Tuesday, 7 December 2021

धर्मादाय कार्यालयातर्फे 13 पासून विशेष मोहीम

                 जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) :-  महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियानुसार प्रलंबित बिनविरोध बदल अर्ज प्रकरणांचा जलदगतीने  निपटारा होण्यासाठी जिल्ह्यात 13 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त ग.श्री. जोशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

                धर्मादाय कार्यालयाकडे शाळा, मंदिर, न्यास, वाचनालय, व्यायामशाळा अशा विविध प्रकारच्या संस्थेची नोंदणी करण्यात येते. यासंस्थामध्ये विश्वस्त मंडळात बदल झाल्यानंतर बदल अर्ज सादर करुन मान्यता घ्यावी लागते. मात्र, अनेक प्रकरणे अवादांकित असतानाही प्रलंबित राहत असल्याने त्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या प्रकरणात संबंधित पक्षकार अथवा विधीज्ञ यांनी बदल अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी विशेष मोहिमेअंतर्गत समक्ष उपस्थित राहून त्यांच्या बदल अर्जाचा निपटारा करावा.

00000                  

No comments:

Post a Comment