Monday, 26 December 2022

ऑनलाईन रोजगार मेळावा 15 व 16 डिसेंबर, 2022 दरम्यान आयोजन

    जळगाव, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) :-   ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 15 व 16 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यांत आलेले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे 10 वी  व 12 वी ग्रॅज्युएट / कॉम्प्यूटर ऑपरेटर /आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 258 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

 या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग – ईन करुन ॲप्लाय करावा.

 काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790  वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता वि. जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन सन – 2022-23

        जळगाव, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे व्दारा प्रतिवर्षी उपलब्ध करुन दिली जात आहे.

या वर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 30  डिसेंबर ,2022 रोजी करण्यात येणार आहे. सदर युवा महोत्सवामध्ये वय वर्ष 15 पुर्ण ते 29 वर्षाआतील वयोगटातील खालील कलाप्रकाराज युवक-युवती सहभाग घेवु शकतील. ईच्छुक युवक व युवतींनी आपली प्रवेशिका दिनांक 28 डिसेंबर, 2022  पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे जमा करावयाची आहे. प्रवेशीवेसोबत जन्म तारखेबाबतचा पुराव रहिवासी असल्याबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

युवा महोत्सवाचे परिपत्रक, नियम व अटी खालीलप्रमाणे

कला प्रकार – 1) लोकनृत्य- Folk dance कलाकारांची संख्या सहकलाकारांसह – 20- वेळ मर्यादा -  15 मिनीटे,  2) लोकगीत - Folk song कलाकारांची संख्या सहकलाकारांसह – 10- वेळ मर्यादा -  07 मिनीटे,  एकुण 30 सहभागी होतील.

युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. 1) स्पर्धकासाठी /कलाकारासाठी वयोगट 15 ते 29 वर्ष असा राहील. कलाकाराचे वय दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी किमान 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 असावे. दिनांक 12 जानेवारी 1994 ते 12 जानेवारी 2008 या  कालावधीत जन्म झालेला असावा.

2) स्पर्धकाने नाव नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र व जिल्हयातील रहिवाशी असल्याचा दाखला (डोमेसाईल प्रमाणपत्र/ साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

3) प्रवेशिकेत स्पर्धकाचा अदयावत Whatsapp भ्रमणध्वनी क्रमांक mail id नोंदविलेला असणे आवश्यक आहे.

4) प्रत्येक कलाकाराने विहित नमुन्यातील ओळखपत्र परीपुर्ण भरुन प्रवेश अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. ओळखपत्राचा नमुना कार्यालयातुन उपलब्ध करून घ्यावा.

 

5) दिलेल्या वेळेतच स्पर्धेकाने सादरिकरण करणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही. 6) युवा महोत्सव कार्यक्रमात बदल करण्याचा वेळापत्रक रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवलेला आहे.

7) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक राहिल. त्याबाबत कोणताही तोडी अथवा लेखी आक्षेप घेता येणार नाही.

8) प्रतिस्पर्धी कलाकाराबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याचवेळी आक्षेप सीध्द कराया 9) मागील तीन वर्षात राष्ट्रिय युवामहोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी झालेले कलाकार युवक व युवती सहभागी होवू शकणार नाहीत. ( वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22)  10) स्पर्धकांनी प्रवेश अर्ज दिनांक 28 डिसेंबर, 2022  पुर्वी dsojal@gmail.com या मेलवर अथवा कार्यालयात सादर करावे.

 ज्या स्पर्धकांचे अर्ज दिनांक 28 डिसेंबर, 2022  पर्यन्त dsojal@gmail.com या मेलवर / प्रत्यक्ष कार्यालयात येतील  त्याच स्पर्धकांना सादर करता येईल. 12) कला सादर करताना कुठल्याही प्रकारची ईजा, दुखापत अथवा गंभिर अपघात झाल्यास आयोजन समिती जबाबदार रहाणार नाही. याची सर्व जबाबदारी संबंधित कलाकार व संघव्यवस्थापक यांची राहिल. 13) युवामहोत्सवामध्ये कला सादर करतांना त्यातुन भारतीय / महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन होणे आवश्यक आहे. देशाचे महाराष्ट्राचे महत्व, राष्ट्रिय एकात्मता, सत्याचा मार्गाचे अवलंब, मैत्रिभाव, शांती, समर्पण प्रदर्शीत करणे अपेक्षित आहे. 14) लोकनृत्यासाठी टेप अथवा कॅसेट ला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्य भारतीय शैलीतील असावे. गुणांकन करताना प्रामुख्याने रिदम, कोरीओग्राफी, वेशभूषा, मेकप, सेट व प्रस्तुती विचारात घेवून निर्णय घेतल्या जाईल. 15) लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये फील्मी गीत गायला परवानगी दिली जाणार नाही. लोकगीताचा निर्णय गाण्याच्या उत्कृष्टतेवर राहिल, मेकप, वेशभूषा, अॅक्शन वर राहाणार नाही. 16) युवा महोत्सवातील संख्या ही साथसंगत देणा-यासह असल्यामुळे वेगळी साथसंगत घेता येणार नाही. 17)कलाकार सहकलाकार / साथसंगत देणारे, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, सुध्दा 15 वर्ष पुर्ण 29  वर्षाआतील वयोगटातील असावा. 18) जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त संघ/ स्पर्धेक विभागीय युवा महोत्सव स्पर्धेत सहभागी होईल... 19) आपला प्रवेश अर्ज खालील दिलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावा.

सदर युवा महोत्सवात सहभागी होणा-या कलाकार युवक व युवती यांनी अधिक माहितीसाठी कीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने, मो.नं. 9763231146 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मिलिंद दिक्षित जळगांव यांनी  एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००००

महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा सन 2022-23

जळगाव, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) :-  दिनांक 01 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान महाराष्ट्रात राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिंपीक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. सदर स्पर्धामध्ये 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून यापैकी खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब व शूटींगबॉल हे चार क्रीडा प्रकार जळगांव जिल्हयाला मिळालेले आहेत. त्यानुसार 1 ते 12 जानेवारी, 2023 या दरम्यान चारही क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धामध्ये सहभागी होणान्या खेळाडु संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक, पंच व इतर पदाधिकारी यांचा निवास, भोजन, प्रवास खर्च, दैनिक भत्ता, गणवेश, व स्पर्धा करिता येणान्या खर्चाचे अंदाजपत्रक मा. आयुक्त, महोदय यांना सादर करण्यात आलेले आहे.

मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या समन्वय सभेत ठरल्यानुसार महाराष्ट्र राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा ज्योत रॅलीचे आयोजन सर्व विभागीय उपसंचालक, क्रीडा विभाग मुख्यालयाच्या जिल्हयाच्या ठिकाणी करण्याचे निश्चित झालेले आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून भव्यतेने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करून क्रीडा वातावरण निर्मीतीस पोषक ठरणार आहे.

ऑलिंपिक क्रीडा ज्योत कार्यक्रमानुसार 29 डिसेंबर, 2022 रोजी जळगांव जिल्हयात सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा ज्योत रॅलीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथून होणार असून शिवतिर्थ चौक, टॉवर चौक, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप होणार आहे. सदर रॅलीमध्ये जिल्हयातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, जिल्हयातील राज्य तसेच केंद्राचे क्रीडा पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत.  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००००

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

       जळगाव, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) :-  महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक 29 जुलै, 2022 रोजीच्या आदेशान्वये राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना लागू करण्यांत आली असून, शेतकन्यांना सदर योजने अंतर्गत लाभ मिळणेकरीता विशिष्ट क्रमांकांची यादी दिनांक 23 डिसेंबर, 2022 रोजी पोर्टलवर प्राप्त झाली आहे. सदर योजने अंतर्गत विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहे. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले सरकार सेवा केंद्र तसेच सी. एस. सी. केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणिकरण यशस्वीरीत्या करून प्रस्तुत योजनेचा लाभ घ्यावा. विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये दि. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगांव या बँकेचे आजपर्यंत एकूण 45,088 व राष्ट्रीयकृत बँकांचे एकुण 12,143 असे एकुण 57,231 कर्जखाती आली असून, दि. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव या बँकेचे तालुकानिहाय कर्जखाती खालील प्रमाणे :-

 अंमळनेर – 5448, भडगांव -3067, भुसावळ -2421, बोदवड – 919, चाळीसगाव – 3968,  चोपडा – 3998,  धरणगाव – 3630,  एरंडोल -2832, जळगाव -3904,  जामनेर – 2446,  मु. नगर – 581,  पाचोरा – 4091,  पारोळा – 4091, रावेर -959, यावल – 2783 एकुण 45088

तरी या  योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांचे कार्यालयामार्फत करण्यांत येत आहे. पात्र शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटीस बोर्डवर विशिष्ट क्रमांकाच्या यादीत आपले नाव असलेबाबत खात्री करून घ्यावी व आपले सेवा सरकार केंद्र अथवा सी.एस.सी. केंद्रावर जाऊन यशस्वरीत्या आपले आधार प्रमाणिकरण करून घेऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,  संतोष बिडवई यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

000000

 

Friday, 23 December 2022

एकाच वेळी जास्त खत खरेदी करु नये व खताचा साठा करुन ठेवू नये कृषि विकास अधिकारी – वैभव दत्तात्रय शिंदे

        जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : -रब्बी 2022  हंगामाची पेरणी सुरु आहे. तसेच जिल्ह्यात आज रोजी युरीया या मुख्य खताचा साठा 32.382 मे. टन असुन, एसएसपी खताचा 20.320  मे. टन. एमओपी खताचा 4.052 मे. टन, डीएपी चा 6,552 मे. टन व इतर संयुक्त खते जसे 10.26.26.15.15.15,20.20.0 व 16.16.16 या खतांचा साठा 26,514 मे. टन एवढा शिल्लक आहे. शेतकऱ्यामार्फत जादा मागणी असलेल्या 10.26.26 या खताचा माहे ऑक्टोंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत 4,722 मे. टन एवढा पुरवठा झालेला आहे. तसेच पुढील आठवडयात कृभको कंपनीमार्फत 10..26.26 या खताचा 3100 मे. टन एवढा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात आजरोजी 10.26.26 या खताचा जिल्ह्यात शिल्लक साठा 1572 मे. टन असुन तालुकानिहाय व डिलरनिहाय उपलब्धतेचा अहवाल सोबत जोडुन देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असुन दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यातील व तालुक्यात उपलब्ध साठसाची विक्रेतेनिहाय माहिती कृषक ॲपवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. जिल्ह्यात कोणत्याही खतासोबत इतर खत घेण्याची सक्ती दुकानदारांमार्फत करण्यात येत असेल तर त्वरीत आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी .

          शेतकरी बांधवांनी फक्त विशिष्ट एकाच खताचीमागणी न करता इतर उपलब्ध सरळ मिश्र व संयुक्त खतांचा वापर संतुलीत प्रमाणात करावा. आपण मिश्र खतांच्या ग्रेड युरीया, पोटॅश व एस.एस.पी या खतांच्या माध्यमातुन खालील उल्लेख केल्याप्रमाणे घरच्या घरी मिश्र खते तयार करु शकतो.

          50 किलो मिश्र खताची एक गोणी तयार करण्यासाठी लागणारी खतमात्रा ( किलोमध्ये)

 मिश्र खताचे नाव – 15-15-15,   युरीया – 17,  सिंगल सुपर फॉस्फेट – 47,  पोटँश - 13

मिश्र खताचे नाव – 10-26-26,   युरीया – 11,  सिंगल सुपर फॉस्फेट – 82,  पोटँश -22

मिश्र खताचे नाव – 12-32-16   युरीया – 13,  सिंगल सुपर फॉस्फेट – 100,  पोटँश -14

मिश्र खताचे नाव – डीएपी,   युरीया – 20,  सिंगल सुपर फॉस्फेट – 144,  पोटँश-00

मिश्र खताचे नाव – 20-20-00   युरीया – 22,  सिंगल सुपर फॉस्फेट – 63,  पोटँश -00

मिश्र खताचे नाव – 19-19-19,   युरीया – 21,  सिंगल सुपर फॉस्फेट – 60,  पोटँश -12

मिश्र खताचे नाव – 18-18-10  युरीया – 12,  सिंगल सुपर फॉस्फेट – 20,  पोटँश -09

मिश्र खताचे नाव – 24-24-00,   युरीया – 38,  सिंगल सुपर फॉस्फेट – 75,  पोटँश -00

मिश्र खताचे नाव – 14-35-14,   युरीया – 16,  सिंगल सुपर फॉस्फेट – 110,  पोटँश -12

          काही कृषि निविष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम खत टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री करु नये, रा. खते विक्री करतांना इतर कृषि निविष्ठा लिंकींग विक्रेते यांनी कर नये म्हणून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे. शेतकरी बांधवांनी खताच्या बॅगवर निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत खरेदी करुन साठा करु ठेवू नये, सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल करावी. खत खरेदी पक्कया बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी. शेतकरी बांधवांनी जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी, असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव वैभव दत्तात्रय शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

श्री.जी.एच. रायसोनी ज्युनिअर कॉलेज जळगाव येथे मंडणगड पॅटर्न

        जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : - श्री. जी.एच.रायसोनी ज्युनिअर कॉलेज जळगाव येथे मंडणगड पॅटर्न अंतर्गत मा. आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे तसेच     मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 23 डिसेंबर, 2022 रोजी जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी श्री. बी.यु.खरे यांनी  महाविदयालयातील 11 वी विज्ञान तसेच 12 वी विज्ञान अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबीरात 11 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 60 तसेच 12 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 55 विदर्यार्थी सदर शिबीरास उपस्थित होते. तसेच सदर शिबीरास महाविदयालयाचे प्राचार्य श्रीमती तिवारी तसेच महाविदयालयाचे लिपीक श्री सोनार उपस्थित होते. तसेच सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री सोनार यांनी केले आहे.

          श्री. धनाजी नाना ज्युनिआर कॉलेज जळगाव येथे मंडणगड पॅटने अंतर्गत श्री. बी. यु. खरे, संशोधन अधिकारी जळगाव यांनी महाविदयालयातील 11 वी विज्ञान तसेच 12 वी विज्ञान अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्याना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबीरात 11 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 63 तसेच 12 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 61 विदयार्थी सदर शिबीरास उपस्थित होते. तसेच सदर शिबीरास महाविदयालयाचे प्रचार्य श्री. वाघुळदे उपस्थित होते. तसेच सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती प्रिती बोंडे यांनी केले.

          तसेच श्री. बी.यु. खरे संशोधन अधिकारी जळगाव यांनी वर्ग 11 वी विज्ञान अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरीता समितीकडे अर्ज करण्यात यावे. असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बी. यु. खरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 जानेवारी रोजी

        जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा):-   प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे जानेवारी महिन्यातील पहिला सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 या दिवशी असल्यामुळे त्या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन सकाळी 11.00 वाजता मा. जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात करण्यात आलेले आहे.       

तरी नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांत अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आंत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन सदर लोकशाही दिनी उपस्थित राहणेबाबत आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला 30 डिसेंबरपर्यंत सादर करावा - जिल्हा कोषागार अधिकारी श.वा. निकुम

        जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा):-  जिल्हयातील राज्य शासनाच्या सर्व सेवा निवृत्तवेतन धारकांना कळविण्यात येते की, माहे डिसेंबर- 2022 च्या निवृत्तीवेतनास हयातीच्या दाखल्यांचे काम चालू असल्याने , तसेच निवृत्तीवेतन शाखेतील कर्मचाऱ्यांची दिनांक 27 ते 30 डिसेंबर, 2022 या कालावधी दरम्यान 8 वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क    ( भाग-1 व 2 ) विभागीय परीक्षा असल्याने 5 जानेवारी, 2023 पर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे.

          तरी आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. ज्यांनी हयातीच्या दाखल्यांच्या यादीवर अद्यापपर्यंत स्वाक्षरी केलेली नसेल त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव येथे दिनांक 30 डिसेंबर, 2022 पर्यंत हयातीचे दाखले जमा करण्यात यावेत , जेणेकरुन त्यांचे निवृत्तीवेतन बँकेत जमा करणे शक्य होईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी श.वा. निकुम यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

ऑनलाईन रोजगार मेळावा 15 व 16 डिसेंबर, 2022 दरम्यान आयोजन

    जळगाव, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) :-   ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 15 व 16 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यांत आलेले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे 10 वी  व 12 वी ग्रॅज्युएट / कॉम्प्यूटर ऑपरेटर /आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 258 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

 या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग – ईन करुन ॲप्लाय करावा.

 काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790  वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता वि. जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 

Wednesday, 21 December 2022

ज्या व्यक्तींना आधार कार्ड काढुन 10 वर्षे पूर्ण झाली असल्यास त्यांनी आपले आधार कार्ड अदयावत करणे गरजेचे

            जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा):-  भारत सरकारकडील दिनांक 19 सप्टेबर 2022 च्या अधिसुचनेनुसार, ज्या व्यक्तींना आधार कार्ड काढुन 10 वर्षे पूर्ण झाली असल्यास त्यांनी आपले आधार कार्ड अदयावत करणे गरजेचे आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नवीनतम आणि अद्ययावत तपशीलांसह आधार सादर करणे आवश्यक आहे.      

        ज्यांना आधार कार्ड काढून 10 वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. परंतु अदयावत केले नसतील, उदा -  पत्ता, मोबाईल क्रमांक इ. किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या तपशीलात कोणताही बदल झालेला नाही अश रहिवाशांना आधार देणारी कागदपत्रे अपलोड करून त्यांचा पत्ता पुन्हा सत्यापित करणे आवश्यक आहे. त्यानुसार आधारधारकांना यासंदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉक्युमेंट अपडेट’ हे नवीन फीचर विकसित करण्यात आले आहे. नागरिक आपले आधार अदयावत करण्यासाठी कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आधार अदयावत करू शकतात. जसे आपले सरकार सेवा केंद्र, सेंट्रल बँक, सीएससी सेंटर, बीएसएनएल कार्यालय या ठिकाणी अदयावत करु शकतील.

          महिला व बालविकास विभागातंर्गत 0 ते 05 वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडी मध्ये करण्यात येत आहे. हि नोंदणी निशुल्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कायमस्वरुपी एक आधार संच बसविण्यांत आला असुन, त्या ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड अदयावत करता येतील. आधार कार्ड अदयावत करणेकरीता शासनाकडील निश्चित करण्यांत आलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाईल. तरी सदर योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हाधिकारी अमन मित्तल,  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केलेआहे. अधिक माहितीकरीता 1947 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

०००००

 

मंडणगड पॅटर्न, जळगाव जिल्हयात राबविण्यात येणार

         जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : -मंडणगड पॅटर्ननुसार राज्यातील सन 2022-23 मधील 11 वी विज्ञान व 12 शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन संदर्भीय परिपत्रकानुसार करावयाचे आहे. त्याची कार्यपध्दती खालील प्रमाणे आहे.

          सन 2022-23 मध्ये ज्या प्रवेशीत विदयार्थी यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रलंबित आहे. त्या सर्वांचे नावे व प्रस्ताव आपण परिपुर्णरित्या तयार करुन सदर विषयाची माहिती या सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ.ब.व क. मध्ये दिनांक 22 नोव्हेंबर, 2022 पर्यंत या कार्यालयास तालुका समतादुत यांचेकडे हस्ते व jalgaoncvc@gmail.com या ईमेलवर तात्काळ सादर करावी. याबाबत कोणतीही हयगय होणार नाही. आणि कोणताही मागासवर्गीय विदयार्थी जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

          मा. आयुक्त समाज कल्याण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांचे सुचनेनुसार आपल्या महाविदयालयातील समान संधी केंद्र Equal Opportunity Centre  ची मदत सादर उपक्रम राबवितांना घेण्यात यावी. जर आपण आपल्या महाविदयालयात समान संधी केंद्राची स्थापना केली नसल्यास ती तात्काळ करुन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात यावा.

          आपल्या कनिष्ठ महाविदयालयातील अनुसूचित जाती (SC) विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विशेष मागास वर्ग (SBC) व इतर मागास वर्ग (OBC)   चे विदयार्थी ज्यांचे जात प्रमाणपत्र काढलेले नाही त्यांनी संबंधीत उपविभागीय अधिकारी महसुल / प्रांत अधिकारी यांचेकडे तात्काळ प्रचलित पदध्तीनुसार अर्ज करुन जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत, सदरचे काम सुध्दा समान संधी केंद्रामार्फत करावे.

          आपल्या कनिठ महाविदयालयातील अनुसूचित जाती (SC) विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विशेष मागास वर्ग (SBC) व इतर मागास वर्ग (OBC)   चे विदयार्थी ज्यांचे जात  वैधता प्रमाणपत्र निर्गमित झालेले नाही. अशा सर्व विदयार्थ्यांनी   hhtps:/barticvalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाचा उपयोग करुन आपला ऑनलाईन्‍ अर्ज भरुन घ्यावा व सदर अर्जाला यासोबत जोडलेल्या परिपत्रकानुसार पुरावे जोडून आपल्या जात पडताळणीचा परिपुर्ण अर्ज दिनांक 25 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आपल्या महाविदयालयाकडे जमा करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात.

 शाळेचे / महाविदयालयाचे मुख्याध्यापक, समान संधी केंद्राचे नोडल अधिकारी यांचे नाव, पद, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल इत्यादी माहिती परिशिष्ट क मध्ये भरुन देण्यात यावी.

सदरची अ.ब.व क ची परिशिष्ट संग्रही ठेवून नवीन सत्रात 22 नोव्हेंबर, पर्यंत सादर करावी.

 सदर उपक्रमाबाबत सर्व संबंधीत विदयार्थी व पालक यांना अवगत होईल अशा रितीने नियोजन करुन महाविदयालयस्तरावरुन प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी व त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा. मंडणगड पॅटर्न राबविण्याबाबत वेळोवेळी बैठका/ वेबिनार इत्यादी घेण्यात येतील त्यावेळी अचुक माहितीसह आपण उपस्थित राहावे.

 अनुसूचित जमाती (ST) च्या विदयार्थ्यांनी संबंधीत उपविभागीय अधिकारी यांचेकडून जातप्रमाणपत्र काढून जात वैधतेसाठी संबंधीत अनुसूचित जमाती समितीकडे जात वैधतेसाठी सादर करावे, असे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी  (नि.श्रे) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जी आर खरात  जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम -2022

        जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा):- पिकस्पर्धेबाबत यापुर्वीचा दि.5 ऑक्‍टोबर 2020 चा शासन निर्णय अधिक्रमीत करून सन 2022-23 पासुन पिकस्‍पर्धेमध्‍ये आवश्‍यक बदल करुन शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात आला आहे. रब्‍बी हंगाम -2022 पासून पिकस्‍पर्धा तालुका, जिल्‍हा व राज्य पातळीवर राबविण्‍यात येणार आहे.

          राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात  व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

1) पीकस्पर्धेतील पीके :

रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस (एकूण 05 पिके)

पीकस्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. 

2) स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या -

 पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

3) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क :

 सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रु.300 राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 05 यापेक्षा प्रवेश अर्ज  कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यांत येईल. 

4) अर्ज दाखल करण्याची तारीख:

रब्‍बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल. 

 ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस - 31 डिसेंबर अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास , त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

 या पद्धतीने पिकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्‍हास्‍तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल.

राज्‍यपातळीवरील पिकस्‍पर्धा चालुवर्षी होणार नाहीत. मागील वर्षाच्‍या तालुकास्‍तरीय स्‍पर्धेतील पिकनिहाय पहिल्‍या तीन क्रमांकाच्‍या विजेत्‍या शेतक-यांनी जिल्‍हास्‍तरीय पिकस्‍पर्धेमध्‍ये सहभाग घ्‍यावा.

5) बक्षिस स्वरुप - सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये

1) स्पर्धा  -  तालुका पातळी -  पहिले बक्षिस पाच हजार रुपये , दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस –दोन हजार रुपये,

2)  जिल्हा पातळी - पहिले बक्षिस – दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस -  सात हजार रुपये,  तिसरे बक्षिस - पाच हजार रुपये ,

3) राज्य पातळी -  पहिले बक्षिस -  पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षिस - चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षिस – तीस हजार रुपये ,

          रब्बी हंगाम - दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्‍हावे. असे आवाहन कृषि आयुक्‍तालयामार्फत करण्‍यात येत आहे.  कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे विकास पाटील  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे 24 डिसेंबर रोजी आयोजन

        जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा):-  शासनाकडुन दिनांक 24 डिसेंबर, 2022 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या वर्षी साजरा करावयाच्या ग्राहक दिनासाठी  Effective disposal of cases in Consumer Commissions  अशी संकल्पना (थीम) केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे.

          दिनांक 24 डिसेंबर, 2022 चा राष्ट्रीय ग्राहक दिनाचा जिल्हा स्तरीय कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जळगाव आणि अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोग यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. ग्राहकांनी त्यांचे हक्कासाठी दाद कोठे मागावी याबाबत विशेष पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आले असुन त्याचे सादरीकरण  या प्रसंगी करण्यात येईल. तसेच ग्राहक प्रबोधनात्मक पथनाटयाचे सादरीकरण देखील या प्रसंगी होईल.

            तरी नागरिकांनी ग्राहक म्हणून आपल्याला असलेले अधिकार व ग्राहक म्हणून वावरताना घ्यावयाची सतर्कता यावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

00000

 

Tuesday, 20 December 2022

ज्या व्यक्तींना आधार कार्ड काढुन 10 वर्षे पूर्ण झाली असल्यास त्यांनी आपले आधार कार्ड अदयावत करणे गरजेचे

           जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा):-  भारत सरकारकडील दिनांक 19 सप्टेबर 2022 च्या अधिसुचनेनुसार, ज्या व्यक्तींना आधार कार्ड काढुन 10 वर्षे पूर्ण झाली असल्यास त्यांनी आपले आधार कार्ड अदयावत करणे गरजेचे आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नवीनतम आणि अद्ययावत तपशीलांसह आधार सादर करणे आवश्यक आहे.      

        ज्यांना आधार कार्ड काढून 10 वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. परंतु अदयावत केले नसतील, उदा -  पत्ता, मोबाईल क्रमांक इ. किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या तपशीलात कोणताही बदल झालेला नाही अश रहिवाशांना आधार देणारी कागदपत्रे अपलोड करून त्यांचा पत्ता पुन्हा सत्यापित करणे आवश्यक आहे. त्यानुसार आधारधारकांना यासंदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉक्युमेंट अपडेट’ हे नवीन फीचर विकसित करण्यात आले आहे. नागरिक आधार अदयावत कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आधार अदयावत करू शकतात. जसे आपले सरकार सेवा केंद्र, सेंट्रल बँक, सीएससी सेंटर, बीएसएनएल कार्यालय या ठिकाणी अदयावत करु शकतील.

          महिला व बालविकास विभागातंर्गत 0 ते 05 वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडी मध्ये करण्यात येत आहे. हि नोंदणी निशुल्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कायमस्वरुपी एक आधार संच बसविण्यांत आला असुन, त्या ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड अदयावत करता येतील. आधार कार्ड अदयावत करणेकरीता शासनाकडील निश्चित करण्यांत आलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाईल. तरी सदर योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हाधिकारी अमन मित्तल,  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केलेआहे. अधिक माहितीकरीता 1947 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

०००००

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन

          जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा):-  जळगाव जिल्ह्यातील केळी हे प्रमुख फळपिक असून सद्यस्थितीत तापमान कमी – कमी होत असून त्याचे केळी पिकावर विपरीत परिणाम होत आहे. केळीच्या चांगल्या वाढीसाठी तापमान 16 ते 30 सें.ग्रे. यादरम्यान असावे. कमी तापमानाचा कंद उगवण, मुळयांची वाढ, मुळयांची कार्यक्षमता, पाने येण्याचा वेग, पानावर चट्टे येणे, झाडांची वाढ मंदावणे, फळांची वाढ मंदावणे, फळपक्वतेस येण्याचा कालावधी वाढणे, केळी पिकण्याची क्रिया मंदावणे, इत्यादी दृष्ट व अदृष्य परिणाम होतात. सद्यस्थितीत मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये लागवड केलेली कांदेबाग काढणीच्या अवस्थेत, या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात लागवड केलेली बाग फळवाढीच्या अवस्थेत व या वर्षी जून महिन्यात लागवड केलेली बाग शाखीय वाढीची अवस्था संपवून निसवण्याच्या अवस्थेत आहेत. केळीच्या या सर्व अवस्था कमी तापमानास अत्यंत संवेदनशील असून केळीच्या चांगल्या वाढीसाठी तसेच उत्पादन व गुणवत्तेसाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे, या विषयी माहिती देण्यात येत आहे.

          नवीन लागवडीच्या बागेत कुळवाच्या पाळया देवून बागेतील माती भुसभुशीत ठेवावी, बागा तणमुक्त ठेवाव्यात व मुख्य झाडाशेजारीत पिल्ले नियमित कापावीत, बागेतील मुख्य झाडाचे कोणतेही पान कापू नये, फक्त रोगग्रस्त पानांचा भाग काढावा व बागेबाहेर नेवून नष्ट करावा, झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति झाड 250 ते 750 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी, शक्य असल्यास बागेत सेंद्रिय आच्छादन करावे, रासायनिक खताच्या मात्रा वेळापत्रकानुसार द्याव्यात, थंडीच्या दिवसात केळीस रात्रीच्या वेळेस पाणी पुरवठा करावा, सकाळी भल्या पहाटे ओलसर काडी कचरा पेटवून बागेच्या चारही बाजूस धुर करावा, बागेभोवती संजीव कुंपण असावे, नसल्यास पळकाडयाच्या झापा करुन किंवा 50 टक्के शेडनेट वापरुन वारा रोधक कुंपण करावे, घड व्यवस्थापनात केळी फुल कापावेत, घडावर इच्छित फण्या ठेवून बाकीच्या फण्यांची विरळणी करावी. घडावर फुलकिडींच्या नियंत्रणासाठी व घडातील केळी फळांच्या वाढीसाठी अनुक्रमे व्हर्टीसिलियम लेकॅनी (3 ग्रॅम/ लिटर ) व 0.5 टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट + 1 टक्के युरियाची फवारणी करावी. घडावर कोरडया केळी पानांचे किंवा 100 गेज जाडीच्या, 2-6 टक्के सच्छिद्रतेच्या पॉलीप्रापिलिनच्या स्कर्टिग बॅगांचे आवरण करावे,

          काढणी झालेल्या सर्व झाडांवरील पाने कापावीत, यामुळे त्यांची वाढ होत नाही व जमिनीतून अन्नद्रव्ये घेतली जात नाहीत. बागेत काही वेळी सुक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसून येतात अशा वेळेस सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतुन किंवा ठिबकव्दारे द्यावीत,  बागेतील विषाणूजन्य रोगट झाडे समुळ नष्ट करावीत, रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शिफारशीत आंतरप्रवाही किडीनाशकांची फवारणी घ्यावी, बागेत करपा किंवा सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डेझिम 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोन्याझॉल 10 ग्रॅम किंवा ट्रॉयडेमार्क 10 ग्रॅम या बुरशीनाशकाची 10 लीटर पाण्यात स्टिकरसह मिसळून आलटून पालटून फवारणी  करावी. पहिल्या फवारणह नंतर 7 ते 21 दिवसांच्या अंतराने रोगाच्या तीव्रतेनुसार 3 ते 4 फवारण्या घ्याव्यात. तसेच सुरवातीच्या फवारण्या नंतर रोगाच्या तीव्रतेनुसार प्रति 10 लीटर पाण्यात प्रोपिकोन्याझॉल 5 मि.ली. किंवा कार्बेन्डेझिम 5 ग्रॅम + 100  मि.ली. मिनरल ऑइलच्या 2 ते 3 फवारण्या दर 2 ते 3 आठवडयाच्या अंतराने कराव्यात.

 विद्राव्य खत 19:19:19  हे 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे घेऊन त्याची केळीवर फवारणी करावी. अशा पध्दतीने व्यवस्थापन केल्यास कमी तापमानाचा होणारा परिणाम कमी होतो  व नुकसानीची तिव्रता कमी होते. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

Thursday, 15 December 2022

कै. बाळू नथ्थू चौधरी यांचे मयताबाबत काही शंका असल्यास 23 डिसेंबर, 2022 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव यांना लेखी स्वरुपात खुलासा कळवावा

        जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा):-   नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा बंदी क्रं. सी.4657 कै. बाळू नथ्थू चौधरी ,  यांस भा. दं.वि कलम 302 अन्वये गुन्हा केल्याने दिनांक 30 एप्रिल, 2004 रोजी मा. 2 रे तदर्थ अति सत्र न्यायालय, जळगाव यांनी जन्मठेप व दंड रु. 1000/- न दिल्यास 3 महिने तुरुंगवास अशी शिक्षा सुनावलेली  होती. सदर बंदी दिनांक 4 मे, 2004 पासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झाला होता.

          सदर बंद्याची प्रकृती बिघडल्याने त्यास दिनांक 10 जून, 2022 रोजी कारागृह वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याने सामान्य रुग्णालय, नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार चालू असतांना शिक्षा बंदी क्रं. सी . 4657 कै. बाळू नथू चौधरी हा मयत झाल्याचे कर्तव्यावर हजर वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजाळ यांनी  दिनांक 21 जून, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता मयत घोषित करण्यात आले आहे.

          फौजदारी प्रक्रीया संहीता, 1973 मधील कलम 176 (1) (2) (3) (4) अन्वये कै. बाळू नथु चौधरी यांचे मृत्यूबाबतची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश मा. अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी उपविभागीय दंडाधिकारी, मालेगांव यांना दिले आहेत.

          तरी कै. बाळू नथु चौधरी यांचे मयताबाबत काही शंका असल्यास दिनांक 23 डिसेंबर, 2022 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव, एकात्मता चौक, कॉलेज रोड, नवीन तहसिल कार्यालय मालेगांव जि. नाशिक यांना लेखी स्वरुपात खुलासा कळविण्यात यावा.

        सदर तारखेपर्यंत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

 

जळगाव येथे 26 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

          जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा):-  पोस्टाच्या ज्या कामांसंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव येथे दि. 26 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी चार वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

          तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतित अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव-425001 या पत्त्यावर दि.21 डिसेंबर, 2022 पुर्वी पोहोचेल अशाबेताने पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जाईल, परंतु डाक अदालतीत समावेश केला जाणार नाही. असे अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Wednesday, 14 December 2022

जिल्हयातील 140 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिेक निवडणूकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी या कालावधीत मदयविक्रीची दुकाने बंद

        जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : - जिल्ह्यातील  14 तालुक्यातील एकूण 140 ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे कडून, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. जिल्हयातील एकूण 140 ग्रामपंचायतीच्या निवडणूकी साठी 18 डिसेंबर, 2022 रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सदर ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम 2022 अंतर्गत प्रत्यक्ष निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदानाच्या दिवशी निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पाडाव्यात तसेच त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोबत जोडलेल्या यादीत नमुद केलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील मदयविक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे.

          जिल्हाधिकारी जळगाव यांचे पत्र क्र. साशा/ग्रामप/ईकावी/12/21/503/2022 दिनांक 5 डिसेंबर, 2022 रोजीच्या पत्रा नुसार ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर,2022 या कालावधीत जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या असल्याने तेथे 18 डिसेंबर रोजी निवडणूका पार पडणार आहेत.

                    महाराष्ट्र विदेशी मदय (रोखीने विक्री व नोंदवहया इ) चे नियम 1969 चे नियम 9(अ) (2) (C) (1), (2)  तसेच महाराष्ट्र देशी मदय नियम 1973 चे नियम 26 (C) (1), (2), तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने ( ताडी झाडे छेदणे) 1968 चे नियम 5 (अे) (1), (2)   टी.डी,1 अनुज्ञप्तीतील अ.क्र.11 (a) अन्वये मदय विक्री दुकाने असलेल्या निर्वाचन क्षेत्रात ज्या दिवशी स्थानिक प्राधीकरणाच्या सार्वत्रीक निवडणुका किंवा पोटनिवडणुका होत असलेल्या ठिकाणी मतदानाचा दिवस मतदानाच्या अगोदरचा दिवस व मतमोजणीचा दिवशी मदय विक्री बंद ठेवण्याबाबत नमुद केलेले आहे. तरी जिल्हयातील 140  ग्रामपंचायती निवडणूक मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये मदयविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  

०००००

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांची माहिती

            जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2021-2022 करीता राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी  पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पध्दतीने 4 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा परिषद जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

                ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे प्रयत्न केलेला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेंर्गत प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. आता यावरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये म्हणून तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सुविधा केली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमानुसार लाभार्थी हिस्सा व अन्य बाबींसाठी नियोजन करणे शक्य होणार आहे.

                नावीण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+ 3 तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीने निवड करण्यात येईल. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री  किंवा शेळीपालनापैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईलवर AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअरवर 13 डिसेंबर, 2022 ते 11 जानेवारी ,2023  या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये.

                लाभार्थी निवडीचा कृती आराखडा असा : 13 डिसेंबर, 2022  ते 1 जानेवारी, 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारणे, 12 ते 13  जानेवारी, 2023 रोजी डाटा बॅक अप करणे, 14 ते 18 जानेवारी, 2023 या कालावधीत रँडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड, 19 जानेवारी, 2023 राखीव, 20 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत  मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, 29 ते 5 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड पूर्ण करणे, 6 फेब्रुवारी, 2023 राखीव, 7 ते 8 फेब्रुवारी 2023  लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता,  अपलोड करणे, 9 फेब्रुवारी, 2023 कागदपत्रे अंतिम पडताळणी , 10 फेब्रुवारी, 2023 राखीव, 11 फेब्रुवारी, 2023 रोजी अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार

          योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक किंवा तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा परिषद जळगाव यांनी केले आहे.

००००

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

                  जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : धनगर समाजाच्या (भटक्या जमाती –क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व पाचवी च्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत स्व.दगडाबाई चंपालालजी बियाणी संचलित बियाणी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) भुसावळ, जि. जळगाव या निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

                सदर योजनेअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव या कार्यालयाकडे प्राप्त अर्जामधून दिनांक 19 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर महाबळ रोड जळगाव येथे ड्रॉ पध्दतीने विदयार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. तरी सदर योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पालकांनी ड्रॉ साठी उपस्थित रहावे. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यानी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

Monday, 12 December 2022

महिला आणि बाल विकास विभाग कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छाळापासून संरक्षण

        जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनिय 2013 व नियम दिनांक  9 डिसेंबर, 2022  आणि महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय  क्र. मकचौ- प्र.क्र.63/मकक- दिनांक 19 जुन 2014 अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी कार्यालयीन स्तरावर अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे अनिवार्य आहे.

समिती गठीत करण्याची पध्दती.

          ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी / कर्मचारी यांचा समावेश असेल त्या सर्व शासकिय निमशासकिय खाजगी क्षेत्रातील सर्व कार्यालय, संस्था, दुकाने, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रिडा संस्था, प्रेक्षागृह, क्रिडा संकुले इ. सर्व ठिकाणी अधिनियमानुसार अंतर्गत तक्रार समिती गठित करणे अनिवार्य आहे. अंतर्गत तक्रार समिती ही शासननिर्णय आणि अधिनियमाला अनुसरुनच असावी. समिती गठीत नसेल तर दंड भरावा लागेल.

 

          अधिनियमात कलम 26 मध्ये नमुद आहे की जे कार्यालय अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणार नाही त्या कार्यालयाच्या मालकाला रु 50,000/- पन्नास हजार पर्यंत दंड आकारण्यात येईल. तक्रार कुठे कराल,

           शासकीय, निमशासकीय व  खाजगी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असेल तर त्यांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार करु  शकतात. महिला कर्मचाऱ्याचे नाव गोपनिय ठेवणे जाते.

 समितीचे फलक लावणे बंधनकारक

 

          शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयाच्या दर्शनी भागात अंतर्गत तक्रार निवारण समिीचे फलक लावणे बंधनकारक आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

महिला लोकशाही दिनाचे १९ डिसेंबरला ऑनलाइन आयोजन

                    जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 19 डिसेबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. 

          समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन ऑनलाइन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक  नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

            ई- मेल आयडी असे : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसीलदार, जळगाव- tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार, जामनेर- tah.jamner@gmail.com, तहसीलदार, एरंडोल-  erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार, भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार, धरणगाव- dharangaon2014@gmail.com,तहसीलदार, बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार, यावल- tyawal@gmail.com, तहसीलदार, रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार, भडगाव- tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार, चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com, तहसीलदार, अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार, पारोळा- parolatahsil@gmail.com, तहसीलदार, पाचोरा-  tahsilpachora@gmail.com, तहसीलदार, मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com, तहसीलदार, चोपडा- tahsidarchopda@gmail.com.

00000

महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

        जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हयातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका लोकशाही दिन   घेण्याच्या शासकीय परिपत्रकानुसार जानेवारी, २०२३ या महिन्यात तिसऱ्या सोमवारी दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या तहसिल कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

       तरी नागरिकांनी आपल्या  वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेवून सदरहू  तालुका लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000