जळगाव,दि.5 (जिमाका) - सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५४ अ मध्ये सुधारणा करुन नवीन नियम निर्गमित केले आहेत.
पसंती क्रमांकाच्या अर्जासाठी संदर्भ क्र. ०१ अन्वये सुधारणा करण्यात
आलेली आहे, एक नोंदणी प्राधिकरण, त्यातील एखादी नोंदणी मालिका किंवा तिचा भाग, शासकीय
वाहनांना वाटप करण्याकरीता राखून ठेवण्यात येतील, विशिष्ठ वर्गाच्या किवा
प्रवर्गाच्या वाहनांची नोंदणी मालिका समाप्त झाल्याशिवाय, नोंदणी प्राधिकरणाव्दारे
त्याच वर्गासाठी किंवा प्रवर्गासाठी कोणतीही नविन मालिका सुरु केली जाणार नाही, मा. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नोंदणी
प्राधिकाऱ्याच्या शिफारशीवरुन लेखी आदेशाव्दारे नोंदणी क्रमांक ०००१ नेमूण देवून
नविन मालिका सुरु करता येईल त्यासाठी अर्जदाराला शुल्काच्या तीनपट शुल्क प्रदान
करावे लागते. ज्या अर्जदारास त्यानंतर ज्याला या मालिकेमधील नोंदणी क्रमांक
मिळण्याची इच्छा असेल अशा अर्जदाराला, मुळ मालिका पूर्ण होईपर्यंत विनिर्दिष्ट केलेल्या
शुल्काच्या तीनपट दराने शुल्क प्रदान करावे लागेल, जोपर्यंत पहिली मालिका पूर्णपणे
समाप्त होत नाही तोपर्यंत, दुसरी नविन मालिका एकाचवेळी सुरु केली जाणार नाही,
एखादा क्रमांकाकरीता विनिर्दिष्ट केलेल्या शुल्काच्या तीनपट इतके शुल्क प्रदान
केल्यावर वाहनांच्या कोणत्याही वर्गासाठी, इतर कोणत्याही चालू क्रममालिकेतून नोंदणी
चिन्ह नेमून देता येईल, नव्याने सुरु केलेल्या क्रम मालिकेच्या बाबतीत, नोंदणी क्रमांकाच्या
लिलाव केला जाईल, लिलावाचा कालावधी परिवहन आयुक्तींनी वेळोवेळी विनिर्दिष्ट केल्यानुसार
असेल, लिलावाच्या कालावधीत जर एकापेक्षा अधिक अर्जदारांनी एका विशिष्ट नोंदणी
क्रमांकाची मागणी केली असेल तर, त्या नोंदणी क्रमांकाचे जाहिर लिलावाव्दारे वाटप
करण्यात येईल आणि सर्वात उच्च बोली लावणाऱ्या यशस्वी अर्जदाराने विहित केलेल्या
शुल्काव्यतिरिक्त बोलीची रक्कम प्रदान करील. लिलाव प्रक्रिया शासनाकडून शासन
राजपत्रात करण्यात येईल.
लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम
प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांकाचे काटेकोरपणे वाटप करण्यात येईल.
एखाद्या राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक वाटप केलेल्या
दिनांकपासून सहा महिन्याच्या आत केवळ नजिकच्या कुटुंबातील सदस्यांकडे (पती, पत्नी,
मुलगा, मुलगी) यांना हस्तांतरीत केले जावू शकते, एखादा क्रमांकासाठी राखीन
ठेवण्याकरीता ऑनलाईन् स्वरुपात प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत
केले जाणार नाही.
वरील मुद्यांबाबत सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नितीन सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000000000
No comments:
Post a Comment