Friday, 31 May 2024

पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांची काठीवाडी पशुपालकांना भेट

 



            जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्त):- जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली पशुसंवर्धन विभागामार्फत 31 मे रोजी एरंडोल जवळ महामार्गा लगत स्थायिक असलेले 8 काठीवाडी पशुपालकांना भेटी देण्यात आल्या. येथे साधारण 400 गाई व 130 म्हैस या पालकांकडे आहे. येथे पुरेसा चारा उपलब्ध असून जवळच पाणी सुद्धा उपलब्ध आहे तसेच चराई साठी जवळचे शेतात चराई करण्यात येते याबाबत माहिती घेण्यात आली.

            चरायला जाण्याची वेळ सकाळी 7 ते 11 व संध्याकाळी 4 नंतर असावी तसेच दुपारचे वेळेस सावलीत जनावरे ठेवणे त्यांना दिवसातून तीन ते 4 वेळा मुबलक थंड पाणी पाजणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

            तसेच गाई- म्हशी ची पाहणी केली असता त्यातील काही गाई वयस्कर आणि अशक्त असल्याने त्यांना तत्काळ औषधुपचार, mineral mixture व जंतनाशक देण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पशसंवर्धन डॉ. अशोक महाजन धरणगाव, डॉ. प्राप्ती पारखे, डॉ. सुधाकर शेळके, डॉ. राहुल साळुंके, श्री. वासू वंजारी व MVU स्टाफ श्री. सुदर्शन पाटील LSS आणि श्री. भूषण कोळी ड्रायव्हर cum attendant हे उपस्थित होते.

00000


जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ▪बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर ▪जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारास हेल्मेट सक्ती ▪वाहतुक नियंत्रणासाठी रेडक्रॉस देणार वॉर्डन ▪कार रेस लावणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल ▪दुभाजक तोडणाऱ्यावर करण्यात येणार कडक कारवाई




 

            जळगाव दि. ३१ ( जिमाका ) - जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती बरोबर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून बायपास रस्ता तात्काळ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. शहरातील वाढती गर्दी,वाढलेले सिमेंटचे रस्ते आणि नवतरुणांच्या गाड्यांचे वाढते वेग यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आणि आरटीओ संयुक्त प्रयत्न करतील.हेल्मेट घालणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्यामुळे इथून पुढे ती सवय लागावी म्हणून इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

        दिनांक 30 मे रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, राज्य परिवहन मंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता सुनील गजरे, बांधकाम विभागाचे अभियंता आर. व्ही. बिऱ्हाडे यांच्यासह विविध वाहतूक संघटनांचे,स्वयंसेवी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

      शहरातील वाढती गरज लक्षात घेवून योग्य ते वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असून यासाठी महानगरपालिका, पोलीस आणि आर टी ओ यांनी समन्वयाने जिथे गरज असेल तिथे वाहतूक सुरक्षा संदर्भात उपाययोजना कराव्यात हे सांगून बाहेर येणारी जड वाहतूक बायपासचे काम होत नाही तो पर्यंत सुरु राहिल. येत्या काही महिन्यात ते काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. एकदा बायपासचे काम पूर्ण झाले की मुख्यरस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्याबरोबर ज्या ज्या गोष्टी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या केल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

   आता जिल्हाधिकारी कार्यालयात येताना हेल्मेट अनिवार्य

     नागरिकांना दुचाकी वाहन चालवताना डोक्याची सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. आता शहरात सगळीकडे सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे गाड्यांचे वेग वाढतायत, कमी वेगाने गाड्या चालविण्याची संस्कृती रूळविण्यासाठी सुरुवातीला वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना देऊन लोकांना हेल्मेटची सवय लागावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात येताना दुचाकीचालकांना हेल्मेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

        वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून रेडक्रॉस सोसायटी कडून वॉर्डन देणार असल्याची घोषणा रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. महामार्गावरले आपल्या सोयीसाठी म्हणून अनेकांकडून दुभाजक तोडण्याचे काम होते आहे. हे अपघाताला निमंत्रण असून असे करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले. तसेच महामार्ग किंवा राज्य मार्ग, शहरातील रस्ते यावर कार रेस लावण्याच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश आपल्याकडून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

         प्रारंभी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या कडून जिल्ह्यातील रस्ता सुरक्षिततेबाबत सविस्तर सादरीकरण झाले. त्यात जिल्ह्यातील तीन ब्लँक स्पॉटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वते उपाययोजना झाल्या असून जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र शोधले असून येत्या काही महिन्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

०००००००

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुदानासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

         जळगाव दि.31 ( जिमाका ) – संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान डी.बी.टी व्दारे करणेकरिता दि. 7 फेब्रुवारी, 2024 रोजी मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली झालेली व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 तसेच दिनांक 15 मार्च, 2024 व 31 मे, 2024 रोजी सदर विषयी श्रावणबाळ/ संजय गांधी योजनेचे अनुदान डी.बी.टी.व्दारे करणेकरीता आवश्यक कार्यवाही करणेबाबत जिल्हास्तरावर बैठक घेण्यात आलेली आहे.

            एप्रिल 2024 पासून लाभार्थ्यांना अनुदान हे डी. बी. टी व्दारे वितरीत करणेबाबत शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थ्यांनी संबंधीत तलाठी यांच्याकडे आधारकार्ड, बँक पासबुक, लाभार्थ्याचा मोबाईल नंबर, योजनेचा प्रकार , जात प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार व दिव्यांग टक्केवारी, उत्पन्न प्रमाणपत्र, राशन कार्ड, लाभार्थ्याच्या आधारला व बँकेस लिंक असलेला मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे 31 मे, 2024 पर्यंत दाखल करावी. जे लाभार्थी सदरील कागदपत्रे सादर करणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी यांची राहील याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी , तरी जळगाव जिल्हयातील विशेष सहाय्य्‍ योजना लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, डी. बी. टी साठी आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित तहसिल कार्यालयांकडे जमा करण्यात येवून सर्व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००००००

Wednesday, 29 May 2024

_सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृह जळगांव येथील शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया_ पात्रधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 29 – समस्त माजी सैनिक/विधवांना कळविण्यात येते की, जळगांव मध्ये सैनिकी मुलांचे वसतिगृह, मध्यवती शिवाजी पुतळयाजवळील, जी.एस मैदान, जळगाव येथे असून सदर वसतीगृहामध्ये एकूण 48 मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच सेनिकी मुलींचे वसतिगृह हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ, धुळे रोड, जळगांव येथे असून सदर वसतीगृहामध्ये सुद्धा एकूण 48 मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगांव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य जळगांव येथे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्या पाल्यांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेश जागा शिल्लक राहील्यास इतर नागरिक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका/अर्ज वसतीगृह अधिक्षक/अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक / अधिक्षिका यांचेकडून प्रवेश पुस्तीका/अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे दिनांक 31 ऑगष्ट 2024 पर्यंत सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार, , जळगांव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खालील नमुद दुरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा

            सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रा. गायकवाड, , मो. नं. ८४५९६८७३८८ दूरध्वनी क्र. ०२५७- २२४१४१४. अशासकीय वसतीगृह अधिक्षक  समाधान धनगर, मो. नं. ७३७८९४२३२७ व दूरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८. अशासकीय वसतीगृह अधिक्षीका श्रीमती अनिता पाटील, मो. नं. ७५०७९०३९२१ किंवा दूरध्वनी क्र. ०२५७- २२४१४१४.

000000000

विविध पिकांसाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके ; विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार

         जळगाव, (जिमाका) दि. 29 – महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात सन 2023-24 पर्यंत बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जात होतो. जिल्हयात विविध प्रशिक्षणे, कृषी सप्ताह, शेतीशाळा, शेतकरी मेळावे, गाव बैठका इ. च्या माध्यमातून वीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुषंगाने सन 2024-25  प्रकल्पांतर्गत खरीप  हंगामामध्ये जिल्हयात ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, उडीद व मूग या प्रमुख पिकांसाठी बीजप्रक्रिया  प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक यांच्या कार्यक्षेत्रात विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

            जमीनीतून तसेच बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/ विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया  है अत्यंत प्रभावी साधन आहे बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वताचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात सन 2023-24 मध्ये तूर पिकावर मर रोग, सोयाबीन पिकावर मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. सदर रोगांमुळे शेतक-यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. त्याकरीता बीजप्रक्रिया मोहिमेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वत:कडील घरगुती वापरण्यात येणान्या बियाण्यास बोजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रिया युक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य / विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे

बीजप्रक्रिया करण्याचे फायदे:-

            बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जिवाणूपासून संरक्षण मिळते, जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणी पासून 30-35 दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो,  कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते, बियाण्याची उगवण क्षमता वाढवते, जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात, उत्पादनात वाढ होते.

बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजीः-

             बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा या सारख्या इतर संरक्षण करणान्या बाबी घालाव्यात, बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यार किया यंत्राद्वारे सावलीत कराव. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवि मध्ये एकत्र मिसळून घ्यावे,  रासायनिक आणि जेविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत, जैविक बीजप्रक्रिया ही रसायनिक बीजप्रक्रिया नंतर करावी आणि यामध्ये 2.5-3  तासाचे अंतर असावे,. बीजप्रक्रिया केलेले बियाणे 3-4 तासाच्या आत पेरणी साठी वापरावे, बीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक जीवाणू अशा क्रमाने करावी.  

000000000000

खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्य पिकाची लागवड करा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

         जळगाव दि.29 ( जिमाका ) - जिल्हयात खरीप हंगामात कापूस हे नगदी पिक घेतले जाते. जिल्हयात लागवडीलायक क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. परंतु मागील काही वर्षांचा अनूभव लक्षात घेता कापूस पिकात किडींचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उत्पादन खर्चात ३० टक्के वाढ झालेली असल्याने अपेक्षित उत्पादन येवून देखील उत्पादन खर्च जास्त झाल्याने शेतक-याच्या नफ्यात घट झालेली दिसुन येते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कापूस पिकात आंतरपिक म्हणून तुर, मुग व उडीद या पिकांचा समावेश करावा. जेणे करुन जमिनीतील सुपिकता निर्देशांकात वाढ व एकात्मिक किड व्यवस्थापन (गुलाबी बोंड अळी) या सारख्या किंडींचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होते. तसेच कापूस पिकात आंतरपिक म्हणून कडधान्याचा समावेश केल्याने जमिनीची धूप कमी होणे, उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते त्यामुळे आंतर पीक घेण्याचे आवाहन केले आहे.

             जळगाव जिल्हाची दाळ मिल नगरी म्हणून ओळख असल्याने जळगाव शहरात ९४ दाळ मिल कार्यान्वित असल्याने दाळ प्रक्रीया उद्योग वाढीसाठी वाव आहे. त्याचबरोबर विविध शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपनी यांना हमी भाव मिळण्यास देखील हातभार लागणार आहे. शेतकरी बांधवांच्या हितार्थ जिल्हयात कृषि विभागानार्फत राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियन अंतर्गत तुर, मुग व उडीद पिकाचे प्रात्यक्षिक व बियाणे तालुकास्तरावर अनुदान तत्वावर कडधान्य पिकांचे बियाणे मिळणार असुन जास्तीतजास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

00000000

Monday, 27 May 2024

जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात ; मिळत नसतील तर तक्रार निराकरण केंद्रात लावा फोन

         जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) -   खरीप हंगाम 2024 अंतर्गत जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, पुरवठा, उपलब्धता वाजवी दरात विक्री यासंबंधीच्या तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी आज कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा कृषी निवष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर चे शुभारंभ करण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार व कृषी विभागाचे अधिकारी / कर्मचारी कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी उपस्थित होते. टोल फ्री क्रमांक 7498192221 या क्रमांकावर तसेच कृषि विभागाच्या 0257-2239054 व 9834684620 यापैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर तक्रारग्रस्त शेतकऱ्यांनी बियाणे उपलब्ध होत नसल्यास किंवा खते उपलब्ध होत असल्यास याबाबत कुठली तक्रार असल्यास सदर क्रमांक वर कॉल करावा त्या   ठिकाणी कंट्रोल रुम तथा नियंत्रण कक्षातून आपणास मार्गदर्शन मिळेल व आपल्या समस्येबाबत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांना सूचना करण्यात येतील असे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सुरज जगताप यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

  जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) -  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलसमध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना  Combined Defence Service (SDS)   या परिक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराट्रातील नवयुवक व नव युवतीसाठी दिनांक 10 जून 2024 ते 23 ऑगस्ट, 2024 या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 63 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते.

  तरी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे दिनांक 6 जून, 2024 रोजी मुलाखतीस हजर राहावे, मुलाखतीस येते वेळी त्यांनी  Department of Sainik Welfare, Pune( DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS - 63 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

  सदर सि. डी. एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमुद पात्रता असणे आवश्यक आहे व त्या संबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत – उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सि. डी. एस (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.

  अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ईमेल आय डी  training.petcnashik@gmail,com  व दुरध्वनी  क्रमांक 0253-245 1032 किंवा व्हाटसॲप क्रमांक 9156073306 (प्रवेशपत्र मिळवण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

                                                                  ०००००००

Wednesday, 22 May 2024

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावेत

         जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव जिल्हा अंतर्गत व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच सीईटी सेल अंतर्गत नोंदणी होऊन प्रवेश घेणाऱ्या अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सदर मागासवर्गीय विदयार्थ्यांनी दि. 15 जून, 2024 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगाव येथे जात वैधता अर्ज जमा करण्यात यावा

            जे मागासवर्गीय विदयार्थी 15 जून, 2024 नंतर तसेच उशीराने अर्ज सादर करतील किंवा त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास त्यास स्वता विदयार्थी जबाबदार राहील असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य  व्ही. एम. वाकुलकर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती  जळगाव यांनी केले आहे.

०००००००

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) - दारिद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी. याकरीता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केलेली आहे.

            या महामंडळास चालु आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरीता 400 लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य  देण्यात येणार आहे.

            जिल्हयातील ज्या प्रशिक्षण संस्थेची कौशल्य विकास आणि उदयोजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदनीकृत केलेल्या संस्था अशा प्रशिक्षण संस्था कडुन 31 मे, 2024 पर्यंत महामंडळाचे कार्यालयात प्रस्ताव दोन प्रतिमध्ये आवश्यक कागदपत्रासह कार्यालयात सादर करावे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास आवश्यक बाबी

            अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे, केंद्रिय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण/शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 3 लाखापेक्षा कमी असावे, राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण/ शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे, अर्जदाराने महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा,  एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल,

अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशी सादर करावा, प्रशिश्क्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्या विकास व उदयोजकता विभागाने ठरवुन दिलेल्या दराप्रमाणे करण्यात येईल. प्रशिक्षणाची निवड प्रिाक्षणार्थीने करणे बंधनकारक राहील, जिल्हयातील ज्या संस्थेने कौशल्य विकास आणि उदयोजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदनीकृत केलेले असेल अशाच संस्थेने प्रस्ताव दाखल करावा, प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधी पुर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकांची राहील. त्या शिवाय सदर संस्थेची प्रशिक्षण फी अदा केली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधी नुसार टप्प्या टप्प्याने 20%, 30%, 30%,20%, च्या  प्रमाणात प्रशिक्षण फी अदा केली जाईल.

KVIC  अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रिाक्षणार्थीना PMEGP  अंतर्गत निवडलेल्या व्यवसायाचा कर्जाचा अर्ज सादर , प्रशिक्षण संस्थेची निवड गुणांकन करुन करण्यात येणार आहे. गुणांकनाचे निका स्वतंत्र आदेशान्वये कळविण्यात येतील, प्रशिक्षणार्थीची बायोमेट्रीक पध्दतीने व हजेरी पदावर स्वाक्षरीने हजेरी घेणे बंधनकारक राहील, संस्थेने विदयार्थी निहाय प्रमाणीत केलेली हजेरी पाठविल्या शिवाय संबंधीत प्रशिक्षण संस्थेची फी अदा केली जाणार नाही, जिल्हास्तंरावर प्रशिक्षण संस्थेची निवड, प्रादेशिक व्यवस्थापकांच्या आध्यंक्षतेखाली त्यांच्या अधिनस्त कार्यरत जिल्हा व्यवस्थापक सदस्य असलेल्या समिती मार्फत करण्यात येईल समितीने निवड केलेल्या संस्थेची शिफारस मुख्यालयाकडे करण्यात येईल मुख्यालयाचे अंतिम मान्यंते नंतर सदर संस्थेला मान्यंता व विदयार्थी देणेचे आदेश मुख्यालयाकडुन देण्यात येतील.

            तसेच मातंग समाजातील संबधीत होतकरु महीला / पुरुष तरुण वर्गानी तसेच लाभार्थीनीं महामंडळा मार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी दिल्या जाणाऱ्या या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदिरा समोर, महाबळ रोड जळगाव यांनी प्रसिध्दीसाठी  दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. फोन नं. – 0257- 2263294

                                                    00000

निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना जाहिर अवाहन

                  जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) –   जळगाव जिल्हा कोषागाराचे अधिनस्त सर्व निवृतीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की, कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन / सुधारित निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत    फोन करुन संपर्क साधला जात नाही, किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो.

            याबाबत काही निवृतीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

            सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, आपणांस दूरध्वनी / भ्रमणध्वनीवरुन उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे भरणेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही तरी कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देवू नये, याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे, तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी  राजेंद्र खैरनार  व अप्पर कोषागार अधिकारी  सुभाष गुंजाळ  यांचेकडून करण्यात येत आहे.

0000000

Tuesday, 21 May 2024

“भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकत वाढविण्यास शिफारशी” या पुस्तिकेमध्ये सुधारणा सुचविण्याचे आवाहन

       जळगाव, (जिमाका) दि. 21 – कृषी विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास शिफारशी ही पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. सदर पुस्तिकेमध्ये भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे पेरणीपासून काढणी पर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन या विषयी माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तिकेच्या Draft चा क्यु आर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या मेलवर कळविण्यात याव्यात .  असे आवाहन कृषि संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य  विकास पाटील पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. 

                                        00000000

 

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या

निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु

      जळगाव, (जिमाका) दि. 21 – राज्यात अनुसुचित जमातीतील साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणात प्रामुख्याने इंग्रजीचा वापर जास्त होत असल्याने अनुसूचित जमातीचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडत आहेत व उच्च शिक्षणाच्या बदलेल्या वातावरणात त्यांना जुळवून घेणे कठीण जाते. जागतिकीकीणाच्या सध्याच्या वातावरणात इंग्रजीचे महत्व वाढत असून, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमाकडे थोडया प्रमाणात वाढत असला तरी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण घेणे त्यांच्या आर्थिक कुवती पलीकडे आहे. त्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन देणे आवश्यक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये सन 2024-25 मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

            प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या कार्यालयामध्ये कार्यक्षेत्रातील जळगाव जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुलांना इयत्ता 1 ली व 2 री साठी विद्यार्थ्यांना सन 2024 – 25 मध्ये शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत शासन निर्णयानुसार व अटी – शर्तीनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विहित नमुन्यातील अर्ज खालील ठिकाणी दिनांक 21 मे,2024 ते 10 जून, 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून जमा करण्यात यावेत

प्रवेश अर्ज जमा करण्याचे ठिकाण

            आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह – यावल/ भुसावळ, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर/ बोदवड, जामनेर, जळगाव/ धरणगाव, चाळीसगाव, एरंडोल/ पारोळा/ भडगाव/ पाचोरा, अमळनेर  या ठिकाणी सकाळी 10.30 ते 5 वाजेपर्यंत.

            या योजनेतंर्गत ज्या पालकांनी आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली व 2 च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्ड सांक्षाकित प्रत सादर केल्यानंतर            इयत्ता 1 ली साठी जन्मदाखला ग्रामसेवक, इ. 1 ली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी किमान 6 वर्षे पूर्ण असावे, जन्म 1 जून, 2017 ते 31 डिसेंबर, 2018 या दरम्यान झालेला असावा.  इयत्ता 2 री साठी इयत्ता  1 ली मध्ये शिकत असल्याबाबत मुख्याध्यापकांची शिफारस, पालकाचे वार्षिक उत्पन्न 1.00 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे तसेच पालक शासकीय / निमशासकीय सेवेत नसावे, उत्पन्नाचा दाखला प्रत जोडणे आवश्यक, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा सन 2023-24, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ( सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले), दारिद्रयरेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करुन ग्रामसेवक यांचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास ग्रामसेवकाचा दाखला, विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज दोन फोटो, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड छायांकित प्रत, निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकाचे हमीपत्र, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  संपर्काकरीता दुरध्वनी क्रमांक – 1) श्रीमती एम. आर. सुलताने मॅडम (क.शि.वि.अ) मो नं- 9021205520/7798802394

2) श्री. गायकवाड सर (क.शि.वि.अ) मो नं- मो.न- 8788534307

                                            00000

Friday, 17 May 2024

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी आणि ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा

             जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्त):-  सहकार विभागांतर्गत जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा शेठ. ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगांव आणि जिल्हा पेठ, स्टेट बैंक ऑफ इंडिया मुख्य शाखेजवळ, जळगांव येथे दि. २४ ते २६ मे, २०२४ रोजी या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी ज्या परिक्षार्थीनी सदर परिक्षेचे अर्ज केलेले आहेत अशा परिक्षार्थीनी आपले परीक्षा प्रवेशपत्र खात्याच्या संकेतस्थळावरुन (Website) आपण तयार केलेल्या लॉगईन आयडीवरून उपलब्ध करून घ्यावे. तसेच सदरबाबत परीक्षार्थीना काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, गौतम बलसाणे, सहकारी संस्था, जळगांव यांनी केले आहे.

00000

कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्‍ह्यात उपलब्ध -कृषी विभागाची माहिती

जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्त):-  जळगांव जिल्हयात शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, खरीप हंगामात कापुस बियाणे लागवडीसाठी २७.९२ लाख पाकीटांची आवश्यक्ता असुन लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्हयात  उपलब्ध होणार आहे.

            पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत देशात जनुकीय बदल करुन तयार करण्यात येणाऱ्या बियाण्यांसाठी उत्पादन विक्री व हाताळणी करिता मान्यता देण्यात येत आहे. अशा मान्यता प्राप्त जनुकीय बदल बियाणांची विक्री करण्याकरीता राज्यात बियाणे विक्री परवाना देण्यात येतो. तथापि बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशिल असणारे (Herbicidal Tolerance Transgenic Gene) एचटीबीटी कापुस बियाणे विक्री करण्यास GEAC (Genetically Engineering Approval Committee) यांनी परवानगी दिलेली नाही.

            खरीप हंगाम २०२४ मध्ये जिल्हयात प्रतिबंधित HTBT या कापुस वाणाची लागवड व सीमेलगतच्या राज्यातुन होणारी छुपी विक्री रोखण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथक व तालुकास्तरीय भरारी पथकांची निर्मिती करुन मोहिम स्वरुपात कृषि केंद्रांची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहे.

            तालुक्यातील कृषि मित्र, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, कृषि अधिकारी, गावातील पोलीस पाटील, प्रगतीशील शेतकरी यांचेशी जिल्हयातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षक संपर्कात असुन असा प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवण्यात येईल.

            एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम २०२४ मध्ये सदर बियाणे कोणत्याही परिस्थीतीत शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये. अशा प्रकारचे कापूस बियाणे विक्री करीत असतांना आढळुन आल्यास संबंधीतांवर कृषि विभागामार्फत पर्यावरवण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कायद्याअन्वये पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येईल.

            तसेच जिल्हयात या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ व मोबाईल क्र. ९८३४६८४६२० वर माहिती द्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कु.मु. तडवी यांनी केले आहे.

00000

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

              जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्त):-  जिल्हयातील नागरिकांना कळविण्यात येते कि, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दि.16 मे, 2024 रोजी पासुन तांत्रीक अडचण आल्याने बंद झालेले आहे. सदर प्रणाली मेंटनेन्स कामाकरीता दि. 18 मे, 2024 पर्यंत बंद असल्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी अनुज्ञप्ती संबधीचे कामकाज नियमीत सुरू झाल्यानंतर त्याबाबत कळविण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                   00000

Thursday, 16 May 2024

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव दि.16 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  ज्या मुलांनी वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात  विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

            प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज () https://awards.gov.in)  या संकेतस्थळ मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य  संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असे आयुक्त महिला व बाल विकास  महाराष्ट्र राज्य पुणे -1 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                  ००००००००००                                                                                                                                                                                                                 

Wednesday, 15 May 2024

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात येणार, अर्ज करण्याचे आवाहन

         जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्त):-  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव तसेच माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने सभागृह व्यवस्थापक-२, वसतिगृह अधिक्षक-०१, वसतिगृह अधिक्षीका-०१, पहारेकरी कम एमटीएस -०४, सफाई कर्मचारी -०२ व स्यंवपाकी-४ ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झालेस नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह दिनांक ०५ जून २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी ०२५७- २२४१४१४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

00000

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात येणार, अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे  भरण्यात येणार, 

अर्ज करण्याचे आवाहन


 जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्त):-

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव तसेच माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने सभागृह व्यवस्थापक-२, वसतिगृह अधिक्षक-०१, वसतिगृह अधिक्षीका-०१, पहारेकरी कम एमटीएस -०४, सफाई कर्मचारी -०२ व स्यंवपाकी-४ ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झालेस नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह दिनांक ०५ जून २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी ०२५७- २२४१४१४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

                                                               00000

Thursday, 9 May 2024

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन

      जळगाव दि.3 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  ज्या मुलांनी वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात  विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज () https://awards.gov.in)  या संकेतस्थळ मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य  संस्थ, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असे आयुक्त महिला व बाल विकास  महाराष्ट्र राज्य पुणे -1 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                        ००००००००००

Wednesday, 8 May 2024

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

 मुंबई, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी  सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक  ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.  त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                          0000000000

Monday, 6 May 2024

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी 

 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, दि. 6 मे, 2024 जिमाका वृत्त सेवा 

 केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकांकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागा आणि द्वितीय वर्षाकरीता ३ (१ जागा आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता) जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 10 जून, 2024 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

  इच्छुक उमेदवारांनी याबाबत आपले परिपूर्ण अर्ज 10 जून, 2024 पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे अविष्यांत पंडा, आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Friday, 3 May 2024

मे महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

                 जळगाव दि.3 (जिमाका) :- जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

            भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 16 मार्च, 2024 पासून देशभर निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे निर्देश आहेत. त्यामुळे मे महिन्यात पहिल्या सोमवारी (06 मे, 2024)  रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000