जळगाव, दि. 15 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने 21 फेब्रुवारी, ते 20 मार्च, 2018 या
कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता बारावी) व 1 मार्च ते 24 मार्च,
2018 माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) घेण्यात येणार आहे. या परिक्षेच्या
वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परिक्षा केंद्राच्या
ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
याकरीता या काळात परिक्षा केंद्राच्या
ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी. म्हणून
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1) (2) खाली प्रदान केलेल्या अधिकारानुसार
या कालावधीत पेपर सुरु झालेपासून ते संपेपर्यतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व
परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. हा आदेश परिक्षार्थी, नियुक्त
कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही.
तसेच परिक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर
परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स
दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद
ठेवण्यात यावेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जारी केले
आहेत.
०००
No comments:
Post a Comment