जळगाव, दि.19 जुलै (जिमाका) :-औरंगाबाद क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित केली आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण
माहितीसह दोन प्रतीत अ.ख.शेख, सहाय्यक निदेशक डाक सेवा (ज. शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद
-४३१००२ या पत्त्यावर १९ जुलै २०२३ पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर
आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी
www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे औरंगाबाद क्षेत्राचे
पोस्टमास्तर जनरल प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment