जळगाव, (जिमाका) दि. 20 - भारत सरकारच्या रिजिनल आऊटरिच ब्यूरो (आरओबी) अर्थात प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे यांनी टाळेबंदीच्या काळात डिजिटल माध्यमाचा वापर करुन अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले. त्यातीलच एक म्हणजे नव्याने सुरु झालेली पॉडकास्ट मालिका “कळलं का महाराजा ?” या पॉडकास्टचे शिर्षक “ लोकजागर” असे आहे. या मालिकेतील नवा अकरावा भाग कोरोना लसीविषयी जनजागृती करणारा आहे.
देशाने आत्मनिर्भरपणे एका मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. यासाठी यामागे कष्ट घेतलेल्या शास्त्राज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी आणि या लसीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा भाग सर्वसामान्यांनी नक्की ऐकावा असा आहे.
जळगाव मधील दिशा समाजप्रबोधन संस्थेतील कलाकारांनी या भागामध्ये आपले योगदान दिले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महानिदेशक मनीष देसाई यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही मालिका सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे, शंकांचे निराकरण करणारी आहे. दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना जीवंत ठेवणे, तरुणांमध्ये लोककलांचा प्रसार करणे आणि नागरिकांना जागरुक करणे अशा तीन गोष्टी यातून साध्य होत आहेत. अशी भावना निदेशक संतोष अजमेरा यांनी व्यक्त केली आहे.
आत्मनिर्भर भारत, ई-संजीवनी, शेती कायदे, कोरोना काळात घ्यायची काळजी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा विविध सरकारी योजनांची आणि जागरुकते विषयीची माहिती हसत-खेळत, नाटकीय रुपात या पॉडकास्ट मधून सादर केली जाते. ही संपूर्ण मालिका आणि नवा भाग ऐकण्यासाठी https://soundcloud.com/robmhgoa/lokjagar-marathi-ep११ या लिंकचा वापर करावा. असे प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, भारत सरकार, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment