जळगाव, दि. १४ - खरीप हंगाम २०१७ मध्ये
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना ४८ कोटी रुपयांची नुकसान
भरपाई मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी
दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत खरीप
हंगाम २०१७ मध्ये जिल्ह्यातील ८५ हजार ५७८ शेतकऱ्यांनी कापूस, ज्वारी, बाजरी आदि
विविध पिकांचा विमा काढला होता. यासाठी या शेतकऱ्यांनी १६ कोटी ३३ लाख २९ हजार ६२४
रुपयांचा हप्ता भरला होता. मागील हंगामात विविध कारणांमुळे झालेल्या नुकसानीपोटी
जिल्ह्यातील ३० हजार ६६३ शेतकऱ्यांना ४७ कोटी
९४ लाख ८२ हजार ४८० रुपयांचा विमा मंजूर झाला असून ही रक्कम नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहितीही श्री. सोनवणे यांनी
दिली.
000
No comments:
Post a Comment