Monday, 30 October 2023

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव दि. ३० ऑक्टोबर (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण होवून पुढील वर्गात शिकत आहेत, अशा माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता संबंधित माजी सैनिक अथवा दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी यांनी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत.

शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची २० डिसेंबर २०२३ पर्यंत छाननी केली जाणार आहे. प्रत्येक संवर्गातील गुणवत्तेनुसार यादी तयार करून शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. ज्या पाल्यांनी  सीईटी/जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणांसोबत गॅप प्रमाणपत्रासह (प्रतिज्ञापत्र) अर्ज सादर करावा. पदविकानंतर द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांचेही अर्ज स्विकारले जातील तसेच सदर अर्ज पाल्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या गुणांची सरासरी काढून त्यांची शिष्यवृत्ती पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. ०२५७ - २२४१४१४ येथे संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

००००००००००

जिल्हाधिकारी कार्यालयात ६ नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

       जळगाव, दि. ३० ऑक्टोबर (जिमाका) -  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ६ नोव्हेंबर, १०२३ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.  

जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

00000

Friday, 27 October 2023

बॅकांनी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हास्तरीय बँक सल्लागार समन्वय समितीची बैठक संपन्न




            जळगाव, दि.27 ऑक्टोबर (जिमाका) – बँकांशी संलग्न असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवाळीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बॅकेंच्या जिल्हा व्यवस्थापकांना दिल्या.

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यावसायिक कर्जे, बचतगटांच्या कर्जाबाबत ही आढावा घेण्यात आला.

श्री.प्रसाद म्हणाले, पीएम स्वनिधी  पोर्टलवरील पेंडन्सी दूर करण्याचे काम करण्यात यावे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त होतील यासाठी बँकानी प्रचार - प्रसाराचे काम करावे. प्राप्त प्रस्तावांची तात्काळ तपासणी करून अर्जदारांना लाभ देण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या पोर्टलवरील अडचणी दूर करण्यात याव्यात. स्टार्ट अप इंडिया योजनेत बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरशी समन्वय साधून योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी.

प्रधानमंत्री जन-धन योजनेत नागरी स्थानिक संस्थेच्या समन्वयाने बँकिंग नसलेल्या क्लस्टर्ससह इतर क्षेत्रांमध्ये बँकिंग योजनांची व्याप्ती वाढविण्याचे काम करण्यात यावे. स्वयंसहाय्यता बचत गटांच्या कर्ज खात्यांना जास्तीत जास्त दुसरा आणि तिसरा डोस वितरण सुनिश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या मार्फत प्राप्त जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत. सुकन्या समृद्धी योजनेचा जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्रचार-प्रसार करण्यात यावा. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचतगटांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील १०० ठिकाणी बॅक सखी नियुक्त करावयाच्या आहेत. यासाठी बॅकांनी समन्वयाने कामकाज करावे.

शासनाच्या या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व एक चांगला आराखडा तयार करण्यासाठी सर्व जिल्हा व्यवस्थापक, प्रमुख व समन्वयकांची २ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती ही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिली.

0000000

Friday, 20 October 2023

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम - पालकमंत्री गुलाबराव पाटील माझी माती - माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा कार्यक्रम





         जळगाव, दि. २० ऑक्टोंबर (जिमाका) -  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले असून देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून देशाप्रती मायभूमीच्या माती विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम असून  देशभक्तीची उज्वल परंपरा जोपासली जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव पंचायत समिती आवारात  माझी माती – माझा देश अंतर्गत अमृत कलशांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे  सुपूर्द करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात माझी माती – माझा देश अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, माझी माती – माझा देश या संकल्पनेतून प्रधानमंत्री श्री. मोदीसाहेबांनी देशातील सर्व घटकांना, अबाल वृद्ध, सर्व वयोगटातील लोक, महिला यांना एकत्र  करण्याचे काम केले आहे. त्याला आपल्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री यांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, विभाग, सर्व नागरिक, ग्रामस्थ यांचे आभार व शुभेच्छा दिल्या. या अमृत कलशांमध्ये तालुक्यांमधील प्रत्येक गावांमधील माती आणि तांदूळ जमा करण्यात आले आहेत. सुरुवातीस पंचायत समिती आवारामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातून  आणलेल्या अमृत कलशांचे स्वागत करण्यात आले.

धरणगावात 'कलशाची' निघाली भव्य मिरवणूक !

धरणगाव शहरातील पंचायत समिती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढत 'माझी माती - माझा देश' च्या कलशाचे पूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  करीत नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांच्यासह मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी देशभक्ती पर गीते  सादर करून, चौका - चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी पालकंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मेरी माटी - मेरा देश कलश कार्यक्रमा बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन  ग्रामविकास संघटनेचे सचिव पंजाबराव पाटील यांनी केले तर आभार  अध्यक्ष सी. एन. सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय डॉ. संजय भायेकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, उपजिल्हाप्रमुख पाटील सर माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहरप्रमुख विलास महाजन, गट नेते पप्पू भावे, विस्तार अधिकारी कैलास पाटील, संजय धनगर, ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष सी. एन. सोनवणे, सचिव पंजाबराव पाटील, तालुक्यातील  सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000000

चमत्कार दाखवा आणि एकवीस लाख रुपये मिळवा - दिगंबर कट्यारे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार सादरीकरण कार्यशाळा संपन्न

 



        जळगाव, दि. २० ऑक्टोंबर (जिमाका) - पाण्याचा दिवा पेटविणे, जीभेतून सुई आरपार करणे, हातातून रक्त काढणे, गडूतून अखंडपणे पाणी बाहेर काढणे, जळका कापूर खाणे, दोरीची गाठ गायब करणे अशा विविध चमत्कारामागील विज्ञान समजून सांगत 'चमत्कार दाखवा आणि एकवीस लाख रुपये मिळवा' असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे यांनी आज येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "जादूटोणा विरोधी कायदा प्रचार,‌ प्रसार व चमत्कार सादरीकरण" कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत श्री.कट्यारे यांनी विविध प्रात्यक्षिकांसह जादूटोणा बाबत गैरसमज दूर केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी कार्यशाळेचे आयोजनात पुढाकार घेतला. जादूटोणा कायद्याचा जास्तीत जास्त प्रचार- प्रसार व्हावा या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत श्री. कट्यारे यांनी जादूटोणाविरोधी कायदा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले .कायद्यातील विविध कलमांची सखोल माहिती दिली. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने होणारे शोषणाच्या विरोधात कायदा कसा प्रभावी आहे हे समजून दिले.

चमत्कार करण्याच्या  बहाण्याने अलौकिक शक्ती असल्याचे सांगून लोकांची फसवणूक कशी होते ते सरांनी प्रात्यक्षिक करून सिद्ध केले.

कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक माधव धकाते  उपस्थित होते. प्रास्ताविक बार्टीचे प्रकल्प अधिकारी युनुस तडवी यांनी केले. ‌सूत्रसंचालन कार्यालयीन सहायक करनसिंह सोलंकी केले तर आभार देवेंद्र महाजन यांनी मानले.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी बार्टीचे समतादूत सरला गाढे, कल्पना बेलसरे श्री.सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत मोठ्या संख्येने आदिवासी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

००००००००००


जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी १५ नोव्हेंबर पर्यंत महिला तक्रार निवारण समिती स्थापन कराव्यात समित्यांचे बोर्ड दर्शनी भागात लावण्यात यावेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना सर्व शासकीय विभाग प्रमुख, शिक्षण संस्था व खासगी आस्थापनांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद





         जळगाव, दि. २० ऑक्टोंबर (जिमाका) – कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समित्या  (विशाखा समिती) जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी १५ नोव्हेंबरपर्यंत स्थापन कराव्यात. समित्यांचे बोर्ड (फलक) कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या.

कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायद्यांबाबत महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख, शिक्षण संस्था प्रमुख, खासगी आस्थापना प्रमुख यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वनिता सोनगत  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले की, विशाखा समित्या स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत समित्या स्थापन करून गुगल लिंकद्वारे अहवाल सादर करावा.

 

कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तसेच सदर कायद्यानुसार प्रत्येक प्रत्येक शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांच्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी आस्थापनेवर असल्यास आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणेबाबत कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. तसेच जी कार्यालये / आस्थापना यांचेकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्यात आली नसेल अशी कार्यालये / आस्थापना प्रमुखांवर रक्कम रु.५०,०००/- दंड वसुलीची कार्यवाही करणेबाबत संदर्भिय कायद्याचे कलम २६ (१) यामध्ये नमुद करण्यात आलेले आहे.

सदर कायदयांन्वये समिती स्थापन केल्याबाबतचा अहवाल दरवर्षी शासनास सादर करावा लागतो. परंतू बऱ्याच कार्यालयानमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित केलेल्या नाहीत. त्यानुषंगाने जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून https://forms.gle/XtQb3eoFmRA3ENny5  गुगल लिंक तयार करण्यात आलेली असून या गुगल लिंकवर कार्यालयाने माहिती भरावी तसेच सदरची गुगल लिंक आपले अधिनस्त असलेल्या व आपले स्तरावरून मान्यता दिलेल्या शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी आस्थापना/ कंपनी उद्योग/व्यायसायीका शाळा/ महाविदयालय कोचिंग क्लासेस इत्यादी सर्व कार्यालयामध्ये पाठविण्यात यावी. व त्यांना गुगल लिंकवर माहिती भरण्याबाबत कळविण्यात यावे.

ज्या कार्यालय प्रमुखांकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नसेल त्यांना  कायद्याचे कलम २६ (१) नुसार ५० हजार रूपयांचा दंड आकारण्याच्या कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. तसेच ज्या आस्थापना प्रमुखांच्या अधिनस्त कार्यालयांनी गुगल लिंक भलेलेली नसेल त्या आस्थापना प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून खुलासा सादर करावा लागेल. ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवरिल कर्मचारी यांची संख्या १० पेक्षा कमी असेल त्यांनीही गुगुल लिंक भरावी. व १० पेक्षा कमी कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र गुगल फॉमच्या शेवटच्या मुददयामध्ये अपलोड करण्यात यावेत, ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्मचारी यांची संख्या १० किंवा १० पेक्षा अधिक असेल त्यांनी समिती गठीत केल्याच्या आदेशाची प्रत सदरच्या मुददयामध्ये अपलोड करावी. अशा सूचना ही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात विशाखा समिती फलकाचे अनावरण

जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वीच विशाखा समिती गठीत होती. मात्र याबाबतचा बोर्ड दर्शनी भागात प्रदर्शित होईल असा नव्हता. ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आजच तात्काळ बोर्ड लावण्याचा प्रशासनाला सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या फलकाचे आज अनावरण करण्यात आले.

00000


शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघास अजिंक्यपद सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 


            जळगाव, दि. २० ऑक्टोंबर (जिमाका)- पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्ष वयोगट मुले व मुली शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघाने अजिंक्यपद पटकावले. यातून जिल्ह्यातील सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ‌.

नागपूर येथे संपन्न झालेल्या  राज्यस्तर सॉफ्ट बॉल स्पर्धेत जळगाव येथील ब गो शानबाग विद्यालयाच्या संघाने नाशिक विभागाचे नेतृत्व करतांना अजिंक्यपद प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात सृष्टी बागुल, जान्हवी पाटील, चैताली पाटील, योगेश वाघ, वेद पाटील व  चिराग मांडोळे या खेळाडूंची बिकानेर (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

हे सर्व खेळाडू जिल्हा क्रीडा संकुल येथील जिल्हा सॉफ्टबॉल प्रशिक्षण केंद्र येथे सराव करतात. या खेळाडूंचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

००००००००


राज्यातील ५११ तर जिल्‍ह्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ




             जळगाव दि. २० ऑक्टोबर (जि.मा.का.वृत्तसेवा ) :-  गरीब, होतकरू, बेरोजगार युवक-युवतींना  मोफत प्रशिक्षणातून नोकरी तथा व्यवसायातून अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देण्याची खात्री असलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ राज्यात ५११ ठिकाणी तर जळगाव जिल्ह्यातील २४ ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  दूरदृश्य प्रणालीद्वारे एकाचवेळी करण्यात आला.

        कार्यक्रमास मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात  लोढा , मुख्य सचिव मनोज सौनिक हे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी‌ कार्यालयातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे आसोदा येथून सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील २४ केंद्रांवर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व सुशिक्षित बेरोजगार तरूण दूरदृष्यप्रणालीद्वारे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील २४ केंद्राचा शुभारंभ

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यासह जिल्हयातील जळगाव तालुक्यातील आसोदा, भुसावळ तालुक्यातील कंडारी व खडके,  पारोळा तालुक्यातील तामसवाडी व शिरसमणी, बोदवड मधील शेलवड , एरंडोल तालुक्यातील कासोदा व आडगाव, यावल मधील न्हावी, रावेर तालुक्यात चिनावल, मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली, चोपडा तालुक्यात अडावद,यावल तालुक्यात किनगाव, जामनेर तालुक्यात पहूरपेठ, अमळनेरमध्ये मांडळ, रावेर तालुक्यात अहिरेवाडी व निंभोरे , चाळीसगाव मध्ये टाकळी तसेच पाचोरा तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणच्या केंद्रांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला.

            कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

00000000

जिल्ह्यातील अमृत कलक्षांचे वाजत-गाजत जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची उपस्थिती एकत्रित केलेला जिल्ह्यातील एक कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे रवाना होणार

 










        जळगाव,दि. २० ऑक्टोंबर (जिमाका)- जिल्ह्यात 'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, नगरपंचायती यांनी जमा केलेले 'अमृत कलश' आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाजत-गाजत मिरवणूक काढत जमा करण्यात आले. हे सर्व अमृत कलश एकत्र करून जिल्ह्यातील एक कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई व दिल्ली येथे पाठविले जाणार आहेत.

जिल्ह्यातून एकत्रित केलेले अमृत कलक्ष आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या अमृत कलक्षांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त डॉ विद्या गायकवाड, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार यांनी  स्वागत केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ 'मिट्टी को नमन, वीरों का वंदन' या टॅगलाइनसह 'मेरी माटी मेरा देश अभियान' राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र अमृत कलक्ष यात्रा काढण्यात आल्या. ज्या कुटुंबांकडे शेती आहे अशा कुटुंबांतील सदस्यांकडून माती व ज्या कुटुंबांकडे शेती नाही अशा कुटुंबातील सदस्यांकडून एक चिमूटभर तांदूळ मातीच्या कलशात जमा करण्यात आले. तसेच सर्व नगरपरिषद यांनी शिलाफलकम समर्पण - वीरांच्या नामफलकाची स्थापना, पंचप्राण प्रतिज्ञा घेणे, वसुधा वंदन देशी झाडांच्या 75 रोपांसह अमृत वाटिकेची निर्मिती, वीरों का वंदन - देशाचे आणि शूरांच्या कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक / वीरांचा सन्मान राष्ट्रध्वज फडकवणे आणि राष्ट्रगीत गायन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय एक कलश व जळगाव महानगरपालिकेचा एक कलश बनविण्यात आला. बनविण्यात आलेला अमृत कलश मुंबई व दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत अमृत कलश मुंबई येथे २६ ऑक्टोंबर रोजी रवाना होतील तद्नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आझाद मैदान मुंबई येथे २७ ऑक्टोंबर रोजी कार्यक्रम संपन्न होईल. तदनंतर सर्व स्वयंसेवक कलश घेऊन २७ ऑक्टोंबर रोजी विशेष रेल्वेने दिल्ली येथे रवाना होतील. राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिट्टी को नमन, वीरों का वंदन हा सोहळा संपन्न होऊन देशभरातून जमा करण्यात आलेल्या मातीतून राजधानी दिल्ली येथे अमृत वाटिका व वॉर मेमोरिअल तयार करण्यात येणार आहे.

०००००००००००


Thursday, 19 October 2023

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा





             जळगाव,दि.१९ ऑक्टोंबर (जिमाका) - जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत मागील भरपाई देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे बैठकीत दिले.

अल्पबचत भवन येथे कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपसंचालक चंद्रकांत पाटील,आत्माचे कृषी उपसंचालक पांडुरंग साळवे, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कर्ज व अनुदान मिळवून देण्यासाठी बॅंका व शेतकऱ्यांचा संयुक्त मेळावा घेण्यात यावा. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर मेळावा आयोजित करण्यात यावा. या मेळाव्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या लाभार्थ्यांना ही सहभागी करून घेण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात जिल्ह्यात कमीत कमी ५०० लाभार्थ्यांना लाभ पोहचला पाहिजे. कृषी उत्पादनापासून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. पीक उत्पादनाच्या खपासाठी मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात यावा.‌ असे जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी सांगितले . यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तृणधान्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

0000000

Wednesday, 18 October 2023

... अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या ! बाला प्रकल्पात जिल्ह्यातील ३६ जिल्हा परिषद शाळाचं रूप पालटले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ढालगाव शाळेला भेट

 






            जळगाव, दि.१८ ऑक्टोंबर (जिमाका) -  विद्यार्थ्यांना हवेहवेसं वाटणारं...भिंतीवर रंगवलेली फुलं-झाडं  आणि गणितांची कोडी...खिडक्या, दरवाजे, व्हरांडा, जिकडे-पाहावे-तिकडे रंगेबेरंगी चित्रे, तक्ते, सुभाषिते, नकाशे यांची पखरण...विद्यार्थ्यांसोबत बोलणाऱ्या भिंती अन् व्हरांडा हे चित्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये साकार होत आहे.

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी 'बाला' म्हणजेच 'बिल्डिंग एज लर्निंग एड' उपक्रम जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील २७८ शाळांमध्ये बाला प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी ३६ शाळांचे कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जामनेर तालुक्यात ३१ शाळांमध्ये बाला प्रकल्प राबविण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी शाळांमधील कामे पूर्ण झाली असून त्यापैकी ढालगाव प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

या प्रकल्पाअंतर्गत शाळेच्या भिंती, खिडक्या, दरवाजे यांना विविध प्रकारच्या चित्र, गणितांच्या माध्यमांतून बोलके केले जात आहे. शाळांमध्ये दर्शनी भागांत; तसेच भिंतींवर अभ्यासविषयक बाबींचे चित्र लावले जात आहेत. यामुळे मुलांना खेळता-खेळता स्वयंशिक्षण मिळणार आहे. शाळेचा परिसर, वर्गखोली या ठिकाणी अभ्यासक्रमविषयक चित्रांचा समावेश असेल. बोलक्या भिंती आणि बोलका व्हरांडा यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत असताना हसतखेळत अभ्यास होईल.

शाळांमध्ये चित्रांच्या माध्यमातून माहितीपर रंगरंगोटी करण्यात येईल. यात फलक तयार करणे, रंगवणे, संख्यांचे रंगचक्र, व्हरांड्यातील रंगीत बैठकव्यवस्था तयार करणे, वजन मापक, उंची मापक अशी चित्रे काढणे आणि ती रंगवणे, कोनमापक, नकाशा काढणे या बाबी प्राध्यान्यक्रमाने घेण्यात आल्या आहेत.

मुले शिकत असताना सभोवतालच्या वातावरणातून त्याच्यावर नकळत संस्कार होतात. या उप्रकमात शाळेच्या प्रवेशद्वारापासून, पायऱ्या, भिंती, वर्ग खोल्या अशा सर्व ठिकाणी चित्रे काढून पुस्तकातील अभ्यास बोलका करण्यात आला आहे.  इमारतीच्या भिंती, वर्गातील फरशी, खेळण्याची जागा, आजूबाजूला असलेली झाडे त्यावर मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, अंक-अक्षरांसोबत विविधरंगी चित्रांनी सजविण्यात येत आहेत.

बाला प्रकल्पामुळे शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधार होण्यासाठी निश्चीतच मदत होणार आहे. यामुळे आमच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळून स्पर्धेच्या युगात त्यांना विविध संधी उपलब्ध होतील. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या भेटीत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला ही भेट देऊन पाहणी केली. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सर्व मुलांचे लसीकरणाचे नियोजनाची पाहणी केली. पोषण आहाराबाबत सूचना दिल्या.

0000000


जिल्ह्यात २४ गावांत कौशल्य विकास केंद्रे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार ऑनलाईन उद्घाटन

            जळगाव,दि.१८ ऑक्टोंबर (जिमाका) - ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते‌. अशावेळी गावातच रोजगार निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांना स्थानिक पातळीवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्या अंतर्गत महाराष्ट्रात ५०० गावात यामध्ये जळगाव जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन गुरूवारी,१९ ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

            जिल्ह्यात उद्घाटन होत असलेल्या २४ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऑनलाईन ऐकण्याची व्यवस्था राहणार आहे. १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम ऑनलाईन पार‌ पडणार आहे. या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील निमंत्रक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे हे आहेत.‌

०००००००००००००

Tuesday, 17 October 2023

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी २० ऑक्टोंबर महिला तक्रार निवारण समिती स्थापन कराव्यात अन्यथा ५० हजार रूपये दंडाची कार्यवाही ----जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

         जळगाव, दि.१७ ऑक्टोंबर (जिमाका) – कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती)  स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी २० ऑक्टोंबर २०२३ पर्यंत गुगल लिंकद्वारे अहवाल सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तसेच सदर कायद्यानुसार प्रत्येक प्रत्येक शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांच्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी आस्थापनेवर असल्यास आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणेबाबत कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. तसेच जी कार्यालये / आस्थापना यांचेकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्यात आली नसेल अशी कार्यालये / आस्थापना प्रमुखांवर रक्कम रु.५०,०००/- दंड वसुलीची कार्यवाही करणेबाबत संदर्भिय कायद्याचे कलम २६ (१) यामध्ये नमुद करण्यात आलेले आहे.

सदर कायदयांन्वये समिती स्थापन केल्याबाबतचा अहवाल दरवर्षी शासनास सादर करावा लागतो. परंतू बऱ्याच कार्यालयानमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित केलेल्या नाहीत. त्यानुषंगाने जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून https://forms.gle/XtQb3eoFmRA3ENny5  गुगल लिंक तयार करण्यात आलेली असून या गुगल लिंकवर कार्यालयाने माहिती भरावी तसेच सदरची गुगल लिंक आपले अधिनस्त असलेल्या व आपले स्तरावरून मान्यता दिलेल्या शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी आस्थापना/ कंपनी उद्योग/व्यायसायीका शाळा/ महाविदयालय कोचिंग क्लासेस इत्यादी सर्व कार्यालयामध्ये पाठविण्यात यावी. व त्यांना गुगल लिंकवर २० ऑक्टोंबर पर्यंत माहिती भरण्याबाबत कळविण्यात यावे.

ज्या कार्यालय प्रमुखांकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नसेल त्यांना रक्कम रु.५०,०००/- कायद्याचे कलम २६ (१) नुसार दंड आकारण्याच्या कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. तसेच ज्या आस्थापना प्रमुखांच्या अधिनस्त कार्यालयांनी गुगल लिंक भलेलेली नसेल त्या आस्थापना प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून खुलासा सादर करावा लागेल. ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवरिल कर्मचारी यांची संख्या १० पेक्षा कमी असेल त्यांनीही गुगुल लिंक भरावी. व १० पेक्षा कमी कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र गुगल फॉमच्या शेवटच्या मुददयामध्ये अपलोड करण्यात यावेत, ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्मचारी यांची संख्या १० किंवा १० पेक्षा अधिक असेल त्यांनी समिती गठीत केल्याच्या आदेशाची प्रत सदरच्या मुददयामध्ये अपलोड करावी. अशा सूचना ही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी दिल्या आहेत.   

00000

Friday, 13 October 2023

'१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण ! १०८ सेवा अधिक जलद व तत्पर करावी, मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

             जळगाव,दि.१३ ऑक्टोंबर (जिमाका) -  रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील  २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५१ हजार ५०३ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून १ हजार १९८ बाळांचा जन्म रूग्णवाहिकेत झाला आहे.

            जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी '१०८' या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी‌. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर '१०८' रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.

            कोरोना काळात देखील '१०८' रूग्णवाहिकेने मोलाची भूमिका निभावली असून या रूग्णवाहिकेमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशिन, ऑक्सिजन सिलेंडर व सोबत डॉक्टर उपलब्ध राहत असल्यामुळे आरोग्य विभागावरील बराच ताण कमी झाला आहे. राज्यात २०१४ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत ९१ लाख २१ हजार ९७४ रुग्णांना १०८ रूग्णवाहिकेमुळे जीवदान मिळाले आहे.

कोविड काळातही महत्त्वाची भूमिका

            कोरोना काळात ३५ रुग्णवाहिकांनी १५ हजार ७९३ कोविडच्या रुग्णांना सेवा दिली असून १ लाख १६ हजार ९१६ नॉन कोविड रुग्णांसाठी मार्च २०२० ते  सप्टेंबर २०२३ दरम्यान सेवा बजावली आहे. तसेच विविध आजारांच्या ६४ हजार ४५८ रुग्णांना रूग्णवाहिकेने सेवा दिली आहे.

रूग्णांना मिळाली संजीवनी

            जळगाव जिल्ह्यात २०१४ पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त २० हजार ६२५ रूग्ण तसेच हाणामारीचे ४ हजार ४१५ रुग्णांना तर, १ हजार ४५ जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे १ हजार ५५८ रुग्ण, उंचावरून पडणे ४ हजार ५२८ रुग्ण, विषबाधा झालेले १२ हजार ६४६ रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या ३२५ रुग्णांना, ७९५ मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३३१ रूग्णांना सेवा मिळाली आहे.

            वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने '१०८' रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी '१०८' रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते ?

            राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

०००००

Tuesday, 10 October 2023

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


        जळगाव,दि.१० ऑक्टोंबर (जिमाका) - तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४३७ प्रकरणात २ लाख ८२ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  तंबाखू मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे .

            जिल्हा तंबाखू नियंत्रण व मौखिक आरोग्य समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर, अनिल गुंजे तसेच पोलीस ,आरोग्य, अन्न व औषध विभाग शिक्षण व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत विविध विभागांना सूचना दिल्या यामध्ये पोलीस, आरोग्य, अन्न औषध व शिक्षण विभागाने कोटपा- २००३ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कलम ५ व कलम ७ अंतर्गत मासिक किमान १० कारवाई करण्यात याव्यात. शाळेच्या १०० यार्ड परिसरात असणाऱ्या पान टपरी, तंबाखू तथा तंबाखू विक्री केंद्रावर करवाई करून त्यांना तिथून हटविण्यात यावे. जीएसटी विभागामार्फत तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीचा मासिक अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा.

तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे नशामुक्तीसाठी समुपदेशन करण्यात यावे. त्याचप्रमाणे तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची नोंदणी वाढविण्यात यावी. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथील दैनंदिन तसेच मासिक रुग्णसंख्या वाढवावी व जास्तीत जास्त उपचार देण्यात यावेत. मौखिक आरोग्य तसेच मुख कर्करोग प्रतिबंध विषयावर जनजागृतीपर संदेश तयार करून सोशल मिडिया द्वारे प्रसारित करण्यात यावेत. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील नागरिकांनी तंबाखूचे सेवन थांबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. जिल्हा प्रशासन जनजागृती उपक्रम राबवित आहे. पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलीस दलाद्वारे आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा तंबाखूमुक्तीसाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

०००००००००००

उद्योजकांसाठी १३ ऑक्टोंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा

          जळगाव,दि.१० ऑक्टोंबर (जिमाका) - एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत हॉटेल प्रेसिडेंड कॉटेज, एमआयडीसी, जळगांव येथे १३ ऑक्टोंबर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती  जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

या कार्यशाळेत विविध विषयावर तज्ज्ञ एमएसएमईबाबत मार्गदर्शन करणार आहेत. एकदिवशीय कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघू, मध्यम उपक्रम, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इ. यांनी कार्यशाळेत भाग घ्यावा असे आवाहन ही श्री. पाटील यांनी केले आहे. 

                                                           ००००००००००

१६ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

             जळगाव, दि. १० ऑक्टोंबर (जिमाका) – जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.असे श्रीमती सोनगत यांनी सांगितले.

००००००००

१२ ऑक्टोंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

        जळगाव, दि. १० ऑक्टोंबर (जिमाका)-  पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

       या अदालतीत टपाल वस्तू, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत ‘अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव ४२५००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह ९ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल, परंतु त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. असेही अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                  00000

उद्यापासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम निपूण भारत अभियानांतर्गत उपक्रमाचे आयोजन

         जळगाव,दि.10 ऑक्टोंबर (जिमाका)- निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात उद्यापासून १० ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर पर्यंत इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वीच्या मुलांसाठी 'दहा दिवस गणितासाठी' उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनांनुसार निपूण भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन 2025 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कौशल्यात वृध्दी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांचे निर्देश आहेत. विद्यार्थ्यांचे क्षमतावृध्दीसाठी सर्व शिक्षकांनी सामूहिक प्रय्तन करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले आहे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी हा कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील यांनी आराखडा तयार करुन अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भिती दूर करणे, गणिताचे कौशल्यात सुधार करण्यासाठी विशेष आराखडा तयार करणेत आला असून त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गणित विषयाच्या नियमित पाठ्यक्रमाचे लवकर आकलन करण्यात यामुळे विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी काम करणार आहेत.

दहा दिवस गणितासाठी या उपक्रमात गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, सराव तसेच कृती या पध्दतीचा वापर करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याचा वापर करून गणित रंजक पद्धतीने शिकविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांना त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन पूरक अधिकच्या कृतींचे आयोजन करता येण्याची मुभा आहे.

या उपक्रमात आनंददायी कृतींचा, गणितीय खेळांचा, परिसरात व शाळेत उपलब्ध साहित्याचा यथायोग्य वापर करून गणितीय संकल्पनांचे विद्यार्थ्यांना आकलन होईल. अशा कृती कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होईल. पायाभूत क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार उच्चस्तर अध्ययन कृती घेण्याच्यासूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

 

या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व डायट मधील सर्व अधिकाऱ्यांनी दैनंदिन किमान शाळांना भेटी कराव्यात व सदर उपक्रम सुरू असल्याची खात्री करावी. अशा सूचना देण्यात आल्या आहेत‌. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी सांगितले.

00000000000

जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद एच.आय.व्ही चाचणीचे सहा महिन्यातच ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण






           जळगाव,दि.9 ऑक्टोंबर (जिमाका) - जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी एचआयव्ही बाबत जाणीव-जागृतीची मोहीम राबविण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,  डॉ. आकाश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भोयेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय गायकवाड, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, माहिती अधिकारी सुरेश पाटील, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागांतर्गत वेगवेगळ्या विविध गटांमध्ये कार्यरत सामाजिक संस्थाचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एच.आय.व्ही चाचणीचे सहा महिन्यातच ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण आहे ही चांगली बाब आहे. शब्दात या कार्यक्रमातील जिल्ह्यातील प्रगतीचे कौतुक करत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, एच.आय.व्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांना व अति जोखीम गटातील लोकांना रेशन कार्ड, धान्य पुरवठा व इतर शासकीय योजना देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी प्रयोगशाळा / रुग्णालये यांनी जिल्हा एड्स नियंत्रण विभागास एच.आय.व्ही संसर्गचा अहवाल दर महिन्याला सादर करावा.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री पहूरकर म्हणाले, तालुका स्तरावर एच.आय.व्ही संसर्गितांची नियमित मॅपिंग करण्यात येत आहे. एच.आय.व्ही संसर्गित बालकासाठी प्रोटीन पावडर उप्लब्धतेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ( https://www.facebook.com/dapcu.jalgaon/) एच.आय.व्ही / एड्स विषयी प्रसिद्धी करण्यात आली आहे.

एच.आय.व्ही एड्स टोल फ्री क्रमांक '१०९७'

यावेळी एचआयव्ही एड्स बाबत माहिती, शंका तसेच तपासणी बाबत माहिती जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतो. एच.आय.व्ही एड्स टोल फ्री क्रमांक १०९७ व  एच.आय.व्ही तसेच एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, एच.आय.व्ही एड्स QR कोड बोर्ड व हेल्पलाईनचे प्रकाशन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते झाले.

जिल्ह्यात ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह

जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३-२४ अशा एकूण अठरा महिन्यात ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती ४१५ व गरोदर माता ३१ असे एकूण ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासाठी सर्वसाधारण २८५२६१ व्यक्तींच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या तर गरोदर माता १४१२२६ जणांच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती श्री. पहूरकर यांनी बैठकीत सादर केली.

०००००००००००००

जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

एच.आय.व्ही चाचणीचे सहा महिन्यातच ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

          जळगाव,दि.9 ऑक्टोंबर (जिमाका) - जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी एचआयव्ही बाबत जाणीव-जागृतीची मोहीम राबविण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,  डॉ. आकाश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भोयेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय गायकवाड, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, माहिती अधिकारी सुरेश पाटील, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागांतर्गत वेगवेगळ्या विविध गटांमध्ये कार्यरत सामाजिक संस्थाचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एच.आय.व्ही चाचणीचे सहा महिन्यातच ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण आहे ही चांगली बाब आहे. शब्दात या कार्यक्रमातील जिल्ह्यातील प्रगतीचे कौतुक करत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, एच.आय.व्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांना व अति जोखीम गटातील लोकांना रेशन कार्ड, धान्य पुरवठा व इतर शासकीय योजना देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी प्रयोगशाळा / रुग्णालये यांनी जिल्हा एड्स नियंत्रण विभागास एच.आय.व्ही संसर्गचा अहवाल दर महिन्याला सादर करावा.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री पहूरकर म्हणाले, तालुका स्तरावर एच.आय.व्ही संसर्गितांची नियमित मॅपिंग करण्यात येत आहे. एच.आय.व्ही संसर्गित बालकासाठी प्रोटीन पावडर उप्लब्धतेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ( https://www.facebook.com/dapcu.jalgaon/) एच.आय.व्ही / एड्स विषयी प्रसिद्धी करण्यात आली आहे.

एच.आय.व्ही एड्स टोल फ्री क्रमांक '१०९७'

यावेळी एचआयव्ही एड्स बाबत माहिती, शंका तसेच तपासणी बाबत माहिती जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतो. एच.आय.व्ही एड्स टोल फ्री क्रमांक १०९७ व  एच.आय.व्ही तसेच एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, एच.आय.व्ही एड्स QR कोड बोर्ड व हेल्पलाईनचे प्रकाशन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते झाले.

जिल्ह्यात ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह

जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३-२४ अशा एकूण अठरा महिन्यात ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती ४१५ व गरोदर माता ३१ असे एकूण ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासाठी सर्वसाधारण २८५२६१ व्यक्तींच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या तर गरोदर माता १४१२२६ जणांच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती श्री. पहूरकर यांनी बैठकीत सादर केली.

०००००००००००००