Wednesday, 22 May 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) - दारिद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी. याकरीता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केलेली आहे.

            या महामंडळास चालु आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरीता 400 लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य  देण्यात येणार आहे.

            जिल्हयातील ज्या प्रशिक्षण संस्थेची कौशल्य विकास आणि उदयोजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदनीकृत केलेल्या संस्था अशा प्रशिक्षण संस्था कडुन 31 मे, 2024 पर्यंत महामंडळाचे कार्यालयात प्रस्ताव दोन प्रतिमध्ये आवश्यक कागदपत्रासह कार्यालयात सादर करावे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास आवश्यक बाबी

            अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे, केंद्रिय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण/शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 3 लाखापेक्षा कमी असावे, राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण/ शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे, अर्जदाराने महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा,  एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल,

अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशी सादर करावा, प्रशिश्क्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्या विकास व उदयोजकता विभागाने ठरवुन दिलेल्या दराप्रमाणे करण्यात येईल. प्रशिक्षणाची निवड प्रिाक्षणार्थीने करणे बंधनकारक राहील, जिल्हयातील ज्या संस्थेने कौशल्य विकास आणि उदयोजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदनीकृत केलेले असेल अशाच संस्थेने प्रस्ताव दाखल करावा, प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधी पुर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकांची राहील. त्या शिवाय सदर संस्थेची प्रशिक्षण फी अदा केली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधी नुसार टप्प्या टप्प्याने 20%, 30%, 30%,20%, च्या  प्रमाणात प्रशिक्षण फी अदा केली जाईल.

KVIC  अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रिाक्षणार्थीना PMEGP  अंतर्गत निवडलेल्या व्यवसायाचा कर्जाचा अर्ज सादर , प्रशिक्षण संस्थेची निवड गुणांकन करुन करण्यात येणार आहे. गुणांकनाचे निका स्वतंत्र आदेशान्वये कळविण्यात येतील, प्रशिक्षणार्थीची बायोमेट्रीक पध्दतीने व हजेरी पदावर स्वाक्षरीने हजेरी घेणे बंधनकारक राहील, संस्थेने विदयार्थी निहाय प्रमाणीत केलेली हजेरी पाठविल्या शिवाय संबंधीत प्रशिक्षण संस्थेची फी अदा केली जाणार नाही, जिल्हास्तंरावर प्रशिक्षण संस्थेची निवड, प्रादेशिक व्यवस्थापकांच्या आध्यंक्षतेखाली त्यांच्या अधिनस्त कार्यरत जिल्हा व्यवस्थापक सदस्य असलेल्या समिती मार्फत करण्यात येईल समितीने निवड केलेल्या संस्थेची शिफारस मुख्यालयाकडे करण्यात येईल मुख्यालयाचे अंतिम मान्यंते नंतर सदर संस्थेला मान्यंता व विदयार्थी देणेचे आदेश मुख्यालयाकडुन देण्यात येतील.

            तसेच मातंग समाजातील संबधीत होतकरु महीला / पुरुष तरुण वर्गानी तसेच लाभार्थीनीं महामंडळा मार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी दिल्या जाणाऱ्या या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदिरा समोर, महाबळ रोड जळगाव यांनी प्रसिध्दीसाठी  दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. फोन नं. – 0257- 2263294

                                                    00000

No comments:

Post a Comment