जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 - देशात कोरोना
विषाणुच्या प्रादुभार्वामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकाडाऊनच्या काळात जीवनावश्यक
व अत्यावश्यक सेवा सुरु असल्यामुळे जिल्ह्यात फेडरेशनमार्फत सुरु असलेली कोणतीही
खरेदी बंद करु नये. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी सर्वसंबंधित
यंत्रणांना दिल्यात.
कोरोना
विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची
आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या
अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील
कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह
नोडल अधिकारी उपस्थित होते.
डॉ.
ढाकणे पुढे म्हणाले की, वाढीव लॉकडाऊनच्या कालावधीत निवारा गृहात असलेल्या
नागरीकांना त्यांच्या मुळ गावी जावयाचे आहे की ते जीथे काम करीत होते. त्याठिकाणी
जायचे आहे याची माहिती घ्यावी. नवसंजीवनी योजनेत समावेश असलेल्या गावांना
अन्नधान्याचा पुरवठा वेळेत होत आहे काय याची माहिती घ्यावी. शालेय पोषण आहाराचे
वाटप करताना मुलांन बोलविता फक्त त्यांच्या पालकांनाच बोलवावे. वाटपाच्यावेळी सोशल
डिस्टन्सिंगचे पालन करावे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात लागणारी बी.बीयाणे, खते
यांची मागणी व पुरवठा याचे नियोजन करावे. किरकोळ भाजीपाला विक्रीसाठी जीएस
ग्राउंड, सागर पार्क व आवश्यकता भासल्यास नाटयगृहासमोरीत मैदानही उपलब्ध करुन
देण्यात येईल.
लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू
नागरीकांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे याकरीता पुरवठा विभागाने ग्रामीण व आदिवासी
भागातील ज्या नागरीकांकडे रेशनकार्ड नाही त्यांना रेशनकार्ड देण्यासाठी नियोजन
करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांना रेशनच्या धान्याचा लाभ
मिळावा याकरीता जिल्हा परिषद व महानगरपालिकेने त्यांचेकडील जन्म-मृत्यु नोंद वही
दरमहा संबंधित तालुकयाचे तहसीलदार यांना उपलब्ध करुन दयावी . जेणेकरुन मृत्यु
झालेल्यांची नावे कमी करुन इतर लाभार्थ्यांना लाभ देता येईल.
मालेगाव येथील कोरोना बाधितांची
वाढती संख्या लक्षात घेता जिल्हयाच्या सीमाबंदी अधिक प्रभावीपणे राबवावी. विशेषत:
मालेगाव –चाळीसगाव रस्त्यांवरील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलामार्फत लक्ष
ठेवण्याच्या सुचना द्याव्यत. मालेगाव कडून कोणत्याही प्रकारे वाहने जिल्ह्याच्या
हद्दीत येणार नाही याची दक्षता पोलीस व परिवहन विभागाने घ्यावी. अत्यावश्यक सेवेचे
स्टीकर लावून फिरणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करुन विनाकारण फिरत असल्याचे
निदर्शनास आल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी
पोलीस विभागास दिल्यात. त्याचबरोबर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेण्यास जात
असल्याचे अनेक नागरीक सांगतात. वारंवार त्याच कामासाठी येणाऱ्यांची संख्या कमी
व्हावी, याकरीता औषधे घेतल्यानंतर त्यावर औषध दुकानदारांने औषधे दिल्याच्या शिक्का
मारावा. त्याचबरोबर कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांमध्ये जाऊन
सर्व्हेक्षण करणाऱ्या आंगणवाडी सेविका, अशावर्कर, आरोग्य कर्मचारी यांना मास्क,
सॅनिटायझर आरोग्य विभागाने तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. तसेच निवारागृहातील
नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध होतील तसेच त्यांची तपासणी
करावी. नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही याकरीता जिल्ह्यात
जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी परिवहन विभागाने दक्षता
घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्यात.
00000
No comments:
Post a Comment