जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या वतीने संचालित सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक २३ जून २०२५ पासून सुरू होत आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील जवळील तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्हा माहिती कार्यालय,जळगांव
Friday, 20 June 2025
सैनिकी वसतिगृहात प्रवेशासाठी २३ जूनपासून प्रक्रिया सुरू; युद्धविधवा व माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत प्रवेशाची सुविधा
या
वसतिगृहात युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा तसेच सैनिकांच्या अनाथ पाल्यांसाठी प्रवेश
पूर्णपणे मोफत असून, अन्य आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात
येणार आहे. तसेच अतिरिक्त जागा उपलब्ध असल्यास इतर नागरी विद्यार्थ्यांनाही प्रवेश
देण्यात येणार आहे.
जेवण
व निवासाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, शारीरिक प्रशिक्षण, गरम पाण्यासाठी
सोलर सिस्टीम, उत्कृष्ट खेळाचे मैदान, सांस्कृतिक कार्यक्रम व सण-उत्सवांचे आयोजन तसेच
वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अशी विविध सोयी वसतिगृहात उपलब्ध
आहेत.
दरपत्रक (प्रति महिना) –
अधिकारी व ऑननरी रँक : ₹ ३,०००
जे.सी.ओ. : ₹ २,८००
शिपाई / एनसीओ : ₹ २,५००
युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व अनाथ पाल्य : मोफत
इतर नागरी विद्यार्थी : ₹ ३,५०० (भोजन, निवास व सेवा करासह)
वसतिगृह
प्रवेश अर्ज सैनिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी
लवकरात लवकर संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करावेत. प्रवेशासाठी "प्रथम अर्ज, प्रथम
प्राधान्य" हे धोरण अवलंबले जाणार असल्याने इच्छुकांनी विलंब न करता अर्ज करावेत,
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी
केले आहे.
अधिक माहितीसाठी संजय रा. गायकवाड – मो.
८४५९६ ८७३८८ / दूरध्वनी ०२५७-२२४१४१४, समाधान धनगर – मो. ७३७८९ ४२३२७ / दूरध्वनी ०२५७-२२३३०८८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000000000000
आग्रहाचे निमंत्रण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळ – रेल्वे मैदान | शनिवार, २१ जून २०२५ | सकाळी ६ .०० वा.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळ येथील रेल्वे मैदानावर दहा हजार लोकांच्या सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी माननीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या विशेष प्रसंगी सर्व दैनिकांचे मा. संपादक, उपसंपादक, बातमीदार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मन:पूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे.
आपली उपस्थिती आम्हाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
आपण शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजता रेल्वे मैदान, भुसावळ येथे उपस्थित राहावे, ही विनंती.
आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत!
– जिल्हा प्रशासन, जळगाव
000000000000
शनिवार २१ जून रोजी दहा हजार नागरिकांच्या सहभागाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन भुसावळ येथे साजरा होणार ▪️ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय योग दिनाचा यंदा ११ वा वर्धापनदिन आहे. "एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग" या संकल्पनेनुसार, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता रेल्वे क्रीडांगण, भुसावळ रेल्वे स्थानकासमोर, येथे भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमात केंद्र शासन निर्देशित कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास होणार आहे.
कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे , जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सर्व शासकीय विभागांतील वर्ग १ व वर्ग २ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १०,००० नागरिकांच्या सहभागाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपस्थित राहणाऱ्यांचे वय किमान १० वर्षे व कमाल ६० वर्षे वयोगटातील असावे. योगाभ्यासासाठी सैल, आरामदायक पोशाख परिधान करावा आणि स्वतःची योगा मॅट किंवा चटई सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची आणि प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
योग ही प्राचीन भारतीय परंपरेची देणगी असून, सर्वांनी मिळून या उपक्रमात सहभाग घ्यावा व जनसामान्यांमध्ये योगाचे महत्त्व पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000000000
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ▪ आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प – पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
धरणगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा):
- धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा
रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या
कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी
रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन
करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे
पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती
रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री श्री.गिरीश
महाजन, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आ. श्री.सुरेश भोळे, आ. श्री मंगेश चव्हाण, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी
आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत
यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख
७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २.५ एकर क्षेत्रात या उपजिल्हा
रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य
सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह
शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहेत.
या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि
आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह,
शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र
तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंध केंद्र अशा
सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
“धरणगाव हे
ऐतिहासिक शहर असून, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या शेजारी ही सुविधा उभारली जात
आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा
क्षण आहे. एकही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी ही सुविधा उपयुक्त
ठरणार आहे,”
असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री,
दोन्ही उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभाराची प्रतिक्रिया दिली.
नवीन पोलीस
ठाण्यांची मागणी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री
गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्र
आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत म्हसावद दूरक्षेत्र यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा
दर्जा देण्याची मागणी केली. तसेच धरणगाव येथील जुने पोलिस ठाणे आवार हे जीर्ण झाल्याने
त्याठिकाणी ५० शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी अंदाजे १५ कोटी रुपये निधी मंजूर
करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
000000000000
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन_ ▪ स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार ‘ धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ▪ गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन
जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) :- ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी
नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि
लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री
फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री
बोलत होते.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई
खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव
पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार
स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण,पद्मश्री चैत्राम पवार, अनिल भालेराव,
शरदराव ढोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी
उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, क्रांतिकारी खाज्याजी
नाईक स्मृतीस्मारक अत्यंत सुंदर झाले आहे. राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, सिद्धू-कान्हू,
तंट्या मामा, झलकारी बाई, राघोजी भांगरे, भिमा नाईक, रुमाल्या नाईक, राणा पुंजा भिल,
यांच्यासारख्या अनेक नायकांचे दर्शन या स्मारकात घडते. हे स्मारक केवळ ऐतिहासिक नाही,
तर येथे आश्रमशाळा असून अस्मिता जागवण्याचे कार्यही केले जाते. भविष्यात येथे महिलांसाठी
कौशल्य विकास व फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. संस्कृती संवर्धनाचाही उपक्रम
येथे राबविण्यात येईल.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा लढा सुरू केला आणि त्यानंतर जनजाती समाजातील अनेक
नायकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. परंतु त्यांचा इतिहास दुर्लक्षित राहिला. स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अशा नायकांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
होत आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे श्री. फडणवीस म्हणाले.
खाज्याजी नाईक यांनी १८५७ च्या समरात भिल्ल
जमातीचे ३० हजार लढवय्ये उभे करून महाराष्ट्र व मध्यप्रदेशात मोठा लढा दिला. त्यांच्या
लढ्यामुळे इंग्रजांची सत्ता हादरली. इंग्लंडहून त्यांना ठार करण्याचे आदेश आले. त्यांच्यावर
त्या काळी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून शस्त्र
खरेदी केली. ‘जिथे अन्याय, तिथे खाज्याजी नाईक’ हे समीकरण बनले होते. अंबापाणीच्या
लढाईत महिलांनीही शौर्य दाखवले. खाज्याजी नाईक अधिक काळ जगले असते तर कदाचित इंग्रजांना
भारत सोडावा लागला असता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने
सुरू झालेल्या 'धरती आबा' योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या
योजनांची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र शासनाने यासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले
असून, पुढील ५ वर्षांत एकही आदिवासी बांधव बेघर राहणार नाही. त्यांना शिक्षण, आरोग्य,
पोषण, रोजगार व रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल," अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी
दिली.
गोर बंजारा समाजाने देशभरात बावड्या, तलाव
व पाणवठे उभारून समाजसेवा केली आहे. अशा समाजाच्या प्रेरणास्थळी गोद्री येथे सरकारकडून
सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल," असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
कार्यक्रमात
शरदराव ढोले, अनिल भालेराव, पद्मश्री पवार
यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीस्मारक समितीचे
सचिव विलास महाजन यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.
मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस यांना गोद्री येथील प्रसंगांवर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.
खाज्याजी नाईक
स्मृतीस्थळाचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाची कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर
सर्व मान्यवरांनी स्मृतीस्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाज्याजी
नाईक यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन केले.
---
Thursday, 19 June 2025
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि-19 (जिमका):- राज्याचे आदिवासी विकास, मंत्री डॉ. अशोक उईके यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे,
गुरुवार,
दिनांक 19 जून, 2025 रोजी सायंकाळी 06.15 वाज ता राळेगाव येथुन यवतमाळ मार्गे
कारंजा मुर्तीजापूर अकोला खामगाव मलकापुर भुसावळ मार्गे जळगावकडे प्रयाण. रात्री
12.15 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव.
शुक्रवार, दिनांक 20 जून, 2025 रोजी
सकाळी 09.30 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथुन धरणगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता धरणगाव येथे क्रांतीकारी
खाज्याजी नाईक यांचे भव्य स्मारक उदघाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 02.30 वाजता
जळगाव वरुन भुसावळ मलकापुर खामगाव अकोला कारंजा यवतमाळ राळेगा वडकी वणी वरोरा
भद्रावती मार्गे चंद्रपुरकडे प्रयाण.
०००००००००००
वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि - 19 ( जिमाका ) : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे,
शुक्रवार दिनांक 20 जून, 2025 रोजी रात्री 12.10
वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेने भुसावळकडे प्रयाण. सकाळी 06.45
वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे रवाना. सकाळी 07.15 वाजता
भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.
००००००००००००