Tuesday, 2 August 2022

आणीबाणी लढ्यातील सहभागींनी अर्ज करण्याचे आवाहन

 q2       जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 -  आणीबाणी लढ्यात सहभागी व्यक्तींनी यापूर्वी मानधन मिळण्यासाठी अर्ज केलेले नाहीत, अशा व्यक्तींनी विहित नमुन्यात अर्ज व शपथपत्रासह नव्याने अर्ज 31 ऑक्टोबरपर्यंत करावेत, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी केले. धोरणांतर्गत लाभार्थी, जोडीदार हयात असेपर्यंत मानधनास पात्र आहेत. वारसदार मात्र मानधनास पात्र नाहीत, असेही त्यांनी कळविले आहे.

                                                                    0000

No comments:

Post a Comment