जळगाव.दि.09:- संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात
गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातले असून
मोठ्या प्रमाणावर जिवीत तसेच वित्तीय हानी झालेली आहे. अशा या कठीण परिस्थितीत शासकीय यंत्रणेसोबतच सर्व नागरिकांनी मदत करावी
अशी अपेक्षा असते.
जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी आपत्तीच्या
अशा प्रसंगी आपत्तीचा सामना करण्यासाठी इच्छूक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, जळगाव येथे आपली नावे नोंदवावीत अधिक माहितीसाठी कार्यालयीन दुरध्वनी
0257-2241414 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी
एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000000
No comments:
Post a Comment