जळगाव, (जिमाका) दि. 8 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 22 डिसेंबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
Tuesday, 8 December 2020
जिल्ह्यात 22 डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जारी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment