Saturday, 2 February 2019

33 कोटी वृक्ष लागवड येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात 1 कोटी 7 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन - उपवनसंरक्षक दिगंबर पगार



·         जिल्ह्यास 93 लाख 43 हजार 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
·         जिल्ह्यातील 47 शासकीय यंत्रणांचा सहभाग
·         जिल्ह्यातील 65 रोपवाटीकांमध्ये 1 कोटी 17 लाख  रोपे तयार करण्यात येत आहे.
·         जळगाव वनविभागामार्फत 40 हेक्टर तर यावल वनविभागामार्फत 25 हेक्टरवर नदीकाठी वृक्षलागवड करण्याचे नियोजन
·        वनरक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

·         अस्वलाचे जबडे व मागील दोन पाय जप्त, धनंजय पवार यांच्या गस्तीपथकाची कारवाई
            जळगाव, दि. 2 - शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात 1 कोटी 7 लाख 322 वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.
            वन विभागातील वनरक्षक पदाची मेगाभरती आणि 33 कोटी वृक्ष लागवड योजनेबाबत माहिती देण्यासाठी श्री. पगार यांच्या दालनात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. मोराणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे समन्वयक श्री. उदय सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी धनजय पवार आदि उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना श्री. पगार म्हणाले की, यावर्षी जिल्ह्यास 93 लाख 43 हजार 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 7 लाख 322 वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून यामध्ये जिल्ह्यातील 47 शासकीय यंत्रणांचा सहभाग आहे.
           यामध्ये जळगाव वनविभाग 13 लाख 70 हजार, यावल वनविभाग 26 लाख 69 हजार, सामाजिक वनीकरण विभाग, 20 लाख, ग्रामपंचायत विभाग 36 लाख 76 हजार 800, कृषि विभाग 4 लाख 14 हजार 300, नगरपालिका 1 लाख 21 हजार 500, महानगरपालिका 25 हजार 300, सार्वजनिक बांधकाम विभाग 21 लाख, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ 81 हजार 825, रेशीम उद्योग विभाग 6 लाख 48 हजार यासह महसुल, रेल्वे, शिक्षण, उपनिबंधक, आदिवासी विकास, पोलीस, महामार्ग व केंद्रीय संरक्षण विभागांचा समावेश आहे.
            वृक्ष लागवडीसाठी लागणऱ्या लँड बँकची माहिती जमा करणेचे काम सुरु असून 17 फेब्रुवारी, 2019 पर्यंत सर्व माहितीमा करण्यात येणार आहे. तसेच लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले असून  हे काम 31 मार्च, 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्याचेही श्री. पगार यांनी सांगितले.
           वृक्ष लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांचे नियोजन विभागामार्फत्‍ करण्यात आले आहे. त्यानुसार  जळगाव वनविभाग 22 लाख 87 हजार, यावल वनविभाग 34 लाख 66 हजार, सामाजिक वनीकरण विभाग, 56 लाख 93 हजार, रेशीम उद्योग विभाग 3 लाख याप्रमाणे 65 रोपवाटीकांमध्ये 1 कोटी 17 लाख  रोपे तयार करण्यात येत आहे.
            निसर्गाची धूप व पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी नदीकाठी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जळगाव वनविभागामार्फत 40 हेक्टरवर, यावल वनविभागामार्फत 25 हेक्टरवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच कृषि विभागातील बहुतांशी रोपे ही जलयुक्त्‍ शिवार अभियानातंर्गत्‍ खोलीकरण करण्यात आलेल्या नाल्याकाठी लावली जाणार आहेत. त्याचबरोबर जलसंपदा विभागानेही वृक्ष लागवडीसाठी 21.40 हेक्टर जागेची निवड केली आहे.
                50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात लावण्यात आलेल्या जिवंत रोपांची टक्केवारी पुढीलप्रमाणे असल्याचेही श्री. पगार यांनी सांगितले.
लागवडीचे वर्ष
लावलेल्या वृक्षांची संख्या
माहे ऑक्टो. 2018 मधील जिवंत वृक्षांची संख्या
टक्केवारी
2016 पावसाळा (2 कोटी)
15,36,956
9,58,007
62.33%
2017 पावसाळा (4 कोटी)
22,64,956
17,03,000
75.20%
2018 पावसाळा (13 कोटी)
45,85,893
35,89,865
78.28%

वनरक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
            वनविभागातील वनरक्षकाची 900 पदे ही सरळसेवेने भरण्यात येणार असून यापैकी 32 पदे ही जळगाव व यावल वन विभागात भरण्यात येणार आहे. या पदांसाठी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज भरण्याचे आवाहन उपवनसंरक्षक श्री. पगार यांनी केले आहे. अर्ज भरण्यास काही अडचण असल्यास 180030007766 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. पगार यांनी केले आहे.
            वनरक्षकाची भरती प्रकीया पुर्णपणे पारदर्शकरित्या राबविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी या भरती प्रक्रीयेबाबत कोणत्याही प्रकारच्या आमिषाला अथवा प्रलोभनाला बळी पडू नये. अर्ज भरण्यास काही अडचण असल्यास, प्रवेशपत्र, ऑनलाईन लेखी परीक्षा, इत्यादीबाबत उमेदवाराने महापरीक्षा www.mahapariksha.gov.in संकेतस्थळावर किंवा 180030007766 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. पगार यांनी केले आहे.
अस्वलाचे जबडे व मागील दोन पाय जप्त
धनंजय पवार यांच्या गस्तीपथकाची कारवाई
              आजरोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन उपवनसंरक्षक, जळगांव वनविभाग, जळगांव श्री. दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक, जळगांव व मध्यप्रदेश वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री गावाजवळील पाड्यावर आज सकाळी धाड टाकली. याठिकाणी नवलसिंग छत्तरसिंग पावरा, रा. धाबेपिंप्री याच्याकडे अस्वलाचे जबडे, मागील दोन पाय कापुन लपवुन ठेवलेले आढळुन आले. ही शिकार त्यांनी धरणगांव (मध्यप्रदेश) या गाव शिवारात 26 जानेवारी, 2019 रोजी केल्याचे कबुल केले. त्यांना मध्यप्रदेश वनविभागाने ताब्यात घेवुन वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल केला.
            या कारवाईत श्री. धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्तीपथक जळगांव, श्री. आर. एस. रोध वनक्षेत्रपाल (मध्यप्रदेश), जी. नरगेश, वनक्षेत्रपाल (मध्यप्रदेश), श्री. आर. एच. ठाकरे, वनपाल, श्री. जी. डी. गवळी, श्री. डी. जी. पाटील, श्री. सी. व्ही. पाटील (सर्व वनरक्षक), श्री. पि. यु. कोळी वाहनचालक या कर्मचाऱ्यांनी या मोहीमेत सहभाग घेतला.
000

No comments:

Post a Comment