Friday, 13 September 2019

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक तृणधान्य दिन कार्यशाळा संपन्न


            जळगाव.दि.13:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियांतर्गत सन 2019-2020 अंतर्गत पौष्टीक तृणधान्य ज्वारी, बाजरी पिकांचे प्रामुख्याने क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी पौष्टीक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018-2019 हे व 2019-2020 हे राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे म्हणून केंद्र शासनाने जाहीर केली आहेत.
            पौष्टीक तृणधान्यांचे उत्पादन व स्वास्थ आहाराचे महत्व याबाबत व्यापक जनजागृतीच्या दृष्टीने पौष्टीक तृणधान्य दिवस साजरा करावयाचा आहे. कृषि महाविद्यालय, आहारतज्ञ, सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला बाल विकास, आरोग्य विभाग, कृषि विकास अधिकारी अधिकारी, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवायचा आहे. दिनांक 8 सप्टेंबर,2019 रोजी पुर्वतयारी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेत  आहार तज्ञ डॉ.अनंत पाटील यांनी पारंपारीक पौष्टीक चविष्ठ अन्न एक काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
*****

No comments:

Post a Comment