जळगाव, (जिमाका) दि. 5 – राज्यातील खरीप हंगाम २०२४ मधील ११ पिकांच्या स्पर्धासाठी प्रयोगशील शेतक-यांकडुन प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
मुग व उडीद पिकांसाठो ३१ जुलै पर्यंत तसेच ज्वारी, बाजरी,
मका नाचणी (रागी) तुर सोयाबिन भुईमुग व सुर्यफुलासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता
येतील प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी ३०० रूपये व
आदिवासी गटासाठी १५० रूपये आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतक-याकडे स्वतः कसत
असणे आवश्यक आहे कोणत्याही शेतक- याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी
स्पर्धेत सहभाग घेता येईल असे कृषि आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
स्पर्धक शेतक-याकडे भात पिकासाठी किमान २० आर जमिनीत व इतर
पिकांच्या बाबतीत किमान ४० आर म्हणजेच किमान एक एकर क्षेत्रात सलग लागवड असणे
आवश्यक आहे. पीकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. सर्वसाधारण व
आदिवासी गटासाठी तालुकास्तरीय पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली
उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील सपर्धेसाठी विजेत्या
शेतक- यांची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेत असलेल्या शेतक-याला अर्ज (प्रपत्र-अ) सोबत
प्रवेश शुल्क भरल्याचे चलन सातबारा व आठ अ उतारा आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र
जोडावे लागेल तसेच पीकस्पर्धेसाठी शेतक-याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या
क्षेत्राचा चिल्हांकित नकाशा बँक खात्याचे पासबुक किवा चेकच्या पहिल्या पानाची छायांकित
प्रतदेखील जोडावी लागेल
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे भाग
घेण्यासाठी व अधिकच्या माहिती साठी संबधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक,
मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कृरबान तडवी
यांनी केले आहे.
००००००००
No comments:
Post a Comment