Thursday, 16 May 2019

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसण करण्यासाठी समिती गठीत


             जळगाव, दि. 16:-   प्रधानमंत्री पीक विमा योजना व हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2018-19 मध्ये खरिप व रब्बी हंगामात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये तक्रारींचे निरसण करण्यासाठी उपविभाग स्तरावर  समिती स्थापन करण्यात आली आहे.
            या समितीचे उपविभागीय कृषी अधिकारी हे अध्यक्ष आहेत तर संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, कृषि विद्यापीठाचे प्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी हे सदस्य आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी हे सदस्य सचिव  आहेत.  
            या योजने अंतर्गत जास्तीत जास्त शेतक-यांच्या तक्रारीचे निरसण होण्यासाठी वरीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी प्रथम उपविभागीय समितीकडे सादर कराव्यात, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
०००

No comments:

Post a Comment