जळगाव दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) – दि. 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी
खात्याचे अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. बाधित कुटुंबांना
तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे.
अमळनेर तालुका – पातोंडा व नांद्री गावांतील पारधी
वस्त्यांना पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात हलविण्यात आले.
भडगाव
तालुका – कनाशी व बोरनार येथे कपाशीचे नुकसान, कोठली येथे ऊस पिकाचे नुकसान.
रावेर तालुका
– नागझिरी नाल्याला पूर; बक्षीपुर येथे घराची भिंत कोसळून सात-आठ शेळ्या दगावल्या.
जळगाव तालुका – वडली जवखेडे व बोरनार-लमांजन
शिवारात पिकांचे नुकसान.
धरणगाव तालुका
– कल्याणे खुर्द येथे नुकसान पाहणी.
पारोळा व एरंडोल
तालुका – विविध शिवारात पिकांची हानी.
बोदवड तालुका
– घरावर झाड कोसळून नुकसान; घरातील व्यक्तींना सौम्य दुखापत.
पाचोरा तालुका
– लासगाव, सामनेर येथे पीकनुकसानीची पाहणी.
जिल्हा प्रशासनाने कळविले आहे की, आपत्तीग्रस्तांना
शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा प्रशासन तत्पर
▪ शासन ठामपणे
आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी आहे.
▪शेतकऱ्यांच्या
नुकसानीचे पंचनामे होतील.
▪मदत वेळेत
व पारदर्शकपणे पोहोचविली जाईल.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सातत्याने
संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
००००००००००००
No comments:
Post a Comment