याने विद्यापीठ प्रशाळेतील व विद्यापीठाशी संलग्नित जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यासाठी नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या (ऑफलाईन) सुरु करण्यास परवानगी देणे, विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना त्यांची वसतिगृहे विद्यार्थ्यासाठी खुली करणे व विद्यापीठ / महाविद्यालयातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100% उपस्थितीबाबत परवानगी देणेबाबत संदर्भ क्र. 2 वरील अर्जान्वये आपणा इकडील कार्यालयास विनंती केलेली आहे.

                    संदर्भ क्र.1 वरील परिपत्रकातील मुद्दा क्र.1 मध्ये जिल्हयातील विद्यापीठ व संलग्निता महाविद्यालये ही ज्या आयुक्त महानगरपालिका / नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अंतर्गत येतात,  त्यांच्याशी कोविड- 19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्राचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेवून विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांचेस्तरावर घ्यावा व त्यानुसार महाविद्यालयांना ऑफलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरु करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना/ मानक प्रणाली  (SOPs) देणेबाबत सूचित केलेले आहे.

                                त्या अनुषंगाने जिल्हयातील कोविड -19  विषाणूच्या ओमिक्रॉन ( Omicrin) या नविन प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्गाची स्थानिक परिस्थिती विचारात घेवून जळगाव जिल्हयातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ प्रशाळेतील व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्य्यिता विद्यापीठे, तंत्रनिकेतने, व तत्सम शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या (ऑफलाईन) दिनांक 1 फेब्रुवारी, 2022 पासून खालील अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

                                ज्या गावात ॲक्टिव रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे अशा गावातील महाविद्यालये सुरु करावेत, ज्यांनी कोविड -19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशा विद्यार्थी / विद्यार्थीनींना विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील, तथापि लसीकरण ( दोन्ही डोस ) न झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थींनींना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन  सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

                    विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयाच्या परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या धोरणानुसार घेण्यात याव्यात, महाविद्यालयात कोणत्याही खेळाच्या स्पर्धा, क्रिडा स्पर्धा,, स्नेहसंमेलने, सामुहिक विद्यार्थी नृत्य, कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत, विद्यापीठ / महाविद्यालयात वर्ग खोल्यांमध्ये योग्य ते शारिरीक अंतर ठेवून विदयार्थ्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी.

                        प्राध्यापकांचे सभा कार्यशाळा, शिक्षण परिषदा शक्यतोवर ऑनलाईन घ्याव्यात. ऑफलाईन स्वरुपात किंवा एकत्रित गर्दी जमा होईल अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम सभा, संमेलने, परिषदा घेण्यात येवू नयेत, ज्या विद्यार्थी / विद्यार्थीनीनी कोविड -19 ची लस घेतलेली नाही. त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख / महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच आपल्या विद्यापीठातील / संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे.

                                विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थी / प्राध्यापक यांना ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांनाच प्रवेश राहील, विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील वसतिगृहाचा परिसर व खोल्यांचे निजंर्तुकीकरण करुन घेण्यात यावे, विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील वसतिगृहाच्या प्रवेशव्दाराजवळ सॅनिटाईजर व हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. मास्कचा वापर करणे आवश्यक राहील, जळगाव जिल्हयातील विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांनी कोविड – 19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामाच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निदेश, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली (SOPs), विद्यापीठ अनुदान आयोगाने तसेच जिल्हा प्रशासनाकडून कोविड-19 चे व्यवस्थापनाबाबत निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

                                उपरोक्त दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188,269,270 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Friday, 28 January 2022

परिवहन विभागाचा फेब्रुवारी महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहिर

       जळगाव, (जिमाका) दि. 28 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत फेब्रुवारी महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.        

फेब्रुवारी-2022 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण

 अमळनेर-पहिला व चौथा सोमवार, जामनेर-दुसरा बुधवार, पाचोरा-दुसरा शुक्रवार, भुसावळ-पहिला, दुसरा व चौथा गुरुवार, धरणगाव-तिसरा बुधवार, चाळीसगाव-पहिला, दुसरा व चौथा शुक्रवार, यावल - दुसरा मंगळवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा - दुसरा सोमवार, रावेर – पहिला मंगळवार, बोदवड - तिसरा गुरुवार, पारोळा - तिसरा सोमवार, एरंडोल – चौथा मंगळवार,  मुक्ताईनगर- तिसरा मंगळवार, वरणगाव – चौथा बुधवार याप्रमाणे दौरा राहील.          

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी   श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

                                                               0000

रहिखखॉ हसनखॉ यांनी बैतुल (मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात 31 जानेवारी रोजी उपस्थितीत राहावे

          जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- रहिखखॉ हसनखॉ रसलपूर जिल्हा जळगाव यांनी दिनांक 31 जानेवारी, 2022 रोजी बैतुल मध्यप्रदेश येथे न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थितीत राहावे बैतुल मध्यप्रदेश पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश अधिनियमांतर्गत प्रकरण क्रमांक 1/2021-22, गुरनं 122/20 मध्ये वाहनांचे लिलाव / निर्लेखन/ जप्ती करण्यासाठी प्रकरणाशी संबंधित साक्षीदार / आरोपी रहिखखॉ हसनखॉ, रा रसलपुर, जि. जळगाव यांना दिनांक 31 जानेवारी, 2022 रोजी  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बैतुल, मध्यप्रदेश यांचे न्यायालयात उपस्थितीत  राहण्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये नायब तहसिलदार, गृह शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, विलास हरणे यांनी एका प्रसिध्दीस  दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                   ००००

Thursday, 27 January 2022

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे यासाठी शेतकरी, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर अर्ज सादर करावा

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :-  :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील 460 गावामध्ये राबविण्यात येत आहे. ना.दे कृ. स. प्रकल्पातंर्गत सामूहिक लाभाच्या व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकरी, महिला बचतगट, शेतकरी  उत्पादक कंपनी आदींना देण्यात येत आहे.  आतापर्यत प्रकल्पातर्फे सामूहिक लाभाच्या बाबीमध्ये एकूण 22 गटांना विविध कृषी व्यवसाय उभारणीसाठी प्रकल्प मूल्याच्या 60 टक्के प्रमाणे एकूण रक्कम                        रु. 2,70,74,000/- इतके अनुदान वितरीत झाले आहे. यामध्ये 19 अवजार बँक, 1 हळद प्रक्रिया युनिट, 1 धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र, आणि 1 धान्य गोदाम हे घटक समाविष्ट आहेत. अजूनही इतर कृषी व्यवसाय प्रकल्प यांना पूर्वसमंती दिली असून त्यांची प्रापण प्रक्रियेव्दारे खरेदी प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यांतर्गत स्थापित शेतकरी उत्पादक कंपनी आणि प्रकल्पातंर्गत समाविष्ट गावातील शेतकरी गटांना प्रकल्पाअंतर्गत अनुज्ञेय असलेले घटक जसे गोदाम/ शेड/ छोटे वेअर हाऊस, कृषि उत्पादनाचे संकलन केंद्र, कृषि मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कृषि उत्पादनाचे वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, डाळ मिल व कलर सोर्टेक्स मशीन, फळ पिकवणी केंद्र, फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी शीतवाहन इत्यादीचा लाभ घेण्यासाठी dbt.mahapocra.gov.in  या संकेत स्थळावर अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष येथे संपर्क साधावा असे कळविले आहे.

००००

 

महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत

         जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :-  :- जळगाव जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज  महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, वरील योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे (Fresh) नुतनीकरणाचे (Renewal)  अर्ज भरण्यास दि. 31 जानेवारी, 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

                सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 31 जानेवारी, 2022 पर्यंत  https;//mahadbtmahait.gov.in  या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी तसेच कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

अनुसूचित जाती व नवबौध्द घटक बचत गटांना मिनी ट्रॅक्टर उपलब्ध सामाजिक न्याय विभागमार्फत उपक्रम

         जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :-  जळगाव जिल्हयातील अनुसुचित जाती व नवबौध्द  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सन 2021-22 पुरवठा करणे बाबतचा निर्णय शासनाने घेतलेला असून  पुढील अटी शर्ती पूर्ण करणाऱ्यांना याचा लाभ घेता येईल.

                महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक एसटीएस- 2011/प्रक्र439/अजारक-1 दि. 6 डिसेंबर 2012 आणि सामाकि न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक एसटीएस-2016/ प्रक्र 125/अजाक मुंबई दि. 8 मार्च 2017 अन्वये लाभार्भीचे पात्रतेचे निकष ठरविण्यताआले आहेत. या योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे-

                अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत, स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत, स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील असावेत, मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील, लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना ( रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.

 स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बॅकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे, निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे           ( परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्या नंतर व खातर जमा करुन लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरित 50 टक्के अनुदान मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यावर 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाचे बँक खात्यात जमा करण्यात येईल.

                बचतगटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्ट्रच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात यावे.

                या योजनेअंतर्गत बचतगटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने देण्यात आलेला मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने विकता येणार नाही, अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही. लाभार्थ्यांने मिनी टॅक्ट्रस विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहाय्यता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांकडून शासनाने मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी खर्च केलेली संपूण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित बचतगटाला शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान 5 वर्षे अपात्र ठरविले जाईल. अशा आशयाचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटांना करुन द्यावे लागेल.

                वरील अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी – बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, नियोजन विभागाच्या 5 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार वस्तु स्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्या बाबतचा निर्णय असल्याने बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स  प्रत, गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, बचत गटाचे घटनापत्र, बचत गट कार्यकारणी सदस्याची मुळ यादी, सदस्याचा स्वत:चा जातीचा दाखला, कोऱ्या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख, मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात ( लागू असल्यास) आणि विमा उतरविणेचा खर्च बचत गटांना करावयाचा आहे,  

बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज सादर करावे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील यांची नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

                   जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :-   डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2021-2022 मध्ये ज्या मदरसांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यात येते. तसेच पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देण्यात येत आहे. आणि ज्यांना आधुनिक शिक्षणाकरीता पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी फक्त निवासी मदरसा अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांना अल्पसंख्यांक विभागाच्या 11 फेब्रुवारी,2022 च्या शासन परिपत्रकान्वये प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सदरचे मदरसा/मदरसे चालविणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इच्छूक मदरशांनी 11 ऑक्टोंबर, 2013 च्या शासन निर्णयानुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत, अधिक माहितीसाठी  सदरचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती जाणून घ्यावी. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, जळगाव  प्रताराव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000

1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत ध्वनी प्रदुषण ( नियम व नियंत्रण ) नियम 2000 चे नियम 53 नुसार सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सुट देण्याबाबत आदेश पारीत

       जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :- 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 22 या कालावधीत ध्वनी प्रदूषण ( नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे नियम 53 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्हयाच्या निकडीनुसार 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याबाबत निर्देश दिलेले आहे.

                दिनांक 19 फेब्रुवारी, 2022 – छत्रपती शिवाजी महाराज जयंती, दिनांक 14 एप्रिल, 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक 1 मे, 2022 महाराष्ट्र दिवस, दिनांक 4 सप्टेंबर,2022 गणेशोत्सव 5 वा दिवस, दिनांक 6 सप्टेंबर, 2022 गणेशोत्सव 7 वा दिवस, दिनांक 9 सप्टेंबर, 2022 अनंतर चतुर्दशी, दिनांक 3 ऑक्टोंबर, 2022 नवरात्रौत्सव अष्टमी, दिनांक 4 ऑक्टोंबर, 2022 नवरात्रौत्सव नवमी, दिनांक9 ऑक्टोंबर, ईद-ए-मिलाद / कोजागिरी पोर्णिमा, दिनांक 26 ऑक्टोंबर, 2022 दिपावली, दिनांक 25 डिसेंबर,2022 ख्रिसमस , दिनांक 31 डिसेंबर, 2022 वर्षअखेर , तीन दिवस राखीव,

                अटी व शर्ती – मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे  व मा. न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, सदरील सुट ही राज्य शासनामार्फत घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक जळगाव व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांची राहील, सदर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजवण्याकामी सुट दिल्यानंतर ध्वनी प्रदूषण ( नियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे, ध्वनी प्रदूषण ( नियमन व नियंत्रण) नियम 2000 अंतर्गत स्थापन केलेल्या प्राधिकरणाने त्यांचेकडेस प्राप्त तक्रारींवर मा उच्च न्यायालयाने दिनांक 16 ऑगस्ट, 2016 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विहीत पध्दतीने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                                     ००००                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     

                                                                                                                                                                                                                                                                                                        

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावे

           जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :- पात्रता निकष -  लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिविका करणारे असाव, लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न रु. 1.00 लाख पेक्षा कमी असावे, लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे, लाभार्थी कुटुंब हे झोपडी /कच्चे घर / पालामध्ये राहणारे असावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा, लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल, लाभार्थी वर्षभरात सह महिने एका ठिकाणी वास्तवव्‍यास असावा,

          अटी व शर्ती :- या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांना मिळणारा भूखंडा व त्यावरील घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल, मात्र विधवा व परितक्त्या  स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील, या योजनेंतर्गत मिळालेला भूखंड व त्यावरील घर लाभार्थी कुटुंबास कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला,  कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करता येणार नाही, तसेच भूखंड व घर कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाही,  या योजनेतील लाभ कुटुंबातील एकाच कायदेशीर व्यक्तीस देण्यात येईल, भूखडावरील जागेचा वापर हा भाडे तत्वावर अन्य व्यक्तीस / कुटूंबास देता येणार नाही,  तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही तसेच विकता येणार नाही,  तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करण्यात येईल व मंजूर केलेल्या निधीची वसूली केली जाईल. प्रस्तुत घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायती कडून आकारण्यात येणारी वार्षीक घरपट्टी लाभार्थीने भरणे आवश्यक राहील व घराचे देखभाल व दुरुस्ती ही लाभार्थीने स्वता: करावयाची आहे,

                 लाभार्थाने सादर करावयाची कागदपत्रे – सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.00 लाखा पेक्षा कमी असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील वास्त्वया बाबतचे अधिवासी प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकूल योजनेचा लाभ घेतला नसल्या बदलचे रु 100/- च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, सदर योजनेचा लाभ ग्रामीण भागात देण्यात येईल, एकूण 10 पात्र लाभार्थी कुटुंबासाठी जमीन उपलब्ध होत असल्यास त्यांना सदरहू योजनेचा लाभ देण्यात येईल, ज्या लाभार्थ्यांकडे स्वता:ची जागा आहे, आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही त्यास सदर योजनेचा लाभ देता येईल.

                 सदर योजने करिता संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी पंचायत समिती किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्याकडे संपर्क साधण्यात यावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 31 जानेवारी, 2022 पर्यत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण याचेकडे अर्ज सादर करावेत

           जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :-  महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार नियमावली बाबतचा शासन निर्णय दि. 08 मार्च 2019 रोजी निर्गमीत करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहीत्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थाच्या कामाची दाद / दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहीत्यिक सरसावुन पुढे यावेत याकरीता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थासाठी एक असे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.

                सदर पुरस्कारासाठी पात्रता बाबतची नियमावली दिनांक 8 मार्च, 2019 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली असुन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर संबंधित शासन निर्णय उपलब्ध करुन देण्यात आला  असून त्याचा संकेतांक 201903082039003522  असा आहे.

                जळगाव जिल्ह्यातील इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी सदर पुरस्करासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव          डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर जळगाव यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह योग्य ती माहिती जोडून सीलबंद लिफाप्यात दिनांक  31 जानेवारी, 2022 पर्यत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

Tuesday, 25 January 2022

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न शासन आणि प्रशासन जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध -पालकमंत्री गुलाबराव पाटील

 
















      जळगाव, दि. 26 (जिमाका) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

          यावेळी मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास  उपस्थितांना शुभेच्छापर भाषणात  पालकमंत्री पाटील म्हणाले की,  गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोना सारख्या साथरोगाने ग्रासले असतांना सुद्धा जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासन व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य व सामंजस्य दाखवल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण न होता प्रगती अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करुन जिल्हावासियांचे आभार मानले.

          ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून महत्वाकांक्षी जलजीवन मिशन सुरु करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दरडोई किमान 55 लिटर पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ठ पार पाडले असून या कार्यक्रमांतर्गत विशेष आराखडा मोहिमेंतर्गत नळ पाणीपुरवठा नसलेल्या गावांकरीता नवीन योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाडी केंद्रांना नळांद्वारे शुध्द पेयजल पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले असून  पाणी गुणवत्ता सर्वेक्षणासाठी प्रत्येक गावातील पाच महिलांचा सहभाग ठेवण्यात आलेला आहे. जानेवारी 2022 पर्यत घरगुती नळजोडणी झाली असून वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेतंर्गत  शौचालये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

          जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नांना जिल्हावासियांनी चांगली साथ दिल्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येवू शकला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील  भरीव तरतूदीतून  जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक, कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळा सुरु केली आहे. जिल्ह्यातील उप जिल्हा व ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण झाले असून जिल्हा रुग्णालयात स्कॅनिंगची यंत्रणा सुरू केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयसीयु ,ऑक्सीजनयुक्त बेड तयार केले.

          शेतकरी हा राज्याचाच नव्हे तर देशाचा विकासाचा कणा असून  शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य  शासन तसेच प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,  राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली. या योजनेतून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली आहे. तर कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषि पंपाच्या वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथमवर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कृषिपंप ग्राहकाने चालू बिल भरणे आवश्यक आहे.

          निसर्गाचीही अवकृपेमुळे अतिवृष्टी, पूर, गारपीटचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना फटका बसला. राज्य शासन शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी धावून आले. जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे मदत करण्यात आली आहे. 

          जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन  कटिबद्ध असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती बेघर राहू नये, त्याला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य शासनामार्फत महाआवास अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मुख्यमंत्री महोदयांनी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेची जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अतिशय चांगल्याप्रकारे अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना लॉकडाऊनच्या काळात गोरगरिब व गरजूंसाठी वरदान ठरली आहे. यापुढेही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून व जिल्हावासियांच्या सहकार्याने जिल्ह्याची विकासाची घोडदौड यापुढेही सुरु ठेवण्यासाठी बांधील असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

          येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

          ध्वजारोहण समारंभानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली.                  

          प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकार प्रतापराव पाटील,  जळगाव शहर  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सौ.गिरासे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, राजेंद्र वाघ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते त्यांच्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहण करण्यात आले.

 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण

          मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी 8.00 वा. ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन राष्ट्रध्वजास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कृषि विभागाचे उप संचालक अनिल भोकरे, जिल्हा उप निबंधक (सहकार) संतोष बिडवई, सह जिल्हा निबंधक(मुद्रांक) सुनिल पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह प्रशासकीय इमारत आरातील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

                          जळगाव, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील बुधवार २६ जानेवारी  २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

                पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : बुधवार  २६ जानेवारी,२०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता पाळधी  येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण, सकाळी ८.१५ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन, सकाळी ८.१५ ते ९ पर्यंत राखीव,

                सकाळी ९.०८ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून पोलीस कवायत मैदानकडे प्रयाण, सकाळी ९.१३ वा. पोलीस कवायत मैदान येथे आगमन, सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण व राष्ट्रगीत, सकाळी ९.१७ ते ९.२७ वाजता मा. मंत्रीमहोदयांचे शुभेच्छापर भाषण, सकाळी ९.२७ ते ९.३१ वाजता स्वातंत्रय सैनिक व नागरीक यांना शुभेच्छा भेट, सकाळी ९.३१ ते ९.४५ वाजता चहापान, सकाळी १० वाजता रुग्ण व त्यांचे नातेवाईकाकरीता सुलभ शैचालयाचे उदघाटन, सकाळी १०.२० वाजता दंत विभागाच्या इमारतीचे नुतनीकरणाचे उदघाटन, सकाळी १०.४० वाजता कान, नाक, घसा विभागाच्या ऑडीयोमेटरी रुमचे उदघाटन, सकाळी १०.५० वाजता सुक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या म्युझियमचे उदघाटन, सकाळी ११.१० वाजता वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता सुलभ शौचालयाचे उदघाटन, सोईनुसार पाळधीकडे प्रयाण व राखीव, सायं ४ वाजता पाळधी येथून जामनेर पोलीस स्टेशन जामनेर कडे प्रयाण, सायं. ५ वाजता जामनेर पोलीस स्टेशन येथे आगमन व जामनेर पोलीस स्टेशन इमारतीचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार पाळधीकडे प्रयाण.

००००                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          

Monday, 24 January 2022

25 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस मुख्य प्रशासकीय इमारत सिनेट सभागृह कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे

                 जळगाव दि. 24 (जिमाका वृत्तसेवा)  : मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजी जिल्हयात 12 वा राष्ट्रीय दिवस जिल्हा व मतदान केंद्र स्तरावा कोवीड प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करुन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व मतदारांना सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपुर्ण निवडणूका हा विषय (Theme) भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.

                यावर्षीचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस मुख्य प्रशासकीय इमारत, सिनेट सभागृह, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. 25 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

                सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. कुलगुरु, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, पोलीस अधिक्षक, जळगाव तसेच आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक https;//www.facebook.com/jalgaonDm  या लिंकव्दारे करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाचा जिल्हयातील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

             जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठ व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण व संचलन समारंभ होणार आहे.

.               या कार्यक्रमास स्थानिक  लोक प्रतिनिधी, स्वातंत्रय सैनिक, शहिद जवानांच्या पत्नीना व आई-वडील , कोरोनायोध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक, यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे.

                जळगाव जिल्ह्यातील उदभवलेल्या कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक लक्षात घेता शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत  व पुनर्वसन विभाग यांच्या दि. 8 जानेवारी, 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय सभेकरीता निर्धारित केलेल्या संख्येनुसार निमंत्रितांची उपस्थिती ठेवण्यात यावी. मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी दिनांक 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 8.30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळा 8.30 च्या पूर्वी किंवा 10.00 च्या नंतर करावा.

                कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वासाठी मास्क वापरणे व सामाजिक अंतर (Social Distancing) पाळणे बंधनकारक आहे. तसेच सदर ठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी हा सोहळा घरबसल्या पाहता यावा. यासाठी सदर कार्यक्रमाचे  https;//www.facebook.com/jalgaonDM  या लिंकवर Facebook live  प्रेक्षपण करणेत येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००


 

Friday, 21 January 2022

जळगाव जिल्ह्यात ५फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू

         जळगाव, दि. २२ (जिमाका वृत्तसेवा): जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे.

                 या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                                                      0000

मा. भारत निवडणूक व राज्य निवडणूक आयोग वगळता अन्य निवडणुकांच्या प्रक्रियेस मनाई जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

         जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोग व मा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून नियोजित निवडणूक प्रक्रिया वगळून इतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यास मनाई राहील, अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

                जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, राज्यात कोविड -19 विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासन आदेश 8 व 9 जानेवारी, 2022 अन्वये सुधारीत निर्बध लागू करण्यात आलेले आहेत.

                शासन आदेशान्वये लागू केलेल्या सुधारीत निर्बंधामध्ये खासगी शिक्षण संस्था/ खासगी सोसायटी यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्याकामी परवानगी मिळण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज प्राप्त होत आहेत. मात्र, मा. भारत निवडणूक आयोग व मा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून नियोजित निवडणूक प्रक्रिया वगळून इतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यास मनाई राहील.

                न्यायालयीन बाब असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये संबंधित संस्था, सोसायटी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्याकडे विशेष बाब म्हणून परवानगीकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील.     ज्या संस्था / सोसायटी यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झालेली आहे, अशा सर्व संबंधित संस्था / सोसायटी यांनी सदरील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी.

                या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, भारतय दंड संहिता, 1860 चे कलम 269,270, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी नमूद केले आहे.

00000