जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय विभाग व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. कोविड- १९ च्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात राज्यातील शैक्षणिक प्रत्यक्ष बंद असल्या, तरी या कालावधीत ऑनलाइन प्रणालीव्दारे शिक्षण सुरू असल्याने या दोन वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत शासनाने २२ डिसेंबर, २०२१ रोजीच्या पत्रानुसार मान्यता दिलेली आहे. सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या पात्र विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या कार्यालयात सादर करावेत. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढी बाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. दिलेल्या विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment