जळगाव
दि. 11 ( जिमाका ) - गणेश उत्सव तसेच येणाऱ्या सणासुदीच्या काळात
बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन ई. अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
तसेच बऱ्याच गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते या काळात दुध व
दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई इ. अन्न पदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी
दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे
ग्राहकांना/भाविकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता
प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष
मोहिम हाती घेतलेली आहे.
प्रशासनातर्फे
ग्राहकांना/ भाविकांना सुरक्षीत व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने
अन्न व्यावसायिकांना/गणेश मंडळांना खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
गणेश मंडळांनी महाप्रसाद बनविणे तथा वितरणासाठी
ऑनलाईन पध्दतीने अन्न परवाना/नोंदणी अर्ज करुनच महप्रसादाचे वितरण करावे, गणेश मंडळांनी महाप्रसाद स्वच्छ व आरोग्यदायी
जागेतच जागेत तयार करावा, तसेच खुल्या
जागेत, रस्त्यावर तयार करु नये, गणेश मंडळांनी कच्चे अन्नपदार्थाचे खरेदी बिले
घेवून जतन करावेत, गणेश मंडळांनी
महाप्रसाद तयार करत असतांना ताजे अन्नदार्थ तयार करुन त्याचे वितरण त्वरीत करावे, गणेश मंडळांनी महाप्रसाद तयार करत असतांना अन्न
विषबाधा होईल अशा पदार्थांचा अंर्तभाव करु नये, जसे दुध व दुग्धजन्य पदार्थ. गणेश मंडळांनी महाप्रसाद तयार करण्यासाठी
पिण्यास योग्य असलेले पाण्याचा वापर करावा व ते स्वच्छ व आरोग्यदायी ठिकणीच
साठवणुक करावीत,
मिठाई
विक्रेत्यांसाठी सुचना
मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रे वर दर्शनी भागात
वापरण्यायोग्य दिनांक (Use by date) टाकावा, मिठाई विक्रेत्यांनी कच्चे अन्न
पदार्थ जसे दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी हे परवानाधारक / नोंदणीधारक
व्यावसायिकांकडुनच खरेदी करावेत व त्यांची खरेदी बिले जतन करावीत.
मिठाई विक्रेत्यांनी अन्न पदार्थ तयार
करण्यासाठी पिण्यासयोग्य पाण्याचा वापर करावा, मिठाई विक्रेत्यांनी अन्न पदार्थ
स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत, मिठाई विक्रेत्यांनी त्वचा व संसर्गजन्य
रोगापासून मुक्त या बाबत कामगाराची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई विक्रेत्यांनी मिठाई तयार करतांना केवळ
फुड ग्रेड खाद्यरंगाचाच १०० पी.पी.एम.च्या मर्यादेत वापर करावा, मिठाई
विक्रेत्यांनी दुग्धजन्य पदार्थाची मिठाईचे सेवन त्वरित करण्याबाबत ग्राहकांना
अवगत / सुचित करावेत, मिठाई विक्रेत्यांनी माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून
अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकुन्न ठेवावे,
मिठाई विक्रेत्यांनी अन्नपदार्थ
तयार करतांना वापरण्यात येणारे खाद्यतेला २-३ वेळाच तळण्यासाठी वापरण्यात
यावे, नंतर वापरलेले तेल RUCO
अंतर्गत नेमण्यात आलेल्या aggregator यांना देण्यात यावे, मिठाई विक्रेत्यांनी स्पेशल बर्फीचा वापर हा
खवा किंवा मावा या अन्नपदार्थाना पर्याय म्हणून करु नये, मिठाई विक्रेत्यांनी त्यांचे विक्री बिलांवर
त्यांचेकडील FSSAI परवाना क्रमांक नमुद करावा, मिठाई विक्रेत्यांनी दुध, दुग्धजन्य पदार्थ,
खवा, मावा या सारख्या नाशवंत पदार्थाची वाहतुक ही योग्य तापमानास व सुरक्षीतरीत्या
करण्यात यावी, गणेश मंडळांनी तसेच अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा
२००६, नियम व नियमने मधील तरतुदींचा भंग
केल्याचे आढळल्यास त्यांचे विरुध्द कठोर कारवाई घेण्यात येईल नोंद घ्यावी, असे आवाहन
सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment