जळगाव, दि. 17-जिल्हयातील केळीचे पीक
मोठया प्रमाणावर घेण्यात येते. केळी हे जिल्हयाचे प्रमुख पीक असून केळीचे उपपदार्थ
निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले. राष्ट्रीय कृषी विकास
योजने अंतर्गत प्राप्त प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा अभियान समितीची सभा
त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीस कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय मस्कर सभेस मार्गदर्शन करतांना श्री. निंबाळकर म्हणाले जिल्हयात आंबा
लागवडीसाठी प्रयत्न झाले पाहिजे तसेच आंतर पीके, शेतीला जोड व्यवसाय, गोदाम योजना
आदि विषयावर चर्चा झाली.
सभेत येथील जलश्री तर्फे शास्त्रज्ञ
स्वाती संवत्सर यांनी खान्देश मल्टी स्कील, ट्रेनिंग सेंटर फॉर ॲडव्हन्समेंट इन
ॲग्रीकल्चर आणि अर्टीकल्चर च्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली सदर प्रस्तावासाठी
307.08 लक्ष खर्च अपेक्षीत असून या मध्ये फलोत्पादन, मातीतील मुलद्रव्य
व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवसास्थापन व पणन, कृषि विस्तार प्रशिक्षण व कौशल्य
विकास या मुख्य बाबींचा समावेश आहे. या संस्थे मार्फत दरवर्षी 15 हजार 275 शेतकरी
प्रशिक्षीत होणार आहे.
०००
No comments:
Post a Comment