जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.29- शासन निर्णय महाराष्ट्र शासन बहुजन कल्याण विभाग, क्रमांक सीबीसी-2019/प्र.क्र.127/मावक मुंबई दि 6 सप्टेंबर, 2019 अन्वये धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता निकष आहेत.
स्टँड
अप इंडिया योजनेअंतर्गत पात्र महिला नव – उद्योजक धनगर प्रवर्गातील असावा, धनगर
समाजातील महिला नवउद्योजकांनी एकूण प्रकल्प किमतीच्या 10% स्वहिस्सा भरणा
केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर
केल्यानंतर 15% हिस्सा राज्य शासनामार्फत
देण्यात येईल, स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत बँकेने कर्ज मंजूर केलेले असावे,
त्यासाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे
जातीचे प्रमाणपत्र, उद्योग ज्या नावाने नोंदणीकृत आहे त्या नावाने उद्योग आधार
नोंदणी पत्र, कर्ज मंजुरीचे बँकेचे पत्र इ. सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील
जास्तीत जास्त धनगर प्रवर्गातील महिला नव-उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव येथे
(0257-2263328-29) संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment