Thursday, 29 February 2024

जिल्हाभरात "मुख्यमंत्री वयोश्री योजने"अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन

      जळगाव दि.29 ( जिमाका ) राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ् केंद्र इ.व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दि.०१ मार्च २०२४ ते ०७ मार्च २०२४ या कालावधीत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील आरोग्य विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेवून सूचना केल्या आहेत. 

   हे शिबिर सप्ताहात जेष्ठ नागरिकांसाठी श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. संबंधित आवश्यक तपासण्या होणार आहेत.

    या शिबीर सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे. 

    मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी आवश्यक आधारकार्ड/मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी आपली नोंदणी करून आरोग्य तपासणी करून घ्यावी.

                                                                           ००००००००००००

_महासंस्कृतीचा मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर_ किंकरीच्या तालात स्वातंत्र्य लढ्याच्या गाथा ते शाळकरी मुलींकडून शिवकालीन मर्दानी खेळानी गाजवला ▪️ कोळी गीताने आणली रंगत

 















     जळगाव दि.29 (जिमाका ) जळगावच्या पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस स्थानिक कलाकारांच्या किंकरी या वाद्या पासून ते शिवकालीन मर्दानी खेळ सादर करून गाजवला. तर कोळी गीताने मोठी रंगत आणली.
    ब्रिटिशांच्या विरोधात देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या गावापर्यंत लढे लढले गेले. खानदेशातील लढवय्यांनी ह्या ब्रिटिश विरोधातील लढ्यात कशी कामगिरी केली हे किंकरी हे तंतूताल वाद्य वाजवून हे शौर्य सांगितले. गोंडगाव ता. भडगाव येथील भिका काशिनाथ भराडी आणि त्यांच्या साथीदारांनी ही कला सादर केली.
  शिवकालीन मर्दानी खेळ
     छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे  जे मर्दानी खेळ करायचे त्यात काठी चालवणे... ते अगदी हातावरचे नारळही अलगद वरच्या वर फोडणे... हे खेळ रावेरचे युवराज माळी आणि त्यांचा चमू यांनी सादर केला. यातल्या हा खेळ सादर करणाऱ्या सर्व मुली होत्या हे अधिक कौतुकास्पद, त्यातली अवघ्या तीन वर्षाची सुशी माळी  यांनी अंगावर रोमांच उभी करणारी काठी चालवली. 
      पारंपारिक लोक कला आणि नृत्य
 पारंपारिक लोक कलेत जोगवा, धनगरी नृत्य सादर केले. हे सर्व बाल कलाकार पारंपारिक वेषात आलेले होते. खंडोबा देवाच्या लग्नाचे अत्यंत तालबद्द नृत्य करून ह्या युवा कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
 स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे हा या महासंस्कृती महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. हे स्थानिक कलाकरातून या संधी मधून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील कलाकार निर्माण व्हावेत हाच हेतू राज्याच्या सांस्कृतिक विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा आहे.
                                                                  ०००००००००००

जळगाव मध्ये आयोजित महासंस्कृती महोत्सव 3 मार्च पर्यंत ; जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा ▪️ सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर महिला बचत गटाच्या वस्तूचे, खाद्य पदार्थाचेही प्रदर्शन


जळगाव दि. 29 ( जिमाका ) राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर ' महासंस्कृती महोत्सव ' आयोजित करण्यात आला आहे. त्यात स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्यात आले आहे. त्याबरोबर राज्यातील विविध कला सादर करणारे कलाकार यांनाही आमंत्रित केले आहे. संध्याकाळी 5 पासून रात्री  9.30 पर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन  ग्रामीण  विकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

   या महासंस्कृती महोत्सवात शुक्रवारी दि. 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5.30 ते 7 पर्यंत गण गवळण, बतावणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शाहिरी, सायंकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत 'सुरसंस्कृती' हा कार्यक्रम होणार असून त्यात सौ. सन्मिता धापटे-शिंदे (सूर नवा ध्यास नवाची विजेती महागायिका) चैतन्य कुलकर्णी (सा, रे, ग, म, प, फेम) यांचा सहभाग असणार आहे. तर 2 मार्च रोजी सायंकाळी 5.30 ते 7 पर्यंत बहिणाबाईच्या कविता, गीत गायन होईल. तर संध्याकाळी 7.30 ते रात्री 9.30 पर्यंत गर्जा सुवर्णमहाराष्ट्र हा महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा स्वरनिनाद कल्चरल फाऊंडेशनकृत हा सुप्रसिद्ध कार्यक्रम होणार आहे. तर 3 मार्च रोजी सायंकाळी 5.50 ते 7 पर्यंत अवधेय... एक आदर्श ही 

नृत्य नाटिका होणार असून संध्याकाळी 7.30 ते रात्री 9.30 पर्यंत 'रायगडाला जेव्हा जाग येते तेंव्हा' हे साहित्य संघ, मुंबई निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित नाटक बघायला मिळणार आहे. ही सांस्कृतिक मेजवानी जळगावकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या मेजवानीची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी नक्की या असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही करण्यात येत आहे. याच मैदानावर जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटाचे 'मुक्ताई सरस प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनात महिला बचत गटाकडून तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थही इथे उपलब्ध आहेत.

एस. टी. महामंडळाकडून तालुक्यातील जनतेसाठी संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत जळगाव बसस्थानकावरून बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने करून दिल्या आहेत.

                                                        000000000

शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा

ज‍िल्ह्यात  २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार -  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीराचे ज‍िल्ह्यात यशस्वी आयोजन

नामांकित ३०० पेक्षा अधिक कंपन्यांचा महारोजगार मेळाव्यात सहभाग व मेळाव्याला तरूणांचा उदंड प्रतिसाद

अहमदनगर दि. २८ फेब्रुवारी (जिमाका) :-  बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी आश‍िष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे, ज‍िल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त न‍िशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते. 

राज्यात नागपूर, लातूर नंतर अहमदनगर येथे नमो व‍िभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाण‍िक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व व‍िभागात रोजगार मेळावे आयोज‍ित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म‍िळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार म‍िळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत. 

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे.  राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५०  तालुक्यातील ५११ गावात  या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक  उद्योग  व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे  रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. 

ज‍िल्ह्यात  २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार -  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. ज‍िल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी ज‍िल्हा प्रशासन  कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली. 

संत गाडगेबाबा कौशल्य संस्थेचे जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी व अहमदनगर शहरात केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी ही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. मागील वर्षभरात ज‍िल्ह्यातील १८ हजार तरूणांना रोजगार न‍िर्माण होईल असे उपक्रम राबव‍िण्यात आले. ५०० एकराच्या तीन एमआयडीसी ज‍िल्ह्यात न‍िर्माण करण्यासाठी शासकीय जम‍िन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे  शेती महामंडळांची १८० कोटींची जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यातून  अहमदनगर व नाश‍िक व‍िभागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आाहे.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले की, या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी ६४ हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. यात ३०२ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. यामेळाव्यातून १० हजार रोजगार न‍िर्माण होणार आहेत. ज‍िल्ह्यात घेण्यात आलेल्या गुंतवणूक पर‍िषदेच्या माध्यमातून ६४८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करून ५ हजार १४ कोटींची गुंतवणूक झाली आहे.
कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृष्‍य प्रणालीच्या माध्यमातून  मान्यवरांच्या हस्ते  उद्धाटन करण्यात आले.  जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‍ज‍िल्हा गुंतवणूक पर‍िषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाश‍ित करण्यात आला. यावेळी ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध उद्योजक उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही  यूवक-युवतींना ॲप्रेंटीशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे यांनी आभार मानले. 

व‍िभागीय रोजगार मेळाव्यास तरूणांचा उदंड प्रतिसाद 

भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात आल्या होत्या. या रोजगार मेळाव्याच्या पह‍िल्या द‍िवशी पाच ज‍िल्ह्यातील सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रत‍िसाद द‍िला.  महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत. 

             000000000

Wednesday, 28 February 2024

महासंस्कृती महोत्सवात गुरुवारी पारंपारिक लोककला, शिवकालीन मर्दानी खेळ आणि आयुष्यावर बोलू काही किंगरी हे लोकनाट्य आणि स्वातंत्र्य लढ्वय्यांची गाथा

 पोलीस कवायत मैदान येथे आयोजित महासंस्कृ ती महोत्सवात दि.29 फेब्रुवारी रोजी होणारे कार्यक्रम👇


            जळगाव दि.28 ( जिमाका ) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.28 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत महासांस्कृतिक महोत्सव पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आले असून गुरुवार दि.29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पारंपारिक कला, शिवकालीन मर्दानी खेळ, लोकनाट्य, स्वातंत्र्य लढ्वय्यांची ची गाथा आणि शेवटी "आयुष्यावर बोलू काही" हा कार्यक्रम होईल.

            पारंपरिक लोक कला, नृत्य सादरकर्ते - प्रवीण वसंतराव पाटील व सहकारी सादर करतील, त्यानंतर शिवकालीन मर्दानी खेळ सादरकर्ते - युवराज माळी आणि इतर, रावेर जि. जळगाव, याशिवाय  किंगरी हे लोकनाटय होणार असून स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची गाथा श्री. भिका काशिनाथ भराडी, दलवाडे गोंडगाव ता. भडगाव हे सादर करणार आहेत. संध्याकाळी 7.30 महाराष्ट्रातील गाजलेला कार्यक्रम डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा "आयुष्यावर बोलू काही " हा कार्यक्रम होणार आहे. जळगावकरांनी मोठ्या संख्येनी कार्यक्रमाला यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000


महासंस्कृती महोत्सवाचे उदघाट्न खा. उन्मेष पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले जळगावमध्ये महासंस्कृती महोत्सवाचे आणि मुक्ताई सरस प्रदर्शनाचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते उदघाटन जळगावकरांसाठी पाच दिवसांची सांस्कृतिक मेजवानी ; जळगावकरांनो प्रत्यक्ष अनुभती घ्या - खा. उन्मेष पाटील यांचे आवाहन महिलांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी मुक्ताई सरस प्रदर्शनाचे आयोजन

 




















            जळगाव दि.28 ( जिमाका ) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांसाठी पाच दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्थानिक कलाकार आणि राज्यातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून जळगाकरांनी आनंद घ्यावा.या बरोबरच जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे 'मुक्ताई सरस प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाला भेट देऊन या महिला बचत गटांना प्रोत्साहन द्या असे आवाहन खा. उन्मेष पाटील यांनी केले.

            राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे दि.28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            देशाच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या त्यात गावागावात प्रशिक्षण देऊन ड्रोनदीदी तयार करणे, महिलांच्या बचत गटांना उमेदच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ सहाय्य,विकासासाठी अनेक योजना सुरु केल्याचे खा. उन्मेष पाटील यांनी यावेळी सांगितले.

            स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव होत आहे.आज उदघाटन झाले, अजून चार दिवस आहेत, त्या महोत्सवाचा जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

            स्थानिक कलाकार यांनी यावेळी वेगवेगळ्या कला सादर केल्या.  त्यानंतर सुप्रसिद्ध ' महाराष्ट्राची हास्य यात्रा ' हा कार्यक्रम सुरु झाला.

00000

वन संरक्षनासाठी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण संपन्न





         जळगाव दि. 28 ( जिमाका ) –   जिल्हाधिकारी कार्यालय व उपवनसंरक्षक, यावल  व पोलीस अधिक्षक जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली वनसंरक्षणाकरीता यावल वनविभाग जळगाव मधील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण ५ ते २४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत

देण्यात आले आहे.

   याआधी खुप वर्षापूर्वी  यावल वनविभागात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

            सदर शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण हे मुख्यत: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जळगाव येथे आयोजित करण्यांत आले होते. सदर प्रशिक्षण हे यावल वनविभाग जळगाव मधील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना वनसंरक्षणा करीता देण्यांत आलेले आहे. ५ ते २४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांचे मार्फत शारीरीक कवायत (P.T) ड्रिल, शस्त्र कवायत (ड्रिल) तसेच शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण त्यामध्ये ७.६ २.mm SLR व ९ mmपिस्टल यांचे खोलना – जोडना, ॲम्युनिशन भरना- खाली करना, वेगवेगळे फायर पोझीशन सोबत फायर करना इत्यादी प्रकारचे सराव यावल वनविभागातील वनक्षेत्रापाल, वनपाल व वनरक्षक यांचे कडून करुन घेण्यात आले आहे.

            शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण देण्यांत आलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना  २४ ते २६ फेब्रुवारी रोजी फायरिंग रेंजवर फायरिंग बाबत प्रशिक्षण देखील देण्यात आले. सदर दिवशी मा. जिल्हाधिकारी जळगाव, व मा. उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव हे उपस्थित होते त्यांनी सदर प्रशिक्षणबाबत कौतुक केले. व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना वनसंरक्षणा बाबत मोलचे मार्गदर्शन केले. राखीव वनात उपप्रवेश करुन सोबत शस्त्र घेवून अवैध वृक्षतोड अतिक्रमण व अवैध शिकार करण्यासाठी जे अज्ञात इसम जंगलात त्यांना अटकाव करण्यासाठी तसेच त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी , संरक्षण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षणाकरीता मा. पोलीस अधिक्षक सो. जळगाव यांचे सहकार्य लाभले, असे आवाहन सहा. वनसंरक्षक वनीकरण व वन्यजीव चोपडा यावल वनविभाग जळगाव यांनी केले आहे.

०००००००००००

सुधारित जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीची 11 मार्च पर्यंत विशेष मोहिम

   जळगाव दि. 28 ( जिमाका ) –  जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.२३ फेबुवारी, २०२४ ते ११  मार्च, २०२४ या कालावधीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांअतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील अर्ज सादर केलेल्या सर्व  विदयार्थ्यांचे अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच ३१ जानेवारी २०२३ अखेर व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेशीत विदयार्थी, सेवा, निवडणुक, या प्रयोजनाच्या अर्जाना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेली असून अशा अर्जदारांना जाहीर आवाहन करण्यात आले होते , दिनांक ०५ व ७ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदीर समोर महाबळ  जळगांव येथे त्रुटी पुर्तता शिबीर आयोजित करण्यात आले होते.

  तसेच शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सीईटी सेल अंतर्गत अर्ज भरले आहे. अशा विदयार्थ्यांनी तात्काळ त्यांचे अर्ज या कार्यालयात जमा करण्यात यावे. जेणेकरुन सदर कालावधीत विदयार्थी तसेच सेवा व निवडणूक अर्जदारास ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. असे अवाहन  उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी केले आहे.

                                                                           00000000

जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीची ११ मार्च पर्यंत विशेष मोहिम

             जळगाव दि. 28 ( जिमाका ) –  जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.२३ फेबुवारी, २०२४ ते ११  मार्च, २०२४ या कालावधीत आदयक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांअतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील अर्ज सादर केलेल्या सर्व  विदयार्थ्यांचे अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच ३१ जानेवारी २०२३ अखेर व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेशीत विदयार्थी, सेवा, निवडणुक, या प्रयोजनाच्या अर्जाना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेली असून अशा अर्जदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की, दिनांक ०५ व ७ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदीर समोर महाबळ  जळगांव येथे त्रुटी पुर्तता शिबीर आयोजित करण्यात आले असून, सदर कालावधीत मागासवर्गीय विदयार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या अर्जाबाबत त्रुटीची पूर्तता करण्यात यावी. जेणे करुन विदयाथ्यांचे अर्ज त्रुटी पुर्तता करुन निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.

            तसेच शैक्षणीक वर्ष २०२४ मध्ये ज्या मागासवर्गीय विदयाथ्यांनी सीईटी सेल अंतर्गत अर्ज भरले आहे अशा विदयार्थ्यांनी तात्काळ त्यांचे अर्ज या कार्यालयात जमा करण्यात यावे. जेणेकरुन सदर कालावधीत विदयार्थी तसेच सेवा व निवडणूक अर्जदारास ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. असे अवाहन  उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी केले आहे.

00000000

अनाथ बालकांना विविध दाखले देण्याकरिता, जळगाव मध्ये समर्पित कक्ष स्थापन

             जळगाव दि. 28 ( जिमाका ) –   अनाथ बालकांना विविध दाखले देण्याकरीता राज्यासह जळगाव जिल्हयात २३ फेब्रुवारी, २०२४ ते ५ मार्च, २०२४ या कालावधीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमातर्गंत अनाथ बालकांना आधाकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, महाराट्र राज्याचे अधिवास (Domecile) व राष्ट्रीयत्वाचा दाखला ( Nationality) व मतदान कार्ड आदी कागदपत्रे काढुन देण्यासाठी समर्पित कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यासाठी पंधरवडा मोहिम राबविण्यात येणार आहे.

            राज्यात अनाथ बालकांच्या विविध समस्या बधयला मिळतात, अनाथ बालकांना विविध दाखले काढण्याकरीता अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधी सुचना चर्चेदरम्यान विधनसभेत अनाथ बालकांच्या विविध मागण्या संबधित बैठक घेण्यासंदर्भत आश्वासन देण्यात आले होते.

            त्यानुसार महिला व बाल विकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आमदार बच्चु कडु यांच्या समावेत ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये २३ फेब्रुवारी, २०२४ ते ५ मार्च २०२४ या कालावधीत अनाथ बालकांना आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, महारार्ष्ट राज्याचे अधिवास  (Domecile)    व राष्ट्रीयत्वाचा दाखला ( Nationality) व मतदान कार्ड आदी कागदपत्रे त्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत संपुर्ण राज्यात पंधरवाडा राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुषगाने जिल्हास्तरावर महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातुन जिल्हयातील सर्व तालुका स्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे १५ दिवसाकरीता समर्पित कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००००००००

जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीची 11 मार्च पर्यंत विशेष मोहिम

             जळगाव दि. 28 ( जिमाका ) –  जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.२३ फेबुवारी, २०२४ ते ११  मार्च, २०२४ या कालावधीत आदयक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांअतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील अर्ज सादर केलेल्या सर्व  विदयार्थ्यांचे अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच ३१ जानेवारी २०२३ अखेर व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेशीत विदयार्थी, सेवा, निवडणुक, या प्रयोजनाच्या अर्जाना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेली असून अशा अर्जदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की, दिनांक ०५ व ७ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदीर समोर महाबळ  जळगांव येथे त्रुटी पुर्तता शिबीर आयोजित करण्यात आले असून, सदर कालावधीत मागासवर्गीय विदयार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या अर्जाबाबत त्रुटीची पूर्तता करण्यात यावी. जेणे करुन विदयाथ्यांचे अर्ज त्रुटी पुर्तता करुन निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.

            तसेच शैक्षणीक वर्ष २०२४ मध्ये ज्या मागासवर्गीय विदयाथ्यांनी सीईटी सेल अंतर्गत अर्ज भरले आहे अशा विदयार्थ्यांनी तात्काळ त्यांचे अर्ज या कार्यालयात जमा करण्यात यावे. जेणेकरुन सदर कालावधीत विदयार्थी तसेच सेवा व निवडणूक अर्जदारास ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. असे अवाहन  उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी केले आहे.

00000000

जिल्हाधिकारी कार्यालयात 4 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

          जळगाव दि. 28 ( जिमाका ) –  - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मार्च महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 4 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.  

            जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

00000

Tuesday, 27 February 2024

नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी 28 व 29 फेब्रुवारीला अहमदनगर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर नामांकित 200 पेक्षा अधिक कंपन्यांचा महारोजगार मेळाव्यात सहभाग युवक-युवतींनी रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

   अहमदनगर दि. 27 फेब्रुवारी (जिमाका): राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा 28 व 29 फेब्रुवारी 2024 रोजी अहमदनगर येथे होणार आहे. नाशिक विभागातील सर्व पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  अहमदनगर शहरातील भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात येणार आहे. महारोजगार मेळाव्यात 200 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होत असुन उद्योजक, व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार युवक-युवती यांची मुलाखतीद्वारे निवड करतील.

नमो महारोजगार मेळाव्यातून मिळणार करिअरच्या नवीन वाटांची माहिती

  दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक-युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्यात करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. नामांकित उद्योग, कंपन्यांमध्ये नोकरीची संधी कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संधी, स्टार्टअप व उद्योजकतेसाठी मार्गदर्शन ॲप्रेंटिसशिप यासह  स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान, चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

28 फेब्रुवारी रोजी लाभणार यांचे मार्गदर्शन

सकाळी 10 ते 11 या वेळेत अनिल पवार, एनरिच कन्सलटंसी, छत्रपती संभाजीनगर हे भविष्यातील नवतंत्रज्ञान व रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.  सकाळी 11-00 ते 12-00 या वेळेत शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर येथील प्राचार्य डॉ. दादासाहेब करंजूले हे मुलाखतीचे तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12-00 ते 1-00 या वेळेत सिम्युसॉप-ट टेक्नॉलॉजी, पुणे येथील कार्यकारी संचालक सुनिल चौरे हे इंडस्ट्री 4.0 व इनोव्हेशन, स्टार्टअप या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारी 2-00 ते 3-00 या वेळेत अमित मखरे रोजगार निर्मिती संधी आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

29 फेब्रुवारी रोजीचे प्रमुख मार्गदर्शक

सकाळी 10-00 ते 11-00 या वेळेत सी.ए.इन्स्टिट्युट, अहमदनगरचे चार्टर्ड अकाऊटंट राजेंद्र काळे हे शासकीय योजनांसाठी प्रकल्प अहवाल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11-00 ते दुपारी 12-00 टेक्नोट्रॅक प्रा.लि. अहमदनगरचे संचालक सुमित सोनवणे हे निर्यात क्षेत्रातील संधी व आव्हाने या विषयावर, दुपारी 12-00 ते 1-00 या वेळेत शासकीय तंत्र निकेतन, अहमदनगरचे डॉ. एस.डी. दुबल हे परिचय पत्र तयार करणे या विषयावर तर दुपारी 2-00 ते 3-00 या वेळेत इंडो इस्त्रायल अँग्रो इंडस्ट्रीज चेंबर अँड महा. ॲग्रोवर्ल्ड फार्मर प्रोडक्टस कंपनी, मुंबईचे निर्यातक विनायकराव भुसारे हे निर्यात क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

रोजगार मेळाव्यासाठी येथे करा ऑनलाईन नोंदणी

  नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी https://nmrmahmednagar.in हे संकेतस्थळ (क्यू आर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ‘उमेदवार’ पर्याय निवडून लॉगीन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, यासह इतर माहिती भरून छायाचित्र, सी.व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा.

                                                                                   ***

जिल्ह्यातील केळी पीक विमा अपीलात ६,६८६ प्रस्ताव मान्य, पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश

            जळगाव दि.27 ( जिमाका ) जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ११०३२ इतक्या शेतक-यांचे केळी पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ८१९० शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी ६६८६ अपील पात्र झाले आहेत.

             यापूर्वी केळी पीक विम्या बाबत 14 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार शेतकरी संघटना प्रतिनिधी बरोबर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर दि.26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील ११०३२ इतक्या शेतक-यांचे पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ८१९० शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल करण्यात आलेले होते त्यापैकी ६६८६ अपील पात्र असुन १५०४ अपील अपात्र करण्यात आलेले आहे.

            जळगांव जिल्हयातील ६६८६ अपील पात्र शेतक-यांना हेक्टरी रक्कम पात्र महसुल मंडळ निहाय मिळणार असून ही रक्कम हेक्टरी ७०००० रुपये या प्रमाणे गुणांकन करुन येणारी रक्कम जळगांव जिल्हयातील पात्र शेतक- यांना मिळणे अपेक्षित असुन यास जिल्हासतरीय समिती कडून मान्यता देण्यात आली आहे.

              या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक चंद्रकांत पाटील,जिल्हा अग्रणी बँक व्य्वस्थापक,प्रणवकुमार झा, श्रीकांत झांबरे, व्यवस्थापक, नाबार्ड, हेमंत बाहेती, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, कृषि विक स अधिकारी, जि.प. जळगांव, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी सर्व हे उपस्थित होते तसेच जिल्ह विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                                                             00000

जळगाव जिल्हा सांस्कृतिक महोत्सव,सविस्तर कार्यक्रम पत्रिका जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्वास्थ संजीवनी कार्यक्रमातून होणार कायापालट जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोयी सुविधासाठी साठी उपलब्ध झाला 7 कोटींचा निधी

            जळगाव - ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्ती तसेच विस्तारीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण या माध्यमातून सात कोटी रुपयांचा निधी पुनर्नियोजनाने  उपलब्ध करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्वास्थ संजीवनी नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटणार आहे. त्यासोबतच या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

            या सर्व कामांना मा जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आले आहेत.

            जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला ठिकठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्यात येतात. आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व्हावे व या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यातयासाठी जिल्ह्यातील ४६ आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या निधीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती तसेच फर्निचर सह रंग काम व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्यात त्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व्हावे व अत्याधुनिकरण होऊन आरोग्याच्या प्राथमिक सोयीसुविधा एकाच छताखाली दर्जेदार पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आग्रही होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर यांनी जळगाव जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीचा तसेच अत्याधुनिकरणाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे ठेवल्यानंतर जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेल्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार व खासदार यांनी तात्काळ या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

            जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सात कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये दुरुस्ती, रंगकाम,, फर्निचर, व इतर सुशोभीकरणाची कामे व अत्याधुनिकरण होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना स्वभावतालचे वातावरण प्रसन्न असणे गरजेचे असते या उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून ग्रामीण भागातील जनतेला प्रसन्न व अल्हाददायक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. जिल्ह्यात प्रथमच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सुशोभीकरणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे एकाच वेळी जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांचे रूप पालटणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सात कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला स्वास्थ संजीवनी कार्यक्रम खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संजीवनी देणारा ठरणार आहे.

                                                         00000



 जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्वास्थ संजीवनी कार्यक्रमातून होणार कायापालट

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोयी सुविधासाठी साठी उपलब्ध झाला 7 कोटींचा निधी

जळगाव - ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्ती तसेच विस्तारीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण या माध्यमातून सात कोटी रुपयांचा निधी पुनर्नियोजनाने  उपलब्ध करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्वास्थ संजीवनी नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटणार आहे. त्यासोबतच या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या सर्व कामांना मा जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आले आहेत.

 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला ठिकठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्यात येतात. आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व्हावे व या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यातयासाठी जिल्ह्यातील ४६ आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या निधीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती तसेच फर्निचर सह रंग काम व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्यात त्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व्हावे व अत्याधुनिकरण होऊन आरोग्याच्या प्राथमिक सोयीसुविधा एकाच छताखाली दर्जेदार पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आग्रही होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर यांनी जळगाव जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीचा तसेच अत्याधुनिकरणाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे ठेवल्यानंतर जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेल्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार व खासदार यांनी तात्काळ या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सात कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये दुरुस्ती, रंगकाम,, फर्निचर, व इतर सुशोभीकरणाची कामे व अत्याधुनिकरण होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना स्वभावतालचे वातावरण प्रसन्न असणे गरजेचे असते या उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून ग्रामीण भागातील जनतेला प्रसन्न व अल्हाददायक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. जिल्ह्यात प्रथमच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सुशोभीकरणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे एकाच वेळी जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांचे रूप पालटणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सात कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला स्वास्थ संजीवनी कार्यक्रम खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संजीवनी देणारा ठरणार आहे.

सामाजिक न्याय विभागाची 'लिंग संवेदना " या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

 जळगाव दि. 27 ( जिमाका ) –  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराट्र विदयापीठ, जळगाव येथे समाजशास्त्र प्रशाळा, समाजकार्य विभाग, व  सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 फेब्रुवारी, 2024 रोजी लिंग संवेदना या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेत श्रीमती  शमिभा पाटील यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे होते.

  यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, यांनी आपले मत व्यक्त करतांना तृतीयपंथीय व्यक्तींच्या लिंग संवेदना  याबाबत मार्गदर्शन करतांना लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो असे मत व्यक्त केले. तसेच कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जीवन जगण्याचा दृष्टीकोन व अपेक्षा विषयी तृतीयपंथीयांना देखील इतर माणसांप्रमाणे जीवन जगण्याचे अधिकार आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने तृतीयपंथीय व्यक्ती उपस्थित असून त्यांचेसह समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

  कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी प्रा. डॉ. दिपक सोनवणे यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. महेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश माळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार        प्रा. डिगंबर सावंता  यांनी  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभाग, समाजशास्र प्रशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील प्राध्यापक व कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे श्री. राहुल पाटील, श्री. किशोर माळी, श्री. चेतन चौधरी, श्री. राहुल महाले, श्री.अक्षय साबळे, श्री. अनिल पगारे, श्री. जितेंद्र धनगर आदींनी प्रयत्न केले. असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                           ०००००००००

अवैध गौणखनिज करीत असतांना वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री

         जळगाव दि. 27 ( जिमाका ) – जामनेर तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकाविरुध्द दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे परंतु सदर वाहनाचे मालक यांनी दंडाची रक्कम अदयापावेतो शासन जमा केली नसल्याचे या कार्यालयामार्फत सदर वाहने जंगम मालमत्ता अटकावुन ठेवण्याचे अधिपत्र नमुना -३ कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी 7 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जप्त करण्यात आलेला वाहनाचा लिलाव करण्यात येत आहे.

            1) वाहन मालकाचे नाव – शिवाजी प्रभाकर पाटील, वाहन क्रमांक – जे.सी.बी.चेसीसनं. 1814936 M2011 , वाहन प्रकार – जे.सी.बी , हातची किंमत – 15,65,200/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 15,65,200/-, सदरचे वाहन कोठे आहे. तहसिल कार्यालय जामनेर,

       2) वाहन मालकाचे नाव – शिवाजी प्रभाकर पाटील, (सदाशिव मोहन रोकडे)  वाहन क्रमांक – ट्रॅक्टर क्र. MH 19 CU 4372, वाहन प्रकार – ट्रॅक्टर   हातची किंमत – 15,65,200/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 15,65,200/-, सदरचे वाहन कोठे आहे. पोलीस पाटील मालखेडा,

 3) वाहन मालकाचे नाव – भुषण जगन्नाथ वाघ  - वाहन क्रमांक –MH 19 Z3015, वाहन प्रकार – डंपर , हातची किंमत – 3,22,655/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,68,655/-, सदरचे वाहन कोठे आहे. तहसिल कार्यालय जामनेर,

4) वाहन मालकाचे नाव – राजेंद्र देवगिर गोसावी  - वाहन क्रमांक – इंजिन क्र. JBHZ430403, वाहन प्रकार – डंपर , हातची किंमत – 12,85,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,68,660/-, सदरचे वाहन कोठे आहे. तहसिल कार्यालय जामनेर,

5) वाहन मालकाचे नाव – भरतसिंग विठ्ठलसिंग परदेशी  (गणेश भरत परदेशी)   - वाहन क्रमांक – ट्रॅक्टर क्र. MH 19 CZ 6983  व विना क्रमांकाची ट्रॉली, वाहन प्रकार – ट्रॅक्टर व ट्रॉली, हातची किंमत – 4,61,500/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 1,22,885/-, सदरचे वाहन कोठे आहे.  जुने तहसिल कार्यालय जामनेर,

6)विनोद उर्फ बंडु विश्वास पाटील ( विष्णु लक्ष्मण काळे )  - वाहन क्रमांक – डंपर क्र. MH 20DE 3204, वाहन प्रकार – डंपर,  हातची किंमत – 10,80,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,91,545/-, सदरचे वाहन कोठे आहे.  पहूर पोलीस स्टेशन,

7) ज्ञानेश्वर दिनकर बावस्कर- वाहन क्रमांक – ट्रक क्र. MH 41G5321, वाहन प्रकार –  ट्रक - हातची किंमत – 7,25,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,45,780/-, सदरचे वाहन कोठे आहे.  कृ.उ.बा.समिती जामनेर

8) अरुण पंढरीनाथ नन्नवरे- वाहन क्रमांक – आयशर क्र. MH 18AA8240, वाहन प्रकार –  आयशर - हातची किंमत – 4,05,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,45,780/-, सदरचे वाहन कोठे आहे.  कृ.उ.बा.समिती जामनेर,

            सदर लिलावात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी 5 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपावतो तहसिल कार्यालय, जामनेर येथे संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार जामनेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००००

महिला व बाल कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहासाठी जागा देण्यासाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन

         जळगाव दि. 27 ( जिमाका ) -  केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेतील सामर्थ या योजनेअंतर्गत सखी निवास (नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह) ही घटक योजना राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेले आहे. त्यानुसार राज्यात सुरु असलेली नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह ही योजना केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ या योजनेअंतर्गत सखी निवास या नावाने  राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हयात एक सखी निवास भाडेतत्वावरील सुयोग्य इमारतीमध्ये केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार त्यांना प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापन या करीता अनुदानासह कार्यान्विती करावयाची असल्याने या पत्राव्दारे सुचित करण्यात आले होते, तसेच 3 जून, 2023 रोजी आयुक्तालय स्तरावरुन सर्व जिल्हयातील वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आलेली असून निकशाप्रमाणे इच्छुकसंस्थेने 30 जून, 2023 रोजी दुपारी 2.00 पर्यंत प्रस्ताव मागविणेबाबत आवाहन केलेले होते. परंतु आता सदरची मुदत वाढवुन दिनांक 4 मार्च, 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक संस्थांनी उपरोक्त निकशाप्रमाणे त्यांचे परीपुर्ण प्रस्ताव  4 मार्च, 2024 चे 5.00 वाजेपर्यंत या कार्यालयात 5 प्रतीत सादर रावे असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रितसर सविस्तर माहिती करीता आयुक्तालयाच्या  https://www.wcdcommpune.com  या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.

००००००००००

मालमत्तेचा 27 मार्च रोजी लिलाव

         जळगाव दि. 27 ( जिमाका ) -   जामनेर येथील गट क्र.304/2/ब/१ क्षेत्र हे. ०.८१ ही स्थावर मालमत्ता कसुरदार  श्री. सुरेशचंद्र दिपसंद्रजी साबद्रा जामनेर यांनी अवैध गौणखनिज दंड न भरल्याने शासन जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे दंडाची वसुली करणेसाठी या मालमत्तेचा जाहीर लिलाव  २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११. वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे ठेवला आहे. ज्या कुणाला ही मालमत्ता घ्यायची असतील त्यांनी  २२ मार्च, २०२४ रोजी सांयकाळी ५.०० वाजेपावेतो तहसिल कार्यालय, जामनेर येथे संपर्क साधावा, असे तहसिलदार जामनेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००००

Monday, 26 February 2024

मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराकडून,कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

   जळगाव दि. 23 ( जिमाका ) -  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जळगांव जिल्हा कार्यालयास   सन  २०२३-२४  या आर्थिक  वर्षाकरीता एनएसएफडीसी योजनेचे खालील प्रमाणे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. योजनेचे कर्ज प्रस्ताव   जळगाव  जिल्हयातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराकडून https://beta.slasdc.org या वेबसाईटवर मागविण्यात येत आहे.

  योजनेचे नाव – सुविधा कर्ज योजना,  भौतिक उद्दिष्ट – 40, प्रकल्प मर्यादा - ५,००,०००/- 

आर्थिक उद्दिष्ट (लाखात) – २००.००,  महिला समृध्दी योजना – भौतिक उद्दिष्ट - २५, प्रकल्प मर्यादा – १,४०,०००/- आर्थिक उद्दिष्ट (लाखात) – ३५.०० 

  जळगाव जिल्हयातील मांग/मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण व ५० वर्षापेक्षा जास्त नसावे शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.३ लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच अर्जदाराने यापूर्वी  महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेत साधारपणे समाविष्ट  लघु व्यवसाय उदा, मोबाईल सर्व्हिसींग/रिपेअरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरींग  फ्रिज, एस, सी, टी.व्ही मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डवेअर, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग टेलरिंग, फुड प्राडक्स/प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल /  स्टेशनरी स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फेब्रीकेशन/ वेल्डींग, हार्डवेअर व सेनेटरी शॉप, प्रिंटीग, शिवनकला, झेरॉथ्स / रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार मॅकेनिक/रिपेअर, शेतीशी निगडीत पुरक/जोडव्यवसाय तसेच वाहन इत्यादी व्यवसायास तसेच वाहन इत्यादी व्यवसायासाठी कर्ज मागणी प्रस्ताव online  सादर करावे.

  ऑनलाईन कर्ज प्रस्तावासोबत  अपलोड करावयाची कागदपत्रे  - जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो,  रेशन कार्ड (समोरचे पान व शेवटचे पान),  आधार कार्ड समोरील बाजु व  पाठीमागील बाजु,  पॅन कार्ड, व्यवसायाचे दरपत्रक कोटेशन,  व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या कठकाणची भाडेपावती,  भाडे करारनामा किंवा मालकी हक्काचा पुरावा नमुना नं.८, लाईट बील व टॅक्स पावतीसह प्रतिज्ञापत्र बॉन्डवर नोटरी सह,  ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा शॉपॲक्ट लायसन्स, उदयोग आधार परवाना,  व्यवसायासबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणापत्र अर्जदाराचे,  सिबील क्रेडीट स्कोअर ५०० असावा, बॅकेची पासबुक झेराक्स,  वाहन खरेदीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आर.टी.ओ. कडील प्रवासी वाहतुक परवाना, प्रकल्प अहवाल  वरील योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या वेबसाईटवर दिलेल्या सुचनेनुसार दि. २३ फेब्रुवारी २०२४ ते दि.२५ मार्च २०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व सादर केलेल्या कर्ज मागणी अर्जाची व त्याचसोबत अपलोड केलेल्या संपूर्ण कागदपत्रांची ३ प्रतीत (हार्ड कॉपी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टज्ञॅप समोर, हातनुर कॉलनी, जळगाव येथे दि. २५ मार्च, २०२४ कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते ६. १५ वाजेपर्यंत सादर करावी.

  सुविधा कर्ज योजना या योजनेचे कर्ज मागणी अर्ज स्त्री व पुरुष हे अपलोड करातील, महिला समृध्दी योजनेचे कर्ज मागणी अर्ज फक्त महिला अर्जदार अपलोड करतील, सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थीचे कर्ज प्रकरण लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयात मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल, सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजना पैकी अर्जदार एकाच योजनेचा कर्ज प्रस्ताव अपलोड करु शकतील, सुविधा कर्ज योजना व महिला  समृध्दी योजना या दोन योजने अंतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णय क्र. म.क.वा. २०१२/ प्र.क्र. १४९/ महामंडळ दिनांक १४ मे, २०१२ नुसार लाभार्थीचे निवड लॉटरी पध्दतीने केला जाईल असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक तारचंद कसबे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) जळगाव यांनी केले आहे.  

                                                                        ०००००००००

Saturday, 24 February 2024

जिल्ह्यातील सावदा आणि किनगाव येथील रुग्णालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण

 

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्यसेवा बळकटीत भर

 

            जळगाव दि.24 ( जिमाका ) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा ता. रावेर जि. जळगांव येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे आणि किनगांव ता. यावल जि. जळगांव येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे.

            जळगांव जिल्हयातील सावदा ता. रावेर येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.

            सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत ३० खाटांची असून दोन मजली आहे. त्यात तळमल्याचे क्षेत्रफळ १८००० चौरस फुट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ ११,३०० चौरस फुट असे एकुण २९,३०० चौरस फुटाची इमारत आहे.

            तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच  डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत.

            अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण २४ असुन वर्ग-१ चे एक, वर्ग-२ चे तीन, वर्ग-३ चे आठ व वर्ग-४ चे १२ निवासस्थान आहे.

 

 किनगाव ता. यावल येथील ग्रामीण रुग्णालय 

            जळगांव जिल्हयातील किनगाव ता. यावल येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन  २०१८-१९ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.

             या इमारतीचे तळमल्याचे क्षेत्रफळ १३२५० चौरस फुट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षे. १३,२५० चौरस फुट असे एकुण २६,५०० चौरस फुटाची ची इमारत आहे. तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच  डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत.

            या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण १२ असुन वर्ग-२ चे चार, वर्ग-३ चे आठ निवासस्थान आहे.

            अशाप्रकारे आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक बाबींचा समावेश करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

00000