जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 22 –मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे कडील जनहित याचिका क्र. 02/2022 मधील दिनांक 15 सप्टेंबर, 2022 व दिनांक 6 ऑक्टोंबर, 2022 च्या आदेशान्वये शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत या वर्षाअखेर निष्कासित करण्याबाबत आदेशित केलेले आहे.
जळगाव
जिल्हयातील तालुकानिहाय शासकीय व गायरान जमीनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर तसेच तहसिल कार्यालय, पंचायत समिती,
नगरपरिषद व ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर शासकीय तसेच गायरान
जमीनीवर कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही प्रयोजनासाठी विनापरवानगीने वापरात आणुन त्यावर
अतिक्रमण केले असेल अशा सर्व व्यक्तींनी सदरचे अतिक्रमण स्वत:हून 24 तासांत काढून
घ्यावे व शासनास सहकार्य करावे, अतिक्रमणधारकाने स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास मा.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनातर्फे अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात
येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये
केले आहे.
No comments:
Post a Comment