जळगाव, दि.17 - गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव विभागाच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पावर जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा, पांझण डावा कालवा, व निम्नगिरणा कालव्यावरुन व मन्याड, बोरी, अंजनी या मध्यम प्रकल्पावर तसचे बोळे, सावरखेडा, शिरसमणी, पिंपळकोठा-भोलाणे, म्हसवा, कंकराज ता- पारोळा निसर्डी, आर्डी ता. अमळनेर मन्यारखेडा, विटनेर ता- जळगाव खडकेसिम ता एरंडोल हातगाव-1, खडकीसिम, पिंप्री-उंबरहोळ, वाघळा-1, वाघळा -2 देवळी भोरस ब्राम्हणशेवगा, पिंपरखेड, राजदेंहरे, कुंझर -2, कृष्णापूरी, वलठाण, ता- चाळीसगाव, पथराड, ता. भडगाव या लघु प्रकल्पावरुन कालवाप्रवाही, कालवाउपसा, जलाशयउपसा, लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना कळविण्यात येत आहे. यावर्षी वाघूर प्रकल्पात सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झालेला असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठयानुसार रब्बी हंगाम 2024-25 मध्ये दि. 15ऑक्टोंबर,2024 ते 28 फेब्रुवारी, 2025 या मुदतीत रब्बी कपाशी, गहु, हरबरा, ज्वारी, दादर, हा. दुरी, मका, कडवळ, सुर्यफुल, करडई, भाजीपाला, विहिरीवरील उभे पिके इ. हंगामी सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.
नमूना नं. 7 व 7 अ 7 ब चे पाणीअर्जावर मागणी
करुन पाणी अर्ज दिनांक 31 डिसेंबर, 2024 च्या आत संबंधीत उपविभागीय
कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोस्टाने देण्याचे करावे. पुरेशी पाणी
मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय आवर्तन सोडण्यात येणार नाही. असे कार्यकारी
अभियंता वाघूर धरण विभाग जळगाव यांनी कळविले आहे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील.
खरप हगाम 2023-24
पर्यंतची संपुर्ण पाणीपट्टी थकबाकी भरणा केलेली असावी, भरणा उडाफयाचा नसावा,
पाटमोट संबध नसावा, प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या क्षेत्रासच मंजूरी देण्यात
येईल. उडाप्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागांतील क्षेत्रास मंजुरी
देण्यात येणार नाही. प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रास मंजुरी दिली जाईल. प्रत्यक्ष
पास मिळाल्या शिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये. पाणी अर्जाचा निर्णय संबंधित पाटशाखेत / ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर जाहीर
केला जाईल. मंजुरी क्षेत्रावर मंजुर पिकासच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना
7/12 उतारा अथवा खाते पुस्तीका संबधीत पाटशाखेत दाखवावी लागेल. पाणी अर्ज स्विकारणेची
मुदत दिनांक 31 डिसेंबर 2024 नंतर वाढविली जाणार नाही. पाणीपुरवठा व्यवस्थित व
सुरळीत होण्यासाठी शेतचाऱ्या स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. शेतचाऱ्या स्वच्छ ठेवणे व
त्यांची देखभाल करणे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे.
पिण्याचे पाण्याचे
आरक्षण अथवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुरी पिकास पाणी पुरवठा न करता आल्यामुळे
पिकांचे नुकसान झाल्यास त्यास हे खाते जबाबदार रहाणार नाही. रब्बी हंगाम व उन्हाळी
हंगाम 2024-24 व त्या अगोदरची थकबाकी भरावी लागेल. असे कार्यकारी अभियंता, दे.पु.अग्रवाल
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
००००००००००
No comments:
Post a Comment