जळगाव, दि. 1 - जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील आरक्षित पिण्याच्या पाणी
साठ्यातून पाण्याची चोरी होणार नाही, तसा
प्रयत्न कोणी केला तर विद्युत विभागाने तातडीने त्यांचे वीज कनेक्शन बंद करावेत.
अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक
बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सबंधित यंत्रणांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन
सभागृहात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील
पिण्याचे पाणी आरक्षित करणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत
होते या बैठकीस राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खा. ए. टी. नाना पाटील, खा. रक्षा खडसे, महापौर सिमा
भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
शिवाजी दिवेकर, महानगरपालीका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक
दत्तात्रय शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी पाणी आरक्षित करण्याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी दोन दिवसात लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय
घ्यावा असे सांगितले.
पालकमंत्री
चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे काही लोक प्रतिनिधीनी मागणी केली की, जिल्ह्यातील 150 गावांत पाण्याची टंचाई निर्माण
झाली असून यासाठी गिरणा नदीचे आवर्तन तात्काळ सोडले गेले पाहिजे. त्यामुळे
टंचाई असलेल्या गावांचा पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. याबाबत लवकरच बैठक बोलवून निर्णय घेण्यात येईल असे
पालकमंत्र्यांनी सांगीतले.
यावेळी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी
पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांतील
पाणीसाठा विषयी माहिती देतांना सांगितले की, हतनुर धरणात 98 टक्के पाणी साठा,
गिरणा 48 टक्के तर वाघुर धरणात 46 टक्के पाणीसाठा आहे. गिरणा धरणातून नांदगांव,
मालेगावसह 56 गावांना तसेच मालेगाव महानगरपालिका तसेच चाळीसगाव नगरपालिकेला पाणी
पुरवठा केला जातो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या
बैठकीस आ. स्मिता वाघ, आमदार सर्वश्री. किशोर दराडे डॉ. सतिष पाटील, संजय
सावकारे, सुरेश भोळे, शिरीषदादा चौधरी, उन्मेश पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत
सोनवणे हे उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment