जळगाव, दि.१३ (जिमाका वृत्तसेवा) :- चाळीसगाव – अनुसूचित जाती, नवबौध्द, आदिवासी (अनुसुचित जमाती) शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया स्वालंबी बनविण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकन्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी (अनुसूचित जमाती) शेतकन्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ( क्षेत्राबाहेरील) सन २०२२-२३ या वर्षासाठी राबविण्यात येत असून शेतकन्यांनी या योजनांचा लाभ घेण्याच आवाहन पंचायत समिती चाळीसगावचे गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन
योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमध्य निवड केलेल्या लाभार्थीना नवीन विहीर,
जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्याच प्लॅस्टिक अस्तरीकरण,
सूक्ष्म सिंचन संचापैकी ९० टक्के अनुदानावर ठिबक तुषार संच, पीव्हीसी पाईप यासाठी
या बाबीपैकी एका योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकन्यास सात
बारा उतारा, आठ अ उतारा, ड पत्रक, तहसीलदार, प्रांताधिकारी यांचा अनुसूचित जाती
किंवा जमातीचा दाखला, तहसीलदार यांचेकडील मागील वर्षाचा दीड लाख मर्यादचा
उत्पन्नाचा दाखला. आधारकार्ड, आधार लिंक बँक खाते, १ में २००१ नंतर तिसरे अपत्य
नसलेचा दाखला, लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र, ग्रामसभा ठराव आदी कागदपत्रांची
पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकन्यांनी ऑनलाईन www.mahadbtmahait.gov.in
या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन कृषि
अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव नंदकुमार
बाळेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment