जळगाव, दि. 5 (जिमाका) - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 22 मार्च, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्ता लोकांचा जमाव करण्यास संबंधित भागातील पोलीस प्रभारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment