Monday, 31 October 2022

 


राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले अवघे जळगावकर

 

       जळगाव, दि.31 (जिमाका वृत्तसेवा) :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हा क्रीडा संकुल पासून ते नंदिनीबाई मुलीच्या शाळेजवळून व कोर्डापासून ते बस स्टॅड पर्यंत व शिवाजी चौक येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीत शहरातील खेळाडू, विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी,  अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

            जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. महानगरपालिकचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महापौर श्रीमती जयश्री महाजन,  जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार,  जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत,  एकता दौडच्या सुरूवातीस योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली.  सदर एकता दौड मध्ये जि.प. महानगरपालीका जळगांव महसूल, पोलीस तसेच इतर शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पोलीस भरती प्रशिक्षणार्थी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू खेलो इंडीया बॉक्सींग केंद्रातील खेळाडू, नागरीक यांनी उत्फुर्तपणे भाग घेवून एकता दौड यशस्वी केली.

          सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रोडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकता दौडचे यशस्वी आयोजन करण्यात आले.  असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 

०००००






 

स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल

यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

            जळगाव, दि.३१ (जिमाका वृत्तसेवा) :-  भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने या नेत्यांना जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांनी दोघांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

        याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी  उपजिल्हाधिकारी राहुल पाटील,  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

          याप्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षेची शपथ दिली.

०००



Friday, 21 October 2022

जळगाव शहरातील परवानाधारक ऑटोरिक्षांना वाहनांच्या तपशिलाबाबतचे स्टीकर चिटकविणे हा उपक्रम १९ ऑक्टोंबर रोजी संपन्न

           जळगाव, दि.२१ (जिमाका वृत्तसेवा) :- पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथील मंगलम सभागृह, जळगाव येथे स्टिकर चिकटविणे हा उपक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमांस    मा. पोलीस अधीक्षक, डॉ. प्रविणजी मुंढे, जळगाव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,  श्याम लोही, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, मे. पद्मसिद्धी ऑटो संचालक, संजय खैरनार, एकता रिक्षा युनियन अध्यक्ष रज्जाक खान गनी खान व पदाधिकारी, वीर सावरकर चे अध्यक्ष दिलीप सपकाळे व पदाधिकारी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहा. मोटार वाहन निरीक्षक, विशाल बटुळे, व सहकारी, कर्मचारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील सहा. मोटार वाहन निरीक्षक, ऋषिकेश महाले, मोरेश्वर साखरे, निलेश झाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन        उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपीक, श्रीमती. सुनिता मराठे यांनी केले.

           सदर कार्यक्रमात सुमारे २५० ते ३०० परवानाधारक ऑटोरिक्षा चालक / मालक यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही यांनी परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना ऑटोरिक्षा चालविण्याच्या नियमांचे पालन करणेबाबत मार्गदर्शन व प्रबोधन केले. तसेच जळगाव शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच मदतीसाठी सर्व ऑटोरिक्षांच्या प्रथमदर्शनी भागात ऑटोरिक्षा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक, परवानाधारकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, परिवहन विभाग, पोलीस विभाग तसेच निर्भया पथकाचा हेल्पलाईन क्रमांक नमूद केलेले स्टिकर एकूण ३०० परवानाधारक ऑटोरिक्षांना चिकटविण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही व प्रवाशांना सहजरित्या आपण प्रवास करत असलेल्या वाहनांबाबत संपूर्ण माहिती समजू शकेल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांचे आवाहन

                         जळगाव, दि.२१ (जिमाका वृत्तसेवा) :- - प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2022- 23 या वर्षाकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी आंबिया बहाराकरीता केळी, मोसंबी, पपई, आंबा व डाळिंब या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन अधिसुचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

            जळगाव जिल्ह्यात या योजनेव्दारे आंबिया बहार फळ पीकनिहाय केळी या पिकासाठी कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, मोसंबी या फळपिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट, पपई फळपिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता गारपीट, आंबा फळ पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, तर डाळिंब या फळ पिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे.

            ही योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसूचित फळ पिकांपैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज ( उदा. मोसंबी व डाळिंब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकाकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत संबधित बँकेस त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल. या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

            आंबिया बहार 2022-23 करीता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभागाचे वेळापत्रक, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत अशी :             केळी - विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,40,000/- गारपीट -46,667/-, विमा हप्ता रक्कम – 10500/- 2333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, मोसंबी - विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 80,000/- गारपीट -26,667/-, विमा हप्ता रक्कम – 4000/- 1333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, पपई  -विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 35,000/- गारपीट -11,667/-, विमा हप्ता रक्कम – 1750/- 583/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, आंबा  -विमा संरक्षित रक्कम /हेक्टर - 1,40,000/- गारपीट -46,667/-, विमा हप्ता रक्कम – 23800/- 2333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, डाळिंब- विमा संरक्षित रक्कम /हेक्टर - 1,30,000/- गारपीट -43333/-, विमा हप्ता रक्कम – 28600/- 2167/- अंतिम मुदत 14 जानेवारी, 2023 पर्यंत आहे.

            जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहाराकरीता अधिसूचित फळपिकांना राबविण्यात येत आहे. फळ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी केले आहे.

            अधिक माहितीसाठी नजीकच्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषी अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई, क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई – 400023, टोल फ्री नंबर-1800 419 5004, ई – मेल pikvima@aicofindia.com. जिल्हा प्रतिनिधी, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्र. 9595554473 यांच्याशी संपर्क साधावा. टिप – सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईडवर www.maharastra.gov.in  वर उपलब्ध आहे.

00000

Thursday, 20 October 2022

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतक-यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या बाबी अंतर्गत पिक विमा कंपनीस सूचना (intimation) देणेबाबत

        जळगाव, दि.२० (जिमाका वृत्तसेवा) :- राज्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे.        प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. तर त्या बाबतीमध्ये सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले याबाबतची

सूचना आपल्या संबंधित विमा कंपनी यांना देण्याकरता पुढील पर्यायांचा वापर करता येतो.

1) क्रॉप इन्शुरन्स ॲप  2) विमा कंपनी टोल फ्री क्रमांक 3) विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय  4) कृषि विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय  5) ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टलवर सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे पीक नुकसानीच्या सूचना देण्यासाठी  सध्या अडचणी येत असल्याने ऑफलाइन पद्धतीने कंपन्यांना पिक नुकसानीच्या सुचना (Intimation) देण्यासाठी सर्व कंपन्यांमार्फत सूचना अर्ज छापील प्रती  कंपन्यांमार्फत क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर अर्जाव्दारे कंपनीकडे व  क्षेत्रीय कृषि कार्यालये यांचेकडे शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत.

          कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या विमा काढलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत संबंधित विमा कंपनीला ऑफलाइन पद्धतीने सूचना (Intimation) देण्याबाबत कृषि विभागामार्फत अवाहन करण्यात येत आहे. असे आवाहन कृषी  उपसंचालक आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे अरुण कांबळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

दुचाकी वाहनांसाठी 27 ऑक्टोंबरपासून नवीन क्रमांकाच्या मालिकेस प्रारंभ

             जळगाव, दि.२० (जिमाका वृत्तसेवा) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांच्या नवीन मालिकेस 27 ऑक्टोंबर, 2022 पासून सुरूवात होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी  उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 21 व 25 ऑक्टोंबर, 2022 या दोन दिवसात दुपारी 3.00 वाजेपर्यंत सादर करावी.

          पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत वाहनधारकांनी शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे तसेच ओळखपत्र कार्यालयात सादर करावे. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 25 ऑक्टोंबर, 2022 रोजी दुपारी  3.00 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. 27 ऑक्टोंबर, 2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजता लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील याची सर्व संबंधित वाहनधारकांना नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

Tuesday, 18 October 2022

सामाजिक न्याय विभाग स्थापना दिन कार्यक्रम संपन्न

        जळगाव, दि.१८ (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून १५ ऑक्टोंबर, १९३२ रोजी करण्यात आली होती. सदर विभागास १५ ऑक्टोंबर, २०२२ रोजी ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जळगाव यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांच्या हस्ते कु. अभिषेक दिपक चौधरी, कु.निकीता दत्तात्रय सोनवणे, कु.जतीन संजय तायडे, कु.जयेश संजय कोळी  या विदयार्थ्यांना ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

          सदर कार्यक्रमास सहाय्य्क आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव या कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. असे सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बी.यु.खरे जळगाव यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००००

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

         जळगाव, दि.१८ (जिमाका वृत्तसेवा) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने 12 नोव्हेंबर, 2022  रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली आहे.

          वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळणे. आपआपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात 12 नोव्हेंबर, 2022 रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव श्री. एम आर देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालत होणार आहे. या लोकअदालतीसाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे.

          यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटलांचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय येथील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.

          या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर खटले ठेवण्यात आले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोक अदालतीध्ये राष्ट्रीयकृत बॅका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यामध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दूरध्वनी कार्यालय यांनी थकीत रक्कमेमध्ये सुट देण्याबबात प्रस्तावित केलेले आहे. याचा नागरीकांनी लाभ घ्यावा.

          ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायची असतील. अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावेत. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनी सुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त खटले या राष्ट्रीय लोक अदालतीत सामोपचाराने निकाली काढावेत. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  

०००

 


 

Monday, 17 October 2022

पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 14 ऑक्टोंबर रोजी संपन्न

        जळगाव, दि.१७ (जिमाका वृत्तसेवा) :-   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव  दिनांक 14 ऑक्टोंबर, 2022 रोजी औदयोगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी. टाय) मेस हॉल, नॅशनल हायवे नं.6 जळगांव  येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

          या मेळाव्यासाठी एकूण 19 औदयोगिक/खाजगी आस्थापनांनी 10 वी पास/ 12 वी पास, आय टि आय, डिप्लोमा धारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक  उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. मेळाव्याचा एकूण 517 उमेदवारांनी लाभ घेतला व विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिल्या त्यापैकी एकूण 121 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली असून अंतिम निवडीची  कार्यवाही सुरु आहे..

          मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा. उप-प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थित उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विभागाच्या रोजगार कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून आयोजित केलेल्या मेळाव्याचा समारोप करण्यांत आला असे सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, जळगाव श्री. वि.जा. मुकणे, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Friday, 14 October 2022

पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधीला 'स्वच्छ भारत 2.0 अभियानाचे उदघाट्न स्वच्छ भारत अभियान 2.0 यशस्वीतेसाठी लोकसहभाग आवश्यक - पालकमंत्री गुलाबराव पाटील

 



जळगाव दि 14 (जिमाका) :- 'स्वच्छ भारत अभियान 2. 0'  हे  अभियान विविध उपक्रमाद्वारे राबवले जात आहे. हे अभियान सवयीचा भाग होण्याची गरज  असून  गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो,  असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.  पाळधी येथे जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान 2. 0 च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते, कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे होते.

जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियान 2.0 चे पोस्टर लॉन्च करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मार्केट परिसरात स्वच्छता करण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील , जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कचरा कुंडीचे  लोकार्पण करण्यात आले.

पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,  स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 या महाभियानात , 200 गावात स्वच्छ भारत ही मोहीम राबवली जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक प्रतिबंध करावा तसेच 'गाव स्वच्छ तर जिल्हा स्वच्छ आणि जिल्हा स्वच्छ तर देश स्वच्छ' असा संदेश त्यांनी दिला. सार्वजनिक स्वच्छ्ता ही लोकांच्या सहभागातून घडणारी क्रांती आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून स्वच्छ्ता पाळावी गाव तसेच राज्य समृद्ध होईल असा संदेश . गुलाबराव पाटील पाटील यांनी दिला.

नेहरु युवा केंद्र जळगाव जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छ भारत अभियान 2.0 ची माहिती देत जिल्हाभरात नेहरु युवा केंद्र स्वयंसेवक आणि युवा मंडळ यांच्या माध्यमाने स्वच्छ भारत 2.0 मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करीत स्वच्छतेविषयी जनजागृती करून  प्लास्टिकविषयी दुष्परिणाम बाबत जनजागृती करण्यात आली.                                                          

या प्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव ननवरे,  सरपंच पाळधी बु. चे  अलकाबाई प्रकाश पाटील , पाळधी खुर्द चे सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी , प्रांताधिकारी  विनय गोसावी , तहसीलदार नितीन कुमार देवरे,  गटविकास अधिकारी सुशांत पाटील , पाळधी बुद्रुकचे उपसरपंच चंदन कळमकर, ,  दिलीप बापू पाटील ग्रामविकास अधिकारी  दिपक पाठक तसेच परिसरातील सर्व सरपंच लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राचे सर्व तालुका समन्वयक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयांतर्गत नेहरु युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाळधी येथे स्वच्छ भारत 2.0 अभियानाचे उदघाट्न महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी स्वच्छ भारत टप्पा 2 यामध्ये गावागावात एकल वापर प्लास्टिक प्रतिबंध, सुका कचरा, ओला कचरा व्यवस्थापन योग्य ठिकाणी करावे, सार्वजनिक स्वच्छ्ता राखावी, प्लास्टिक प्रतिबंध नियोजन करावे आणि याविषयी जनमानसात जनजागृती करावी करण्याचे आवाहन केले. पालकमंत्री व  मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर सुभाष माळी, राजू बाबुराव जाधव, महेंद्र भास्कर ननवरे, सतीश नारायण पाटील ,भरत विठ्ठल अहिरे, तानू वना भिव, सुरेश पातोडे  या सफाई कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरणगाव स्वयंसेवक मुकेश भालेराव याने तर आभार प्रदर्शन लेखाकार अजिंक्य गवळी यांनी केले. कार्यक्रमासाठी युवा स्वयंसेवक मनोज पाटील, मुकेश भालेराव, रोहन अवचारे, नेहा पवार, उमेश पाटील, अनिल बाविस्कर पाटील, गौरव वैद्य, सलाउद्दीन पिंजारी, सुष्मिता भालेराव, विकास वाघ यांनी परिश्रम घेतले.

00000


अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पेन्शन अदालत संपन्न

 




 

 जळगाव, दि.१४ (जिमाका वृत्तसेवा) :-    महाराष्ट्र शासनातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृह येथे दिनांक 13 ऑक्टोंबर, 2022 रोजी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले होते.

प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी), महाराष्ट्र-1, मुंबईचे उपमहालेखापाल (निवृत्तीवेतन) जिष्णू राजू , वरिष्ठ लेखाधिकारी मीना कुंदनानी , सहाय्यक लेखाधिकारी पुष्पा निमजे, वरिष्ठ लेखापाल संतोष केदारे, लेखापाल अमनदीप यांनी पेन्शनर्सच्या समस्या सोडविण्यासाठी पेन्शन अदालत घेतली. जिल्हा कोषागार अधिकारी शरद निकुम, अप्पर कोषागार अधिकारी  सुभाष गुंजाळ व इतर अधिकारी, कर्मचारी  तसेच पेन्शनर्स व पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी विविध शासकीय कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते.

प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी तसेच पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी  एस.डब्ल्यू पाटील, सुनिल गरुड यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा कोषागार अधिकारी यांनी पेन्शन अदालतबाबत प्रस्तावना सादर केली. उपमहालेखापाल जिष्णू राजू  यांनी पेन्शनर्ससाठी महालेखापाल कार्यालयाने सुरु केलेल्या सुविधांबाबतचे प्रतिपादन केले. 

प्रधान महालेखाकार (मुंबई) कार्यालयाचे वरिष्ठ लेखापाल संतोष केदारे व लेखापाल अमनदीप यांनी पेन्शन प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या बाबींचे व्हीडीओ सादरीकरण केले. तसेच श्रीमती पुष्पा निमजे यांनी पेन्शनर्ससाठी उपलब्ध असलेल्या सुविधा जसे साप्ताहिक ऑनलाईन पेन्शन संवाद, 24 तास उपलब्ध टोल फ्री नं.1800-22-0014 / 24*7 व्हॉईस मेल नं.020-71177775, माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, पेन्शनर्स करीता समर्पित ई-मेल ‘helpdesk.mh1ae@cag.gov.inया उपक्रमांची माहिती दिली.

त्यानंतर जवळपास 76 पेन्शनर्स यांच्या समस्या लेखी स्वरुपात घेण्यात येवून त्यातील बहुतांश तक्रारींचे निवारण जागेवरच करण्यात आले तर उर्वरित तक्रारीसंदर्भात पेन्शनर्स यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

अजय पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर श्रीमती सोनाली घनवट यांनी आभार मानले.  असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीदिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००


रब्बी हंगाम सन २०२२-२३ मध्ये कृषी उन्नीत योजना अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य अंतर्गत ग्राम बिजोत्पादन योजना

        जळगाव, दि.१४ (जिमाका वृत्तसेवा) :-    रब्बी हंगाम सन २०२२-२३  मध्ये कृषी उन्नीत योजना  अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य अंतर्गत  ग्राम  बिजोत्पादन योजना गहू व हरभरा या पिकांकरीता जळगांव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदरील योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज 1 योजना अनेक या विषयीचे पोर्टल वर बियाणे या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे. सदरील योजनेतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत आहे. कृषि विभागाने Mahadbt Farmer नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केलेले आहे. शेतक-यांनी त्यांच्या स्वतच्या Android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्ले स्टोरवर जाऊन Mahadbt Farmer हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे सदर सुविधा वापरकर्ता हि आय डी व आधार क्रमांक आधारित असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणा-या शेतक-यांच्या मोबाईलवर सदर अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक लाभार्थी त्यावरून कागदपत्रे अपलोड करु शकतात. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच या मध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेल वर किंवा 020-25511479 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शेतक-यांना करण्यात येत आहे. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी Mahadbt Farmer या मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून त्याची कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करावीत जेणे करुन अनुदान वितरण प्रक्रिया जलद होईल. सदरील योजनेंतर्गत गहू व हरभरा पिकाचे बियाणे  महाबीज च्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत संबंधित पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानित दराने वितरीत करण्यात  येणार आहे. जळगांव जिल्हयात हरभरा पिकासाठी 10 वर्ष आतील वाणांसाठी 2625 क्विंटल  व 10 वर्षावरील वाणांसाठी 2751 क्विंटल असे एकूण 5376 क्विंटल हरभरा पिकाचे व गहू पिकाचे  10 वर्षा आतील वाणाचे 417 क्विंटल व 10 वर्षावरील वाणांचे 2383 क्विटल असे एकूण 2800 क्विंटल बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक व जिल्हा व्यवस्थापक महाबिज व त्यांचे क्षेत्रिय कार्यालय व अधिकृत वितरक यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

पीटर व फ्रेशर शिकाउ उमेदवारांनी 12 ते 21 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीमध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने Registration करावे

        जळगाव, दि.१४ (जिमाका वृत्तसेवा) :-   ११३ वी अखिल भारतीय शिकाउ उमेदवारी परीक्षा (BTRI Exam) ही दिनांक 15 ते 16 नोव्हेंबर, 2022  या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. तरी जे शिकाउ उमेदवार हे रीपीटर व फ्रेशर आहेत.  त्यांनी  12 ते 21 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीमध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने  Registration  करावे, असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार बीटीआरआय जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

निर्यात द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता ” ग्रेपनेट” कार्यप्रणाली कार्यान्वित

        जळगाव, दि.१४ (जिमाका वृत्तसेवा) :-  दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी युरोपियन देशांना तसेच इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांची नव्याने नोंदणी करणे व जुन्या भागांची नोंदणी करण्याकरिता ग्रेपनेट ही कार्यप्रणाली दिनांक 5 ऑक्टोबर 2022 पासूनकार्यान्वित करण्यात आलेली आहे. सन 2021- 22 मध्ये सर्वाधिक 263075 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली त्यापैकी 105827 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात युरोपियन देशांना झाली.

सन 2021 22 हंगामात युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीचा तपशील

देश  1) युरोपियन युनियन -  द्राक्ष निर्यात ( मे. टन) 105827  मूल्य कोटीत 1194

इतर देश – द्राक्ष निर्यात ( मे. टन)  157248, मूल्य कोटीत 1104  एकूण 263075 -  2302

          युरोपियन देशांनी किडनाशक नियंत्रणाबाबत चे निकष अत्यंत कडक केले असल्याने त्या बाबीची  पूर्तता करण्याकरिता तसेच युरोपियन देशांच्या अटी व शर्तीची शर्तीची पूर्ततेची हमी देण्यासाठी सन 2003-04 पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता किडनाशक उर्वरित अंश नियंत्रण कार्यप्रणाली तयार करण्यात आली व त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

  सदर कार्यप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता ग्रेपनेट ही ऑनलाईन कार्यप्रणाली अपेडा द्वारे विकसित करून सदर कार्यप्रणाली मध्ये सर्व भागीदारी संस्थांना समावेश करून त्याद्वारे  निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी ते फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची ही सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली.

          युरोपियन युनियन व इतर देशांना कीडनाशक उर्वरित अंश तसेच युरोप कीड व रोग मुक्त ची हमी देण्यासाठी  निर्यातक्षम द्राक्ष बागांची ग्रेप नेट अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे .तसेच नोंदणीकृत द्राक्ष बागेतील द्राक्ष निर्यात करणे निर्यातदारांना ही बंधनकारक करण्यात आले.

निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणीची सद्यस्थिती 

          ग्रेपनेट अंतर्गत सण 2021 -22 मध्ये मध्ये 44180 भागांची नोंदणी करण्यात आली त्यापैकी महाराष्ट्रात 44123 व कर्नाटक मध्ये 57 द्राक्ष बागांची नोंदणी झाली. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात 34295, सांगली 4862 पुणे 1238सोलापूर 641 अहमदनगर 871 सातारा 432 उस्मानाबाद 550 लातूर 128 बुलढाणा 42 व जालना 18  निर्यातक्षम बागांची ग्रेपनेट

द्वारे नोंदणी  करण्यात आली आहे.

          सन 2022-23 मध्ये अपेडा नवी दिल्ली यांनी ट्रेड नोटीस क्रमांक/ Advisory/ 2022 -23 दिनांक  15thMarch,2022 अन्वये युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांचे ग्रेपनेट द्वारे नोंदणी करण्याकरिता दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर,2022 ग्रेपनेट कार्यप्रणाली करिता सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत.

ग्रेटनेट द्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी

 निर्यातक्षम द्राक्ष बागाची नवीन नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर,2022 या कालावधीत ग्रेपनेटद्वारे सुविधा कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

 निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता प्रपत्र -2 मध्ये अर्ज व अर्जासोबत सातबारा ची प्रत तसेच रुपये 50 फी अर्ज भरून अर्ज संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे करणे

 निर्यातक्षम द्राक्ष बागांची ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता  फार्म रजिस्ट्रेशन मोबाईलॲप कार्यान्वीत करण्यात आलेला आहे सदर ॲपद्वारे द्राक्ष बागायतदारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत त्याकरिता शेतकऱ्यांनी सदर मोबाईलॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून अर्ज करता येते. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता करावयाच्या अर्जामध्ये शेतकऱ्यांनी करावयाच्या अर्जामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव ,पत्ता,  मोबाईल नंबर सातबारा क्रमांक ,द्राक्षाची जात, क्षेत्र छाटणीची तारीख तसेच

काढण्याची तारीख व अंदाजे अपेक्षित उत्पन्न त्याच बरोबर बागेस  ग्लोबल गॅप प्रमाणपत्र असल्यास त्याचा तपशील इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.

 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागामार्फत संबंधित निर्यातक्षम द्राक्ष बागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रपत्र चार मध्ये शिफारस करून निर्यातक्षम द्राक्ष बागांची द्राक्ष बागास ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र प्रोसेस करून संबंधित द्राक्ष बागायतदारांना देण्यात येते.

 निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणी केल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर ऑनलाइन द्वारे बागेचे नोंदणी /नूतनीकरण केल्या बाबतचा संदेश पाठविला जातो निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकाकडे संपर्क साधून

नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे  नोंदणी केलेल्या नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांची सविस्तर तपशील दररोज अपेडाच्या च्या वेबसाईटवर एम आय

एस (MIS)मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे तसेच डिरेक्टरी मध्ये नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची शेतकरी निहाय  व गाव निहाय तसेच नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक व मोबाईल नंबर इत्यादी तपशील दिलेला आहे त्यामध्येही संबंधित शेतकऱ्यांचीआपली माहिती  सुविधा उपलब्ध आहे.

 निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांनी खालील रेकॉर्ड ठेवणे व कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत घ्यावयाची दक्षता

 राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागेवरील कीड रोगाचे नियंत्रण करण्याकरिता प्रपत्र-5 मध्ये निर्धारित केलेल्या लेबल क्‍लेम औषधाची फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचा रेकॉर्ड प्रपत्र- 2 मध्ये ठेवणे आवश्यक आहे  सन 2021-22 या वर्षाकरिता  केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरीदाबाद यांनी द्राक्ष पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता 68 औषधांची  लेबल क्‍लेम मंजूर केलेले आहे. त्याची माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र  मांजरी पुणे यांनी दिनांक 8 सप्टेंबर 2021-22 अन्वये प्रपत्र -5 मध्ये अंतिम केली असून त्याची माहिती  अपेडाच्या वेबसाईटवर ग्रेपनेटमध्ये  उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये एम आर एल च्या मर्यादा व प्री हार्वेस्ट इंटर्वल कालावधी दिलेला आहे  निर्यातक्षम द्राक्ष बागेतील किडनाशक उर्वरित तपासणीकरिता आपल्याला द्वारे सतरा कीडनाशक उर्वरित अंश तपासणी  प्रयोगशाळेना परवानगी दिलेली आहे. सदर प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीद्वारे आपल्या बागेचा 4 बी मध्ये तपासणी केल्यानंतरच द्राक्षाचा नमुना तपासून त्याचा अहवाल ऑनलाइन केला जातो व त्याची एक प्रत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते

 कीडनाशक तपासणीचा अहवाल संबंधित शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अपेडाच्या साइटवर डाउनलोड  अनालिसिस रिपोर्ट ( Download Analysis Report)वर क्लिक करून आपल्या बागेचा नोंदणी क्रमांक व 4b क्रमांक भरल्यानंतर संबंधित द्राक्ष बागायतदारांना आपल्या बागेचा द्राक्ष  तपासणीचा अहवाल डाऊनलोड करुन घेण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. निर्यातक्षम द्राक्षाच्या नमुन्याची तपासणी करण्याकरिता 268 औषधांची एम आर एल सहित प्रपत्र- 9 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे

सन 2022 – 23 मध्ये ग्रेपनेट द्वारे  60000 निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचा लक्षांक जिल्हानिहाय वितरीत करण्यात आला असून त्यानुसार सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कार्यवाही करावी. चालू वर्षी द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागांची वेळेत नोंदणी करून लेबल  क्लेम प्रमाणे औषधांचा वापर करून निर्याती बरोबरच स्थानिक बाजारपेठेतील  ग्राह

कांनाही चांगल्या दर्जाचे व कीडनाशक उर्वरित अंश मुक्त द्राक्ष  पुरवठा करून त्याद्वारे आपल्या मालास अधिक मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक , कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच आयुक्तालय स्तरावर कृषी निर्यात कक्षाशी संपर्क साधण्यात यावा.डॉ.कैलास मोते  संचालक फलोत्पादन  कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे

०००००

6 लाख लाभार्थ्यांना शिधा वस्तूंचे दिवाळी किट

        जळगाव, दि.१४ (जिमाका वृत्तसेवा) :-  राज्य शासनाने रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या  शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो साखर,  १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट )  शंभर रुपयांत शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

          जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या ६ लाख २० हजार ६५० शिधापत्रिकांसाठी  या निर्णयाचा लाभ होणार आहे. या शिधाजिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविण्यात आले आहे.   जळगाव जिल्ह्यातील सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळी पूर्वी जाऊन ई- पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावे. तसेच रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्नसंच घेतल्याची पावती घेऊन संचात  ४ पाकीट असल्याची खात्री करावी.  जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  अमन मित्तल यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००  

Thursday, 13 October 2022

जिल्हास्तरीय रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विभागामार्फत संपन्न

        जळगाव, दि.१३ (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 12 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी 10 वाजता विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मा. श्री. मोहन वाघ, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता.

          या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हयातील कृषि निविष्ठा विक्रेत, कंपनी प्रतिनीधी व गुणनियंत्रण निरीक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, यांनी केली व  मोहिम अधिकारी जि.प. जळगाव  विजय पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करुन किटकनाशक कायद्याबाबत माहिती दिली.  जिल्हा  गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव अरुण तायडे, यांनी ऑनलाईन परवाना बाबत माहिती दिली.  तंत्र अधिकारी (गुनि) विकृसस, नाशिक श्री संजय शेवाळे यांनी बियाणे  कायद्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषि उपसंचालक श्री अनिल भोकरे यांनी किटकनाशक विषबाधा प्रकरणी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जनजागृती मोहिम विषय उपस्थितांना मार्गदर्शन केले.

          मा. श्री मोहन वाघ यांनी उपस्थिताना कृषि निविष्ठा विक्री करीत असताना शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रीकेनुसार रा. खतांचा संतुलीत वापर, कृषक ॲपचा वापर तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्याचे कार्य विक्रेत्यांनी करणे गरजेचे आहे. तसेच सर्व कृषि निविष्ठा विक्रेते व कंपन्यांनी कायद्याचे पालन करुन आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व्यवसाय करावा अन्यथा त्यांचे परवान्यावर कृषि विभागामार्फत कठोर कार्यवाही करण्यात येईल. असे सांगीतले यानंतर कृषि उपसंचालक अनिल भोकरे, यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानून प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप केला. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

महाराष्ट्र राज्य अतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

        जळगाव, दि.१३ (जिमाका वृत्तसेवा) :- १) राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थीना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजुर केलेल्या  वीस लाखापर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडुन वितरीत केला जाईल. २)विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्टया सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे,

          सर्व जिल्हा कार्यालयांना आवश्यकतेनुसार आर्थिक व भौतिक उद्दीष्ट निर्धारित करण्यात येईल.

१)    राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा दहा लाख,            २) परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा वीस लाख,

          लाभार्थीच्या  पात्रतेच्या अटी व शती  - अर्जदार वय १७ ते ३० वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.  २) अर्जदाराची कौटूंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता आठ लाख  पर्यंत असावी. ३) अर्जदार इयता १२ वी ६० %गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी ६०% गुणांसह  पदवीका  ( Diploma) उत्तीर्ण असावेत.

४) पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. ५)  केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी. ६) बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अनंदार परताप  योजनेसाठी पात्र राहील. ७) राज्य व देशांतर्गत  अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके,  साहित्य खरेदी अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा समावेश राहील. ८) परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता फक्त शैक्षणिक शुल्क,  पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.  ९) अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर ०,-१ (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज  घेतलेले नसावे) किंवा  ५०० पेक्षा जास्त असावा,

 व्याजाचा परतावा - महामंडळ  केवळ बँकेकडुन वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त १२%पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या  लाभार्थीना करेल     

 

           कर्ज प्रस्तावा सोबत अपलोड करावयाची कागदपत्रे – १) अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला २) उत्पन्नाचा दाखला ३) महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला (Domicile) ४) अर्जदार व अर्जदाराचे पालक याचे आधार कार्ड ( Front & Backside)  प्रस्तावा सोबत अपलोड कार्ड (Print & Backside) ५) ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका,  ६) अर्जदार व अर्जदाराचे पालक  यांचे पासपोर्ट आकारातील फोटो. ७) अर्जदाराचा जन्माचा / वयाचा दाखला, ८) शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र ९) शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र,  १०) मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. ११) आधार संलग्न बँक खाते पुरावा. 

राज्यांतर्गत अभ्यासक्रम  :- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित  व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.

 देशांतर्गत अभ्यासक्रम – परदेशी अभ्यासक्रमासाठी  QS  (Quacquarelli Symonds)  च्या रँकिंग / गुणवत्ता  पात्रता परीक्षा Graduate Rccord Exam (GRE), Test of English as a Foreign  Language (TOEFL)   उत्तीर्ण झालेले विद्यार्थी .

          कार्यपध्दती –इच्छुक अर्जदाराने महामंडळाच्या वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक राहील, प्राप्त प्रस्तावास जिल्हा लाभार्थी निवड समितीची मान्यता घेवून जिल्हा व्यवस्थापक सदर प्रस्ताव मुख्यालयास मंजुरीकरीता सादर करतील. ३) अर्ज मुख्यालय स्तरावर तपासणी करुन ऑनलाईन पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करेल सदरचे पात्रता प्रमाणपत्र फक्त ६ महिना कालावधीकरिता वैद्य राहील ४) महामंडळाने निर्गमित केलेले पात्रता प्रमाणपत्र व ऑनलाईन्‍ केलेल्या अर्जाची प्रत अर्जदारास स्वत: बँकेकडे सादर करावे लागेल. ५) बँकेचे कर्ज मंजुरी पत्र ऑनलाईन पध्दतीने अपलोड करावे लागेल,६) शैक्षणिक कर्जाची दरमहा नियमित परतफेड आवश्यक आहे. ७) व्याज मागणीसाठी अर्जदाराने दरमहा बँक कर्ज खातेउतारा संगणक प्रणालीवर बपोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील. ८) अर्जदाराने थकीत रक्कमेचा भरणा केल्यास अर्जदारास लगतच्या परतफेड केलेल्या व्याजाचा हप्त्याचा परतावा देय राहील.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी - शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित पपरतफेड केलेल्या  हप्त्यामधील नियमित असलेल्या या रक्कमेचा परतावा (कमाल १२% पर्यंत)  महामंडळ अर्जदाराच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करेल. व्याज परतावासाठी जास्तीत जास्त ५ वर्ष कालावधी साह्य धरण्यात येईल.

00000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

       जळगाव, दि.१३ (जिमाका वृत्तसेवा) :-  चाळीसगाव – अनुसूचित जाती, नवबौध्द, आदिवासी (अनुसुचित जमाती) शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया स्वालंबी  बनविण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती,  नवबौध्द  शेतकन्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी (अनुसूचित जमाती) शेतकन्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ( क्षेत्राबाहेरील) सन २०२२-२३ या वर्षासाठी राबविण्यात येत असून शेतकन्यांनी या योजनांचा लाभ घेण्याच आवाहन पंचायत समिती चाळीसगावचे गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर यांनी केले आहे.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमध्य निवड केलेल्या लाभार्थीना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्याच प्लॅस्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संचापैकी ९० टक्के अनुदानावर ठिबक तुषार संच, पीव्हीसी पाईप यासाठी या बाबीपैकी एका योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकन्यास सात बारा उतारा, आठ अ उतारा, ड पत्रक, तहसीलदार, प्रांताधिकारी यांचा अनुसूचित जाती किंवा जमातीचा दाखला, तहसीलदार यांचेकडील मागील वर्षाचा दीड लाख मर्यादचा उत्पन्नाचा दाखला. आधारकार्ड, आधार लिंक बँक खाते, १ में २००१ नंतर तिसरे अपत्य नसलेचा दाखला, लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र, ग्रामसभा ठराव आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकन्यांनी ऑनलाईन www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन  कृषि अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव  नंदकुमार बाळेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

रब्बी हंगामाकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदानीत दराने महाबीजचे प्रमाणित हरभरा व ज्वारी बियाणे

           जळगाव, दि.१३ (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्यातील शेतकरी बंधुना कळविण्यात येते की, कृषि विभाग, भारत सरकार, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोला (महाबीज) मार्फत दर्जेदार तथागुणवत्तपुर्ण प्रमाणित बियाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजने अंतर्गत उपलब्ध आहे. यामध्ये हरभर दहा वर्षा आतील वाण अवघे ४५ रु प्रति किलो तसेच दहा वर्षावरील ज्वारी बियाणे ३७ रु प्रति किलो प्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्राकरीता महाबीजचे अधिकृत विक्रेते तथा उपविक्रेते यांचे मार्फत मिळणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात आलेले अनुदानित दराचे पीक / वाण

          हरभरा – फुले विक्रम, फुले विक्रांत, राजविजय -२०२, पीकेव्ही – कांचन

ज्वारी (दादर) – दहा वर्षावरील वाण परभणी मोती, पीकेव्ही क्रांती, मालदांडी, फुले वसुधा

 अनुदानीत बियाणे कसे प्राप्त करावे ..?

          शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील कृषी सहाय्य्क तथा कृषी अधिकारी यांचे कडून बियाणे परवाना घेऊन, ७/१२ व आधार कार्ड ची प्रत देऊन महाबीज विक्रेत्याकडून अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे. महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम तथा खऱ्या अर्थाने शेतक-यांची कंपनी असलेल्या महाबीज मार्फत जळगाव जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रमाणित बियाण्याचा वापर करुन उत्पादन तथा उत्पन्न्‍ वाढीसाठी शेतकरी बांधवांनी घरगुती बियाणे वापर कमी करुन अत्यल्प दरात उपलब्ध असलेला सुधारित तथा प्रमाणित बियाण्यांचा वापर या रब्बी हंगामामध्ये करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

Wednesday, 12 October 2022

दिवाळी सणानिमित्त अत्योंदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांचे अन्न्यधान्य वितरण प्रमाण जाहिर

       जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :-     शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो साखर,       १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच रु. १००/- मात्र या दराने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

          या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या ६.२०,६५० शिधापत्रिकांसाठी दिवाळी शिधाजिन्नस संचाची मागणी शासनाकडे नोंदविणेत आली आहे. या जिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविणेत येतील. रास्त भाव दुकानांमार्फत या शिधाजिन्नसांचे वाटप करणेत येईल. सदर वाटप हे ई- पॉस मशिनव्दारे करण्याचे शासनाच्या सूचना आहेत.

          जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानातून सदर दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. प्रति शिधापत्रिका शिधाजिन्नसांचा एक संच देय राहील ज्यामध्ये १ किलो रवा, १ किलो साखर,    १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेलाचा समावेश असेल. प्रति संच किंमत रु. १००/- मात्र राहील याची लाभार्थ्यांनी  नोंद घ्यावी. शिधापत्रिकाधारकांनी पुर्ण दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. या संचामधील वस्तू सुटया करुन वाटू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

          जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी या दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्य पत्रकान्वये केले आहे.

०००००