जळगाव, (जिमाका) दि. 2 - हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील येवा वाढत असून धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील गावातील रहिवाशांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज
2 सप्टेंबर 2021 रोजी हतनूर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर
पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत
असल्याने हतनूर धरणामधून पाणी सोडावे लागणार आहे. तापी नदीकाठावरील सर्व नागरिक व
सर्व शासकीय यंत्रणांनी सावध राहावे. नदी काठावरील गावातील लोकांनी तापी नदी
पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जीवितहानी
व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क रहावे तसेच सर्वांनी आपली काळजी घ्यावी,
असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
No comments:
Post a Comment