Saturday, 31 July 2021

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विनम्र अभिवादन



             जळगाव, दि.1- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.         

            याप्रसंगी तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार अमित भोईट आदिंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

Friday, 30 July 2021

जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 31 -  राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे मोठी जिवीतहानी व नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त व बाधितांना मदतीसाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.

            महापूर, दरड कोसळल्यामुळे व लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, औषधोपचार आदि मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

            अशावेळी सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व या उद्देशाने स्थापन झालेल्या राज्यातील सर्व धर्मादाय संस्था (ट्रस्ट) यांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. जेणेकरुन गरजूंना शक्य ती मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधुन गरजूंना धर्मादाय संस्था यांनी शक्य ती मदत करावी. असे आवाहन प्र. श्रा. तरारे, धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

            तसेच आर्थिक स्वरुपात मदतीसाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत खालील बँक खात्यावर चेक किंवा डी.डी. व्दारे शक्य तितक्या लवकर द्यावी.

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी बॅक खात्याचा तपशील

मुख्यमंत्री सहाय्यता निधी –

बचत खाते क्रमांक- 10972433751, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई-400 001,

शाखा कोड- 00300,

आयएफएस कोड – SBIN0000300 असे आहेत.

           

            तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व धर्मादाय संस्थांनी जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून आवश्यक ती मदत करावी. तसेच जास्तीत जास्त आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करावी. असे धर्मादाय उप आयुक्त (प्र.) जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्व्ये कळविले आहे.

00000

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन 10 ऑगस्टपर्यत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 30 - शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नियम अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https//sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, 2021 असा आहे.

 या स्पर्धेतील प्रथम क्रमाकांच्या विजेत्याला 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला 30 हजार रुपये तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 20 हजार रुपये पारितोषिक प्रदान करण्यात येईल. असे मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

राष्ट्रीय रुरबन अभियानातंर्गतच्या कामांना गती द्यावी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

             जळगाव, (जिमाका) दि. 30 - केंद्र शासनाच्या डॉ शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध कामांना गती देण्याबरोबर अद्याप जी कामे सुरु व्हावयाची आहेत ती कामे सर्व संबंधित यंत्रणानी तातडीने सुरु करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिलेत.

            राष्ट्रीय रुरबन मिशन नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. सिन्हा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, डॉ शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गाव समुह, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गाव समुह व बोदवड तालुक्यातील ऐणगाव गावसमुहाची निवड करण्यात आली असून या समुहातील गावांमध्ये शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे आणि कृषी व कृषीशी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यासाठी यंत्रणांनी कामे सुचवून ती तातडीने सुरु करावी. ही कामे सुरु करतांना काही अडचणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अडचणी दूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.  तसेच या कामांची नोंद करुन त्यांचे जीओ टॅग करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

            या अभियानातंर्गत हरताळा गाव समुहातील सहा गावांमध्ये 342.96 कोटी रुपयांच्या 310 कामांची नोंद करावयाची असून त्यापैकी 201 कमांची नोंद केली आहे. तर 193 कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. पातोंडा गाव समुहातील चार गावांमध्ये 97.03 कोटी रुपयांच्या 216 कामांची नोंद केली आहे. तर 95 कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. तसेच ऐनगाव गाव समुहातील चौदा गावांमध्ये 71.55 कोटी रुपयांच्या 145 कामांची नोंद करावयाची असून त्यापैकी 46 कमांची नोंद केली असल्याची माहिती सदस्य सचिव श्री. लोखंडे यांनी बैठकीत दिली.

00000

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा

             जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या महिन्याचा जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 2 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे.

            यादिवशी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक देखील होणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील विभागांचा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन व त्याबाबतचा निपटारा करुन यादिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                    00000

Thursday, 29 July 2021

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेच्या वेळापत्रकात बदल

             जळगाव, (जिमाका) दि. 29 - सप्टेंबर-2021 मध्ये होणाऱ्या शिकाउ उमेदवारांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 9 ते 27 ऑगस्ट, 2021 असा असून परीक्षा 25 ते 29 सप्टेंबर, 2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

            त्यापूर्वी सर्व शिकाउ उमेदवारांनी तसेच संबंधित आस्थापनांनी परीक्षेपुर्वीची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. असे आर. पी. पगारे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

रोहयोच्या माध्यमातून नाशिक विभागातील 36 हजार 126 मजूरांच्या हाताला काम; विभागात रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरु : उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले

             दि, 29 जुलै 2021, (विमाका वृत्तसेवा):- शेतकरी समृद्ध करण्यासाठी रोहयो अंतर्गत येणारे उपक्रम शासनामार्फत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मागेल तेव्हा काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरु असून या कामावर दिवसाला 36 हजार 126 मजूर काम करत आहे, अशी माहिती उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले यांनी दिली आहे.

            नाशिक विभागात रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 36 हजार 126 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 5 हजार 649 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 23 हजार 027 मजूर काम करत आहेत. तसेच 2 हजार 181 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 13 हजार 098 मजूर दिवसाला काम करत आहेत. 

 

नाशिक जिल्ह्यात 1 हजार 766 कामांवर 7 हजार 770 मजूर कामावर

            नाशिक जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 766 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 7 हजार 770 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 938 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 4 हजार 232 मजूर काम करत आहेत. तसेच 828 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 539 मजूर काम करत आहेत. 

 

अहमदनगर जिल्ह्यात 1 हजार 941 कामांवर 9 हजार 586 मजूर कामावर

            अहमदनगर जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 941 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 9 हजार 586 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 428 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 5 हजार 923 मजूर काम करत आहेत. तसेच 513 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 663 मजूर काम करत आहेत. 

 

 

 

 

धुळे जिल्ह्यात 584 कामांवर 2 हजार 662 मजूर कामावर

            धुळे जिल्ह्यात रोहयोची एकूण 584 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 2 हजार 662 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 481 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 2 हजार 47 मजूर काम करत आहेत. तसेच 103 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 615 मजूर काम करत आहेत. 

 

जळगांव जिल्ह्यात 1 हजार 673 कामांवर 8 हजार 92 मजूर कामावर

            जळगांव जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 673 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 8 हजार 92 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 388 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 6 हजार 453  मजूर काम करत आहेत. तसेच 285 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 1 हजार 639 मजूर काम करत आहेत. 

 

नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 866 कामांवर 8 हजार 16 मजूर कामावर

            नंदुरबार जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 866 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 8 हजार 16 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 414 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 4 हजार 373  मजूर काम करत आहेत. तसेच 452 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 643 मजूर काम करत आहेत.

00000

पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान आयोजन

             जळगाव, (जिमाका) दि. 29 - जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 जुलै ते 2 ऑगस्ट, 2021 दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी/एसएचसी/ग्रॅज्युएट/डिप्लोमा आयटीआय पात्रतेची एकूण 200 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

            या मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगईन करुन ॲप्लाय करावा.

            याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहू नये. असे आवाहन डॉ. राजपाल कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव, (जिमाका) दि. 29 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.        

            शुक्रवार, दि. 30 जुलै, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून किनोद, ता. जळगावकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता किनोद, ता. जळगाव येथे आगमन व नियोजीत कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमास भेटी व उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून चोपडाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा तालुक्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे प्रयाण व राखीव.          

00000

Wednesday, 28 July 2021

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 28 - केंद्रिय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रिय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्यावतीने त्या त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात.

            या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविलर जातो. राज्य शासनाकडून या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्याच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सचिवालय जिमखान्यावर सोपविलेली आहे.

            तरी जळगाव जिल्ह्यातील ज्या शासकीय खेळाडू कर्मचाऱ्यांना टेबल टेनिस, बॅडमिन्टन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रिज, कॅरम, बुध्दिबळ, ॲथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावर लिफ्टींग, शरीरसौष्टव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव यांच्याकडून विहित मुदतीत प्राप्त करुन घ्यावेत.

            प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे आवेदनपत्र भरुन ते कार्यालय प्रमुख/ विभागप्रमुख यांच्या मान्यतेने एक आगाऊ प्रतिसह व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, 6, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई यांच्याकडे 31 नोव्हेंबर, 2021 पर्यंत टपालाव्दारे किंवा व्यक्तीश: तसेच sachivalayagym@rediffirmail.com  या ईमेलवर पाठवावीत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरण्यासाठी 29 जुलै रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

             जळगाव, (जिमाका) दि. 28 - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैशाली हिंगे यांनी केले आहे.

            आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज सादर केल्यानंतर तीन ते पाच महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समितीकडून निर्णय घेतला जातो. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला पुरेसा अवधी मिळणे आवश्यक असते. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्याना तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत.

            ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचेही श्रीमती हिंगे यांनी म्हटले आहे.

गुरुवारी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

            जळगाव जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यरत आहे. इयत्ता 12 वी विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी मागासप्रवर्गातुन नियुक्त असणारे अधिकारी/कर्मचारी, मागास प्रवर्गातून निवडणुक लढविणारे उमेदवार इत्यादीना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येते.

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासन ऑनलाईन सुविधा 1 ऑगस्ट 2020 सुरु करीत आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता मोफत मार्गदर्शन शिबिर 29 जुलै, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता गुगल झुम ॲपवर होणार असून याचा मिटींग आयडी 88315482834  असा असून पासवर्ड OcU३Qg हा आहे.

            यावेळी अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पाईट प्रेझेटेशनव्दारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

            तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादीनी या बेबीनारमध्ये सहभागी होवुन मार्गदर्शन घ्यावे. असे आवाहन अध्यक्ष प्रकाश वायचळ, उपायुक्त तथा सदस्य श्रीमती वैशाली हिंगे व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बी. यु. खरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

00000

स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 28 - बहुजन कल्याण विभागाच्या 6 सप्टेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांना देण्यात येणार आहे.

            धनगर समाजातील महिला नवउद्योजकांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

            धनगर महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग आधार नोंदणीपत्र, जात प्रमाणपत्र व बॅकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील महिला उद्योजकांना आवाहन

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठीही स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे.

            अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील महिला नवउद्योजक यांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

            या अटींची पूर्तता करीत असलेल्या महिला उद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

सैनिक मुलींचे वसतिगृहातील कंत्राटी चौकीदार पदासाठी 5 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 जळगाव, (जिमाका) दि. 28 - सैनिक मुलींचे वसतीगृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे असून या वसतिगृहात चौकीदार पद कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. सदरचे पद हे 24 तास कामाचे असून दरमहा 8911 रुपये इतके एकत्रित मानधन देण्यात येईल. या पदाकरीता 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माजी सैनिक तसेच इतर नागरीक यांनी 5 ऑगस्ट, 2021 च्या आत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येऊन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

        जळगाव, (जिमाका) दि. 28 - राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, 30 जुलै, 2021 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत कौशल्यातून रोजगाराकडे (आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

            या मार्गदर्शन शिबिरात श्री. नितीन जाधव, कौशल्य अभियान अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, दुपारी 3.00 ते 3.25 या वेळेत, श्री. श्रीपाद दिगंबर आमले, फाऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर, आस्थापना ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी, ओ.पी.सी. प्रा. लि. पुणे हे दुपारी 3.25 ते 3.50 या वेळेत, डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती हे दुपारी ३.५० ते ४.१५ या वेळेत तर डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिध्द प्लास्टिक सर्जन, लातूर दुपारी ४.१५ ते ४.४० या वेळेत आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार असून दुपारी 4.40 ते 5.00 वाजेपर्यंत पश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.

            या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युट्युब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A

00000

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

            जळगाव, (जिमाका) दि. 28 - केंद्रिय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रिय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्यावतीने त्या त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात.

            या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविलर जातो. राज्य शासनाकडून या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्याच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सचिवालय जिमखान्यावर सोपविलेली आहे.

            तरी जळगाव जिल्ह्यातील ज्या शासकीय खेळाडू कर्मचाऱ्यांना टेबल टेनिस, बॅडमिन्टन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रिज, कॅरम, बुध्दिबळ, ॲथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावर लिफ्टींग, शरीरसौष्टव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव यांच्याकडून विहित मुदतीत प्राप्त करुन घ्यावेत.

            प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे आवेदनपत्र भरुन ते कार्यालय प्रमुख/ विभागप्रमुख यांच्या मान्यतेने एक आगाऊ प्रतिसह व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, 6, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई यांच्याकडे 31 नोव्हेंबर, 2021 पर्यंत टपालाव्दारे किंवा व्यक्तीश: तसेच sachivalayagym@rediffirmail.com  या ईमेलवर पाठवावीत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरण्यासाठी 29 जुलै रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

            जळगाव, (जिमाका) दि. 28 - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैशाली हिंगे यांनी केले आहे.

            आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज सादर केल्यानंतर तीन ते पाच महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समितीकडून निर्णय घेतला जातो. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला पुरेसा अवधी मिळणे आवश्यक असते. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्याना तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत.

            ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचेही श्रीमती हिंगे यांनी म्हटले आहे.

गुरुवारी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

            जळगाव जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यरत आहे. इयत्ता 12 वी विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी मागासप्रवर्गातुन नियुक्त असणारे अधिकारी/कर्मचारी, मागास प्रवर्गातून निवडणुक लढविणारे उमेदवार इत्यादीना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येते.

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासन ऑनलाईन सुविधा 1 ऑगस्ट 2020 सुरु करीत आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता मोफत मार्गदर्शन शिबिर 29 जुलै, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता गुगल झुम ॲपवर होणार असून याचा मिटींग आयडी 88315482834  असा असून पासवर्ड OcU३Qg हा आहे.

            यावेळी अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पाईट प्रेझेटेशनव्दारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

            तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादीनी या बेबीनारमध्ये सहभागी होवुन मार्गदर्शन घ्यावे. असे आवाहन अध्यक्ष प्रकाश वायचळ, उपायुक्त तथा सदस्य श्रीमती वैशाली हिंगे व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बी. यु. खरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

000000

स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 28 - बहुजन कल्याण विभागाच्या 6 सप्टेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांना देण्यात येणार आहे.

            धनगर समाजातील महिला नवउद्योजकांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

            धनगर महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग आधार नोंदणीपत्र, जात प्रमाणपत्र व बॅकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील महिला उद्योजकांना आवाहन

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठीही स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे.

            अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील महिला नवउद्योजक यांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

            या अटींची पूर्तता करीत असलेल्या महिला उद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

सैनिक मुलींचे वसतिगृहातील कंत्राटी चौकीदार पदासाठी 5 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 28 - सैनिक मुलींचे वसतीगृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे असून या वसतिगृहात चौकीदार पद कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. सदरचे पद हे 24 तास कामाचे असून दरमहा 8911 रुपये इतके एकत्रित मानधन देण्यात येईल. या पदाकरीता 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माजी सैनिक तसेच इतर नागरीक यांनी 5 ऑगस्ट, 2021 च्या आत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येऊन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000 

आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

        जळगाव, (जिमाका) दि. 28 - राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, 30 जुलै, 2021 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत कौशल्यातून रोजगाराकडे (आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

            या मार्गदर्शन शिबिरात श्री. नितीन जाधव, कौशल्य अभियान अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, दुपारी 3.00 ते 3.25 या वेळेत, श्री. श्रीपाद दिगंबर आमले, फाऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर, आस्थापना ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी, ओ.पी.सी. प्रा. लि. पुणे हे दुपारी 3.25 ते 3.50 या वेळेत, डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती हे दुपारी ३.५० ते ४.१५ या वेळेत तर डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिध्द प्लास्टिक सर्जन, लातूर दुपारी ४.१५ ते ४.४० या वेळेत आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार असून दुपारी 4.40 ते 5.00 वाजेपर्यंत पश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.

            या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युट्युब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A

00000

Tuesday, 27 July 2021

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे निर्देश •सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे येण्याचे केले आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील बालकांना शासनाच्या निर्देशानुसार विविध योजनांचा लाभ तातडीने द्यावा. तसेच या बालकांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

            कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. वैजयंती तळेले, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री. ठाकूर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 1100 रुपये शासनामार्फत बाल संगोपन योजनेद्वारे देण्यात येतात. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र बालकांना तातडीने देण्यात यावा. या बालकांचे शिक्षण थांबू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर या बालकांना शिक्षणासाठी लागणारे वह्या, पुस्तके, मोबाईल, अन्नधान्य आदि मदतीसाठी जिल्ह्यातील दानशूर, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

            त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या नागरीकांची माहिती यंत्रणांनी महिला व बाल विकास विभागास तातडीने उपलब्ध करुन द्यावी. अनाथ झालेल्या बालकांचा वारसाहक्क अबाधित राहील यासाठी त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी. या बालकांना शासनामार्फत मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी त्यांचे बँक खाते उघडण्यासाठी बॅकांनी मदत करावी. त्याचबरोबर या बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांना दिलेत.

            सध्या जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 20 असून या बालकांना सांभाळण्यास नातेवाईकांना बाल कल्याण समितीने परवानगी दिली आहे. तर एक पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील बालकांची संख्या 463 तर 18 वर्षावरील बालकांची संख्या 55 इतकी आहेत. बाल संगोपन योजनेचे आदेश दिलेल्या बालकांची संख्या 215 आहेत. तर कोरोनामुळे विधवा झालेल्या 285 महिलांची माहिती प्राप्त झाली असून त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यादी तहसीलदारांकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत दिली.

00000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 12 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील, अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमाकांनुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.

            उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. तरी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनीनी 12 ऑगस्ट, 2021 च्या आत संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात संर्पक करावा. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, (मर्या) जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

            अर्जासोबत पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत. मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदि कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2263294 वर संपर्क साधावा. असेही श्री. कसबे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरचढ (ओडिशा) करीता 13 व वेंकटगिरीकरीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर / सोलापूर / मुंबई / औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 20 ऑगस्ट, 2021 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

            त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले अर्ज दि. 20 ऑगस्ट, 2021 पर्यत संबंधीत प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचेकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे श्रीमती शीतल तेली-उगले, वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

राज्यातंर्गत पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागातील शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन ते आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. जेणेकरुन ते कृषि उत्पादकतेत भर घालण्यासाठी योगदान देतील तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यातंर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

            या पिक स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही 11 पिके समाविष्ठ आहेत. पिक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खरीप हंगामातील मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी अंतिम दिनांक 31 ऑगस्ट, 2021 अशी आहे.

            पिक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील संबधित पिकाखालील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. किमान स्पर्धेक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावी. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थीचे किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

            तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस5 हजार रुपये दुसरे बक्षिस 3 हजार रुपये, तिसरे बक्षिस 2 हजार रुपये,

जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रुपये, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, विभागीय पातळीसाठी पहिले बक्षिस 25 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 15 हजार रुपये, तर राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये, तिसरे बक्षिस 30 हजार रुपये आहे.

            तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी व कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

Monday, 26 July 2021

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार तहसील कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांना दाखल करता येणार तक्रार

 

    जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
     त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरीकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                   00000

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक

     जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 - जिल्ह्यात खरिप हंगाम-2021 करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याच्या हेतूने विमा कंपनीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणुक केली आहे.
जिल्हा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक
     जिल्हा प्रतिनिधी- प्रभास अरेबियन, सिग्मा-7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ, चोपडा. मो. नं-7304560023, इमेल prabhash.arabain@bhartiaxa.com कमलेश पाटील, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव, मो. 7208979239, Kamlesh.patil@bhartiaxa.com सोमय्या शाहु, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव मो. 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com,
तालुकानिहाय प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक
     अमळनेर तालुका-रामोशी  शिवाजी, मॉडर्न कॉम्प्युटर 4 बी. प्रबोध्दा कॉलनी, कोर्ट रोड, अमळनेर, मो. 9834436187, protalqueries.pmfby@bhartiaxa.com भुसावळ तालुका- पंकज सपकाळे, भरत कॅश पॉईट, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ, मो. 9923357061,  portalqueries.pmfby@bhartiaxa.com भडगाव तालुका- सोमय्या शाहु, निर्मल कॉम्प्युटर, तहसिल ऑफीस, पोलिस स्टेशनजवळ भडगाव, 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com  बोदवड तालुका- विष्णु खेडकर, जुन्या तहसिल मागे, बोदवड, 8329559104, portalqueries.pmfby@bhartiaxa.com चाळीसगाव तालुका- राहुल पाटील, बसस्टँडजवळ, चाळीसगाव, 8605151897, portalquesries.pmfby@bhartiaxa.com  चोपडा तालुका- सोमय्या शाहु, सिग्मा 7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ चोपडा, 7208912093, portalquesries.pmfby@bhartiaxa.com धरणगाव तालुका- राहुल पाटील, तन्मय काम्प्युटर इज्युकेशन, अर्बन बँकेजवळ, अहिल्याबाई होळकर चौक, धरणगाव, 8055451008, portalqueries.pmfby@bhartiaxa.com , एरंडोल तालुका- सागर पाटील, कॉलेज रोड, एरंडोल, 9284238436, portalqueries.pmfby@bhartiaxa.com जामनेर तालुका- नितीन लिंगायत, पंचम भवन, कोर्टासमोर, वाकीरोड, जामनेर, 9511275772, portalqueries.pmfby@bhartiaxa.com मुक्ताईनगर तालुका- भुषण सपकाळे, बोदवडरोड, मुक्ताईनगर, 8624952403, portalqueries.pmfby@bhartiaxa.com पारोळा तालुका- मिलिंद अहिरे, तलाव गल्ली, पारोळा, 9730489066, portalqueries.pmfby@bhartiaxa.com पाचोरा तालुका- योगेश पवार, व्ही. पी. रोड, देशमुखवाडी, पाचोरा, 9960371355, portalqueries.pmfby@bhartiaxa.com रावेर तालुका- अर्शद तडवी, पी. ई. तात्या मार्केट, सावदा रोड, रावेर, 8208606304, portalqueries.pmfby@bhartiaxa.com यावल तालुका- विकास शिंदे, सन्नी काँम्प्युटर, मेनरोड, यावल, 7709737607,  portalqueries.pmfby@bhartiaxa.com  यांची नेमणूक केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                       00000

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद

         जळगाव, (जिमाका) दि. 26 - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु असून जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
     कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. तर जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.  
     जिल्ह्याचे जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 189.2 मिलीमीटर इतके असून या महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात 108.8 मिलीमीटर म्हणजेच जुलै महिन्याच्या सरासरीच्या 57.5 टक्के इतका पाऊस पडला आहे.
     जिल्ह्यात जुलै महिन्यात तालुकानिहाय 26 जुलै, 2021 पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जुलै महिन्याच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 97.7 मिलीमीटर (44.6 टक्के), भुसावळ- 60.00 मि.मी. (30.8%), यावल- 76 मि.मी. (37.1%), रावेर- 107.8 मि.मी. (58.9%), मुक्ताईनगर- 101.2 मि.मी. (57.5%), अमळनेर- 87.4 मि.मी. (46.6%), चोपडा- 90.5 मि.मी. (42.3%), एरंडोल- 167.5 मि.मी. (87.4%), पारोळा- 138.6 मि.मी. (76%), चाळीसगाव- 144.7 मि.मी. (91.8%), जामनेर- 113.1 मि.मी., (57.2%), पाचोरा- 115.3 मि.मी. (64%), भडगाव- 115.8 मि.मी. (66.9%) धरणगाव- 128.5 मि.मी. (56.7%), बोदवड- 89.3 मि.मी. (43.9%) याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 108.8 मि.मी. म्हणजेच 57.5 टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
                                                                   00000

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा



         जळगाव, (जिमाका) दि. 26 - जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
     या कार्यक्रमाप्रसंगी यावर्षी जिल्ह्यातील शाहिद झालेले जवान यश दिगंबर देशमुख आणि निलेश सोनवणे यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण संघटक अनुरथ वाकडे. बी. आर. काळे यांचेसह उपस्थितांनी शहिदांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
                                                                   00000

Sunday, 25 July 2021

जळगाव जिल्ह्यात प्रथमच सक्रीय रुग्ण संख्या आली शंभरच्या आत


जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 98.13 टक्क्यांवर

• जिल्ह्यात 1 लाख 39 हजार 886 रुग्णांची कोरोनावर मात.
• जिल्ह्यात आजपर्यंत 14 लाख 3 हजार 188 संशयितांची कोरोना चाचणी.
जळगाव, (जिमाका) दि. 24 - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात मागील काळापासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्ण संख्या प्रथमच 100 च्या खाली म्हणजेच 94 वर आली असून आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 42 हजार 555 रुग्णांपैकी 1 लाख 39 हजार 886 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर पोहोचले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असली तरी यापुढेही नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी प्रशासनाने राबविलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्यावर पोहोचले होते. मात्र जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर 10 फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले तर 31 मार्च रोजी हे प्रमाण 84.92 टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु त्यानंतरच्या काळात जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) होण्यासाठी आरोग्य, पोलीस, जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबवित बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. शिवाय मृत्यु कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाची साखळ खंडित होण्यासाठी आजपर्यंत 14 लाख 3 हजार 188 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 42 हजार 555 अहवाल पॉझिटीव्ह तर 12 लाख 58 हजार 421 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर सध्या 308 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही कमी होत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 69 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 10 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 94 रुग्णांपैकी 69 रुग्ण लक्षणे नसलेले तर 25 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी 15 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु असून 6 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
00000