जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या वतीने संचालित
सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक
२३ जून २०२५ पासून सुरू होत आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील जवळील तालुक्यांमध्ये शिक्षण
घेणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
या
वसतिगृहात युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा तसेच सैनिकांच्या अनाथ पाल्यांसाठी प्रवेश
पूर्णपणे मोफत असून, अन्य आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात
येणार आहे. तसेच अतिरिक्त जागा उपलब्ध असल्यास इतर नागरी विद्यार्थ्यांनाही प्रवेश
देण्यात येणार आहे.
जेवण
व निवासाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, शारीरिक प्रशिक्षण, गरम पाण्यासाठी
सोलर सिस्टीम, उत्कृष्ट खेळाचे मैदान, सांस्कृतिक कार्यक्रम व सण-उत्सवांचे आयोजन तसेच
वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अशी विविध सोयी वसतिगृहात उपलब्ध
आहेत.
दरपत्रक (प्रति महिना) –
अधिकारी व ऑननरी रँक : ₹ ३,०००
जे.सी.ओ. : ₹ २,८००
शिपाई / एनसीओ : ₹ २,५००
युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व अनाथ पाल्य : मोफत
इतर नागरी विद्यार्थी : ₹ ३,५०० (भोजन, निवास व सेवा करासह)
वसतिगृह
प्रवेश अर्ज सैनिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी
लवकरात लवकर संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करावेत. प्रवेशासाठी "प्रथम अर्ज, प्रथम
प्राधान्य" हे धोरण अवलंबले जाणार असल्याने इच्छुकांनी विलंब न करता अर्ज करावेत,
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी
केले आहे.
अधिक माहितीसाठी संजय रा. गायकवाड – मो.
८४५९६ ८७३८८ / दूरध्वनी ०२५७-२२४१४१४, समाधान धनगर – मो. ७३७८९ ४२३२७ / दूरध्वनी ०२५७-२२३३०८८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000000000000
No comments:
Post a Comment