जळगाव,
(जिमाका वृत्तसेवा) दि. 1 - राज्य शासनाने
कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि.
13.3.2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमित
केलेली आहे.
जळगाव
शहरात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक
उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व
उद्योग, कंपनी व तत्सम आस्थापना दिनांक 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याबाबत
आदेश पारित करण्यात आलेले होते.
शासनाने
14 एप्रिल, 2020 पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (Lockdown) लागु करण्यात आली
असल्याने यामधून अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, उद्योग, कारखाने,
व्यवसाय वगळून इतर सर्व कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय पूर्णपणे बंद
करण्याबाबतचे आदेश दिनांक 15 एप्रिल, 2020 च्या रात्री 1 वाजेपर्यंत कायम ठेवण्यात
आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment